शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

ठाकरेंच्या राजीनाम्याचा मुद्दा सुनावणीत ‘गेमचेंजर’; पाच मुद्दे घटनापीठाने फेटाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2023 08:37 IST

विजयाचा दावा पोकळ

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढे झालेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीत उद्धव ठाकरे यांनी दिलेला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा ‘गेमचेंजर’ ठरला, असे मत राज्यसभेचे खासदार आणि ज्येष्ठ विधिज्ञ महेश जेठमलानी यांनी व्यक्त केले. उद्धव ठाकरे यांच्या वतीने उपस्थित करण्यात आलेले सातपैकी पाच मुद्दे घटनापीठाने फेटाळून लावले असून त्यांनी केलेला विजयाचा दावा पोकळ असल्याचा टोला जेठमलानी यांनी लगावला.

शिवसेनेच्या सोळा आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्यावर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर तीन ते सहा महिन्यांत निर्णय घेतील, अशी अपेक्षा जेठमलानी यांनी व्यक्त केली.

विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याऐवजी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. तिथेच त्यांचा खेळ संपला आणि याच मुद्याने सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीला कलाटणी दिली, असे जेठमलानी म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने युक्तिवाद करणाऱ्या विधिज्ञांमध्ये जेठमलानी यांचा समावेश होता.

उद्धव ठाकरे यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकांमध्ये एकूण सात मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. त्यापैकी केवळ दोनच मुद्दे मान्य करून घटनापीठाने पाच मुद्दे फेटाळून लावले, असे जेठमलानी म्हणाले.

गाेगावले पुन्हा मुख्य प्रतोदपदी?

राज्यपालांनी बहुमत चाचणीचे निर्देश द्यायला नको होते, हा त्यातील पहिला मुद्दा होता; पण उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेलेच नाही. त्यामुळे तो मुद्दा आधीच निष्प्रभ ठरला होता.

दुसरा मुद्दा म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भरत गोगावले यांना मुख्य प्रतोद म्हणून दिलेली मान्यता सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविली आहे; पण गोगावलेंची नियुक्ती रद्दबातल करताना त्यांची पुन्हा मुख्य प्रतोदपदी नियुक्ती करण्याची शक्यता सर्वोच्च न्यायालयाने नाकारलेली नाही.

शिवसेना पक्षाच्या घटनेनुसार भरत गोगावलेंच्या नियुक्तीवर पुन्हा विचार करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारची वैधता मान्य केली आहे, तरीही आमचीच सरशी झाली असे उद्धव ठाकरे म्हणत असतील तर तो पोकळ विजय ठरला आहे, अशी टीका जेठमलानी यांनी केली.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे