शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
4
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
5
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
6
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
7
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
8
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
9
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
10
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
11
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
12
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
13
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
14
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
15
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
16
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
17
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
18
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
19
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
20
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं

देशाची अर्थव्यवस्था बुडाली हेच नोटबंदीचे मोठे यश; काँग्रेस नेते राहुल गांधींची केंद्रावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 07:07 IST

बनावट नोटांचा सुळसुळाट नोटाबंदीच्या निर्णयानंतर बंद होईल, असे मोदी यांनी सांगितले होते.

नवी दिल्ली : देशाची अर्थव्यवस्था बुडविणे हेच मोदी सरकारने २०१६ साली घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाचे यश आहे, अशी उपरोधिक टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे.५०० व २००० रुपयांच्या बनावट नोटांच्या प्रमाणात अनुक्रमे १०० टक्के व ५० टक्के वाढ झाली असल्याचे रिझर्व्ह बँकेने आपल्या वार्षिक अहवालात म्हटले आहे. त्याबाबतच्या वृत्ताचा हवाला देत राहुल गांधी यांनी सांगितले की, ५०० व १००० रुपयांच्या नोटांवर मोदी सरकारने लागू केलेल्या निर्बंधांनंतर बनावट नोटांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ते म्हणाले की, अर्थव्यवस्था बुडविण्याचे काम मोदी सरकारने नोटबंदीच्या निर्णयाद्वारे केले.

बनावट नोटांचा सुळसुळाट नोटाबंदीच्या निर्णयानंतर बंद होईल, असे मोदी यांनी सांगितले होते. मात्र बनावट नोटांची संख्या वारेमाप वाढत असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या अहवालात म्हटले आहे. त्याबाबत मोदी सरकार काही बोलणार आहे की नाही?देशातील काळ्या पैशाची समस्या संपविण्यासाठी तसेच दहशतवाद्यांना मिळणारी आर्थिक रसद तोडण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १००० व ५०० रुपयांच्या जुन्या नोटांवर बंदी लागू केली होती. हा निर्णय ८ नोव्हेंबर २०१६ रोजी घेण्यात आला होता.

शिवसेनेचीही टीकाशिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी उपरोधिक शैलीत म्हणाल्या की, बनावट नोटांचे प्रमाण वाढणे हा नोटबंदीच्या निर्णयाचा एक मोठा फायदा असावा असे वाटू लागले आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाDemonetisationनिश्चलनीकरण