शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 23:01 IST

खरे तर, काही भारतीय प्रवाशांना घेऊन दुबईहून आलेले एक चार्टर्ड विमान जमैकाची राजधानी किंग्स्टन येथून माघारी पाठवण्यात आले होते.

भारतीय प्रवाशांनी भरलेले एक विमान जमैकाने दुबईला माघारी पाठवल्याप्रकरणी भारतसरकारची प्रतिक्रिया आली आहे. खरे तर, काही भारतीय प्रवाशांना घेऊन दुबईहून आलेले एक चार्टर्ड विमान जमैकाची राजधानी किंग्स्टन येथून माघारी पाठवण्यात आले होते. आता यासंदर्भात, स्थानिक अधिकारी प्रवाशांच्या कागदपत्रांवर समाधानी नसल्यामुळे हा प्रकार घडल्याचे भारत सरकारने म्हटले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल यांनी म्हटले आहे की, विमान आणि प्रवाशांना दुबईला परतण्याचे आदेश देण्यात आले होते आणि ते 7 मे रोजी किंग्स्टनवरून निघाले होते. आपल्या साप्ताहीक प्रेस नोटमध्ये जायस्वाल यांनी म्हटले आहे, "मिळालेल्या माहितीनुसार, जर्मनीमध्ये नोंदणीकृत चार्टर्ड फ्लाइट 2 मे रोजी पर्यटनाच्या उद्देशाने भारतीयांसह दुबईहून किंग्स्टनला पोहोचले. त्यांनी हॉटेलचे बुकिंग आधीच करून ठेवले होते."

जायस्वाल पुढे म्हणाले, "स्थानिक अधिकारी पर्यटक म्हणून त्यांच्या कागदपत्रांवर समाधानी नव्हते. विमान आणि प्रवाशांना दुबईला परतण्याचे आदेश देण्यात आले. 7 मे रोजी प्रवाशांनी किंग्स्टनवरून निघाले". ‘जमैका ऑबझर्वर’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, या विमानात 253 परदेशी प्रवासी होते. सुरक्षेच्या कारणास्तव अधिकाऱ्यांनी त्यांना प्रवेश नाकारला.

टॅग्स :Dubaiदुबईpassengerप्रवासीIndiaभारतGovernmentसरकार