बिहारच्या शेखपुरा जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका विवाहात वरमाला कार्यक्रम पार पडल्यानंतर, केवळ नवरदेव काळा आहे, असे कारण सांगत नवरीने लग्नास नकार दिला. यामुळे लग्नमंडपात एकच वाद पेटला आणि अखेर लग्न तुटले.
नेमकं काय घडलं? -मिळालेल्या माहितीनुसार, बरबीघा नगर परिसरात बुधवारी रात्री एका विवाह समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. नवादा येथून वधू पक्षाचे वऱ्हाड आले होते. सुरुवातीला सर्व विधी उत्साहात पार पडले, आनंदाच्या वातावरणात वरमाला कार्यक्रमही पार पडला. मात्र, या विधीनंतर लगेचच नवरीच्या बहिणीने नवरदेव पसंत नसल्याचे म्हटले. यासाठी तिने नवरदेव काळा असल्याचे कारण पुढे केले, यानंतर नवरीनेही लग्नास नकार दिला. नवरीच्या बहिणीच्या या एका विधानामुळे दोन्ही पक्षांत मोठा वाद निर्माण झाला.
रात्री उशिरापर्यंत दोन्ही बाजूंनी समझोता करण्याचा प्रयत्न झाला, मात्र नवरी आपल्या निर्णयावर ठाम होती. या प्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला यश आले नाही. अखेर सात फेरे न घेताच वधू पक्ष निघून गेला.
या अजब कारणामुळे परिसरात या लग्नाची चर्चा रंगली आहे. मिशन पोलीस ठाण्याचे प्रभारी आदित्य रंजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही पक्षांत वाद झाला असला तरी अद्याप कोणाकडूनही लेखी तक्रार मिळालेली नाही.
Web Summary : In Bihar, a bride refused to marry due to the groom's dark complexion after the garland ceremony. The sister's objection ignited a dispute, leading to the wedding's cancellation despite police intervention. No formal complaint has been filed.
Web Summary : बिहार में, वरमाला के बाद दूल्हे का रंग काला होने के कारण दुल्हन ने शादी से इनकार कर दिया। साली के विरोध से विवाद बढ़ गया, और पुलिस के हस्तक्षेप के बावजूद शादी रद्द हो गई। कोई औपचारिक शिकायत दर्ज नहीं की गई है।