शहरं
Join us  
Trending Stories
1
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
2
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
3
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
4
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
5
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
6
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
7
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
8
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
9
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
10
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
11
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
12
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
13
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
14
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
15
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
16
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
17
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
18
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
19
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
20
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?

देशाची अर्थव्यवस्था बुडाली हेच नोटबंदीचे मोठे यश; काँग्रेस नेते राहुल गांधींची केंद्रावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 07:07 IST

बनावट नोटांचा सुळसुळाट नोटाबंदीच्या निर्णयानंतर बंद होईल, असे मोदी यांनी सांगितले होते.

नवी दिल्ली : देशाची अर्थव्यवस्था बुडविणे हेच मोदी सरकारने २०१६ साली घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाचे यश आहे, अशी उपरोधिक टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे.५०० व २००० रुपयांच्या बनावट नोटांच्या प्रमाणात अनुक्रमे १०० टक्के व ५० टक्के वाढ झाली असल्याचे रिझर्व्ह बँकेने आपल्या वार्षिक अहवालात म्हटले आहे. त्याबाबतच्या वृत्ताचा हवाला देत राहुल गांधी यांनी सांगितले की, ५०० व १००० रुपयांच्या नोटांवर मोदी सरकारने लागू केलेल्या निर्बंधांनंतर बनावट नोटांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ते म्हणाले की, अर्थव्यवस्था बुडविण्याचे काम मोदी सरकारने नोटबंदीच्या निर्णयाद्वारे केले.

बनावट नोटांचा सुळसुळाट नोटाबंदीच्या निर्णयानंतर बंद होईल, असे मोदी यांनी सांगितले होते. मात्र बनावट नोटांची संख्या वारेमाप वाढत असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या अहवालात म्हटले आहे. त्याबाबत मोदी सरकार काही बोलणार आहे की नाही?देशातील काळ्या पैशाची समस्या संपविण्यासाठी तसेच दहशतवाद्यांना मिळणारी आर्थिक रसद तोडण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १००० व ५०० रुपयांच्या जुन्या नोटांवर बंदी लागू केली होती. हा निर्णय ८ नोव्हेंबर २०१६ रोजी घेण्यात आला होता.

शिवसेनेचीही टीकाशिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी उपरोधिक शैलीत म्हणाल्या की, बनावट नोटांचे प्रमाण वाढणे हा नोटबंदीच्या निर्णयाचा एक मोठा फायदा असावा असे वाटू लागले आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाDemonetisationनिश्चलनीकरण