शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

कायदाच कोलमडला; मणिपूर हिंसाचारावरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 09:42 IST

राज्य पोलिसांकडून हिंसाचाराच्या प्रकरणांचा तपास सुस्त आणि अत्यंत हलगर्जीपणे करण्यात आल्याची टिप्पणीही न्यायालयाने केली.

नवी दिल्ली : मणिपूरमधील कायदा, सुव्यवस्था आणि घटनात्मक यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे, असे ताशेरे तेथील परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी ओढले. राज्य पोलिसांकडून हिंसाचाराच्या प्रकरणांचा तपास सुस्त आणि अत्यंत हलगर्जीपणे करण्यात आल्याची टिप्पणीही न्यायालयाने केली.

मणिपूरमधील बेलगाम जातीय हिंसाचाराला कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा ज्या पद्धतीने हाताळत आहेत त्यावर टीका करताना न्यायालयाने सांगितले की, पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेवरील नियंत्रण गमावले आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्याच्या पोलिस महासंचालकांना मणिपूरशी संबंधित याचिकांवर सुनावणी करताना सोमवारी प्रत्यक्ष उपस्थित राहावे.

सरकारची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी खंडपीठाला सांगितले की, “दोन महिलांच्या लैंगिक छळाच्या प्रकरणी राज्य पोलिसांनी ‘झीरो एफआयआर’ नोंदवला आहे. व्हिडीओ प्रकरणात सात जणांना अटक केली आहे.

सीबीआयला जबाब नोंदविण्यास रोखले- तत्पूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला मणिपूरमधील पीडित महिलांचे जबाब नोंदवू नयेत, असे निर्देश दिले आणि सांगितले की, ते या प्रकरणाशी संबंधित अनेक याचिकांवर दुपारी २ वाजता सुनावणी करतील. - नंतर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने महिलांतर्फे वकील निजाम पाशा यांच्या निवेदनाची दखल घेतली. सीबीआयने या महिलांना मंगळवारी हजर राहून त्यांचे जबाब नोंदविण्यास सांगितले होते.

गुन्हे नोंदवण्यास खूप उशीरसरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने तोंडी निरीक्षण नोंदवले की, “तपास अतिशय ढिसाळ आहे, गुन्हे मोठ्या विलंबाने दाखल करण्यात आले आणि अटक करण्यात आली नाही, जबाब नोंदवले गेले नाहीत... राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था आणि घटनात्मक यंत्रणा पूर्णपणे मोडकळीस आली आहे. एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे की व्हिडीओ प्रकरणात गुन्हे नोंदविण्यास बराच विलंब झाला आहे.”

कुकी, झो जमातीच्या लोकांची घरे जाळलीमणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना अद्यापही घडत आहेत. मंगळवारी पहाटे त्या राज्यात कुकी, झो जमातीच्या लोकांची घरे संतप्त जमावाने पेटवून दिली. या आगीत बिहार, हरयाणा, नागालँडमधून मणिपूरमध्ये आलेल्या स्थलांतरित लोकांपैकी काहीजणांची घरेही भस्मसात झाली. त्यातच आता झो जमातीच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. 

तामिळनाडूची मदतनिवारा छावण्यांत राहणाऱ्या लोकांना तामिळनाडू सरकार अन्नधान्य, औषधे, जीवनावश्यक वस्तू यांची मदत पाठविणार आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह या पत्र लिहून ही गोष्ट कळविली. मणिपूरमध्ये ५० हजार लोक तात्पुरत्या निवारा छावण्यांत सध्या राहत आहेत.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारSupreme Courtसर्वोच्च न्यायालयPoliceपोलिस