शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 23:01 IST

खरे तर, काही भारतीय प्रवाशांना घेऊन दुबईहून आलेले एक चार्टर्ड विमान जमैकाची राजधानी किंग्स्टन येथून माघारी पाठवण्यात आले होते.

भारतीय प्रवाशांनी भरलेले एक विमान जमैकाने दुबईला माघारी पाठवल्याप्रकरणी भारतसरकारची प्रतिक्रिया आली आहे. खरे तर, काही भारतीय प्रवाशांना घेऊन दुबईहून आलेले एक चार्टर्ड विमान जमैकाची राजधानी किंग्स्टन येथून माघारी पाठवण्यात आले होते. आता यासंदर्भात, स्थानिक अधिकारी प्रवाशांच्या कागदपत्रांवर समाधानी नसल्यामुळे हा प्रकार घडल्याचे भारत सरकारने म्हटले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल यांनी म्हटले आहे की, विमान आणि प्रवाशांना दुबईला परतण्याचे आदेश देण्यात आले होते आणि ते 7 मे रोजी किंग्स्टनवरून निघाले होते. आपल्या साप्ताहीक प्रेस नोटमध्ये जायस्वाल यांनी म्हटले आहे, "मिळालेल्या माहितीनुसार, जर्मनीमध्ये नोंदणीकृत चार्टर्ड फ्लाइट 2 मे रोजी पर्यटनाच्या उद्देशाने भारतीयांसह दुबईहून किंग्स्टनला पोहोचले. त्यांनी हॉटेलचे बुकिंग आधीच करून ठेवले होते."

जायस्वाल पुढे म्हणाले, "स्थानिक अधिकारी पर्यटक म्हणून त्यांच्या कागदपत्रांवर समाधानी नव्हते. विमान आणि प्रवाशांना दुबईला परतण्याचे आदेश देण्यात आले. 7 मे रोजी प्रवाशांनी किंग्स्टनवरून निघाले". ‘जमैका ऑबझर्वर’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, या विमानात 253 परदेशी प्रवासी होते. सुरक्षेच्या कारणास्तव अधिकाऱ्यांनी त्यांना प्रवेश नाकारला.

टॅग्स :Dubaiदुबईpassengerप्रवासीIndiaभारतGovernmentसरकार