शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

तामिळनाडू भाजपाचा चेहरा, मोदींनीही केलं कौतुक; तरीही अमित शाहांनी का मागितला अन्नामलाईंचा राजीनामा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 13:17 IST

नागेंद्रन यांना प्रदेशाध्यक्षपद सोपवले तर दक्षिण भागात भाजपाला पक्षसंघटन वाढवण्यास मदत होईल असं वरिष्ठांना वाटते. 

चेन्नई - तामिळनाडूत २०२६ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि एआयएडीएमके यांच्यात आघाडी झाल्यास आक्रमक नेते के अन्नामलाई यांना तामिळनाडूभाजपाचं अध्यक्षपद सोडावं लागू शकते. अन्नामलाई युवा आक्रमक नेते म्हणून उदयास आले ज्यांचं जाहीरपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले होते. मागील २ वर्षापासून अन्नामलाई थेट डिएमकेला आव्हान देत आहेत. त्यांच्या धोरणामुळेच २०२३ साली एआयएडिमके यांनी भाजपाशी नाते तोडले होते. 

रिपोर्टनुसार, के. अन्नामलाई यांना प्रदेशाध्यक्षपदावरून निरोप देणे शिक्षा नाही तर तामिळनाडूतील जातीय समीकरण हे कारण आहे. अन्नामलाई यांना दिल्लीत अमित शाह यांनी घेतलेला निर्णय कळवला. त्यानंतर पक्षाच्या निर्णयाचं स्वागत करत पक्षवाढीसाठी काम करत राहणार असं अन्नामलाई यांनी म्हटलं. तामिळनाडूमध्ये भाजपा आणि एआयएडिएमके यांच्यातील निवडणूक आघाडीची शक्यता पाहता राजकीय हालचालींना वेग आला आहे. जर २०२६ मध्ये भाजपा-एआयएडिएमके यांनी एकत्रित निवडणूक लढवली तर दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते अन्नामलाई आणि पलानीस्वामी हे एकाच गोंडर समुदायातून येतात. दोन्ही नेते पश्चिमी कोंगु भागातून येतात जिथे गोंडर जातीचं वर्चस्व आहे. 

या स्थितीत राज्यातील दुसरी मोठी जात थेवर समाजातील व्यक्तीकडे पक्षाचं नेतृत्व सोपवले जाऊ शकते. जर ते झाले तर तामिळनाडूत भाजपाचा चेहरा बनलेले अन्नामलाई यांना प्रदेशाध्यक्षपद सोडावे लागेल. अन्नामलाई तामिळनाडूत आक्रमक युवा नेते म्हणून अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहेत. मागील काळात केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी दिल्लीत अन्नामलाई यांच्यासोबत दीर्घ चर्चा केली. तुमच्या भविष्याबाबत पक्ष कटिबद्ध आहे असं त्यांनी अन्नामलाई यांना आश्वासन दिले. पक्षातील नेतृत्व बदलानंतरही तामिळनाडूच्या राजकारणात अन्नामलाई यांची महत्त्वाची भूमिका राहील. अन्नामलाई यांनीही पक्षासोबत निष्ठा दाखवत कार्यकर्ता म्हणूनही काम करण्याची तयारी दाखवली आहे.

दरम्यान, भाजपा आमदार नैनार नागेंद्रन यांना तामिळनाडू भाजपाचं नेतृत्व सोपवलं जाऊ शकते. हे थेवर समुदायातून येतात. नैनार नागेंद्रन तिरूनेलवेली येथील लोकप्रिय नेते आहेत. ते याआधी एआयएडिएमकेमध्ये होते. जयललिता यांच्या कार्यकाळात थेवर समुदायाचे मतदान एआयएडिएमकेची व्होटबँक मानले जायचे. दक्षिण तामिळनाडूत थेवर समाजाची मते निर्णायक आहेत. नागेंद्रन यांना प्रदेशाध्यक्षपद सोपवले तर दक्षिण भागात भाजपाला पक्षसंघटन वाढवण्यास मदत होईल असं वरिष्ठांना वाटते. 

भाजपाला यश कसं मिळणार?

भाजपा सध्या तामिळनाडूत एआयएडिएमकेहून अधिक मजबूत पक्ष बनला आहे. २३४ विधानसभा मतदारसंघापैकी ११४ जागांवर भाजपाची पकड आहे. पश्चिम तामिळनाडूत ५४, दक्षिण तामिळनाडूत ६० जागांवर भाजपाचा प्रभाव आहे. एआयएडिएमके पश्चिम तामिळनाडूत भाजपाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. १५० जागा निवडून आणण्यासाठी पक्षाला राज्यातील तिन्ही भागात क्लीन स्वीप करावे लागेल असं अन्नामलाई यांनी म्हटलं. त्याशिवाय मी सत्तेसाठी राजकारणात आलो नाही तर तामिळनाडूचं राजकारण बदलण्यासाठी आलोय असंही अन्नामलाई यांनी स्पष्ट केले.  

टॅग्स :BJPभाजपाTamilnaduतामिळनाडूAmit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदी