शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय?
3
'भारताने माझ्या आईचे प्राण वाचवले, त्यांना बांगलादेशच्या स्वाधीन करणार नाहीत'; शेख हसीना यांच्या मुलाने व्यक्त केला विश्वास
4
ICC ODI Batting Ranking : 'नवा गडी नव राज्य!' रोहित शर्माला मागे टाकत डॅरिल मिचेलनं रचला इतिहास
5
"मदरसे-मशिदीतून दहशतवादी बाहेर पडतात..."; योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान, AMU वरही उपस्थित केला सवाल
6
Jalgaon Crime: 'चोर पऱ्या' बोलला अन्...; रेल्वे रुळावर मृतदेह सापडलेल्या हर्षलची हत्याच; सगळा घटनाक्रम आला समोर
7
महागड्या क्रिम्सना बाय-बाय, Skinimalism सोपा उपाय; ३ स्टेपमध्ये मेकअपशिवाय ग्लोइंग स्किन
8
'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया
9
जगातील टॉप हाय-स्ट्रीट रँकिंगमध्ये भारताचा दबदबा! ही बाजारपेठ सर्वात महागडी, तर सर्वाधिक भाडे कुठे?
10
आता बँक FD विसरा! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय ८.२०% पर्यंत व्याज; गॅरंटीड रिटर्नवाले प्लान्स पाहा
11
सिद्धू मूसेवाला ते बाबा सिद्दीकी हत्या अन् सलमान खान..; अनमोल बिश्नोईची संपूर्ण क्राइम कुंडली
12
Jara Hatke: सिम कार्डचे एक टोक तिरपे का असते? ९९ % लोकांना माहीत नाही कारण!
13
किमान ५ इमारतीच्या गटाचे ‘मिनी क्लस्टर’ लवकरच; मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश
14
"मला शिव्या दिल्या तर फरक नाही, पण संघावर आल्यावर मी..."; पिट्या भाईने सांगितले मनसे सोडण्याचे कारण
15
घरमालक-भाडेकरू वादावर अखेर ब्रेक! 'नवीन भाडे करार २०२५' लागू; 'हा' नियम मोडल्यास ५ हजार दंड!
16
Vastu Tips: घड्याळ दोन-तीन मिनिटं पुढे लावणे शुभ? पाहा वास्तू शास्त्र काय सांगते... 
17
धर्म आणि जातीवर ऐश्वर्या राय बच्चनचं वक्तव्य, पंतप्रधान मोदींच्या पाया पडत घेतले आशीर्वाद
18
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
19
छत्तीसगडमध्ये दोन अल्पवयीन मुलांना ATSकडून अटक; 'ब्रेनवॉश' करून ISISमध्ये सुरू होती भरती
20
स्लीपर वंदे भारत अन् बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणार? अश्विनी वैष्णव यांनी तारखाच सांगितल्या
Daily Top 2Weekly Top 5

"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 23:45 IST

१२ ऑगस्टच्या सुनावणीचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्यात न्या. संजय मेधी चिंता व्यक्त करताना दिसतात. या प्रकरणाची पुढील सुनावणी १ सप्टेंबरला ठेवण्यात आली आहे.

गुवाहाटी - एकाच कंपनीला जिल्ह्यातील ९९१ एकर जमीन वाटप केल्याबद्दल गुवाहाटी हायकोर्टाचे न्यायाधीश आसाम सरकारवर संतापले आहेत. एका खासगी कंपनीला ३००० हजार बिघा म्हणजे ९९१ एकर जमीन देण्यावर कोर्टाने आक्षेप घेतला. दीमा हसाओ संविधानाच्या सहाव्या सूचीत येतात, त्यामुळे इथल्या स्थानिक आदिवासींचा जमिनीवर पहिला अधिकार आहे असं कोर्टाने म्हटलं. सरकारने कोणत्या धोरणातंर्गत या जमिनीचं वाटप केले, त्याचे रेकॉर्ड सादर करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. 

सुनावणीवेळी न्या. संजय कुमार मेधी यांनी वकिलांना विचारले की, ३ हजार बिघा, पूर्ण जिल्हा..हे काय चाललंय..किती जमीन नापीक आहे आम्हाला माहिती आहे. हा कसला निर्णय आहे, काय चेष्टा लावलीय का असा संतप्त सवाल कोर्टाने विचारला. त्यावर सिमेंट कंपनीच्या वकिलांनी ही जमीन नापीक होती, कंपनी चालवण्यासाठी त्याची आवश्यकता होती असं सांगितले. मात्र हा तुमच्या गरजेचे मुद्दा नाही तर जनहिताचा मुद्दा आहे असं न्यायाधीशांनी बजावले. गुवाहाटी हायकोर्ट गावकऱ्यांच्या याचिकेवर सुनावणी करत होते. १२ ऑगस्टच्या सुनावणीचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्यात न्या. संजय मेधी चिंता व्यक्त करताना दिसतात. या प्रकरणाची पुढील सुनावणी १ सप्टेंबरला ठेवण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

दीमा हसाओ आसाममधील एक आदिवासी बहुल पहाडी जिल्हा आहे. भारतीय संविधानाच्या सहाव्या सूचीतील तरतुदीनुसार North Cacher Hills Automous Council येते. ऑक्टोबर २०२४ मध्ये कोलकाता इथं नोंदणी असलेली खासगी कंपनी महाबल सिमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांना २ हजार बिघा जमिनीचं वाटप करण्यात आले. त्यानंतर त्याच नोव्हेंबरमध्ये १ हजार बिघा जमीन कंपनीला देण्यात आली होती. आसाम सरकारच्या मेगा गुंतवणूक कार्यक्रमात ११ हजार कोटी गुंतवणुकीसह या कंपनीने एक करार केला होता. त्यात दीमा हसाओ इथं सिमेंट प्लांट उभारण्यासाठी ही जमीन देण्यात आली. 

स्थानिक गावकऱ्यांनी सरकारच्या या निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यात आम्हाला जमिनीवरून बेदखल करण्यात येत आहे असा आरोप केला. या याचिकेच्या सुनावणीवेळी हायकोर्टात कंपनीच्या वकिलांनी सांगितले की, सरकारकडून ३ हजार बिघा जमीन देण्यात आली आहे. त्यावर कोर्टाने ३ हजार बिघा, हे काय चाललंय, एका खासगी कंपनीला एवढी जमीन देण्याचा हा कसला निर्णय, काय चेष्टा लावलीय का? असं सांगत हायकोर्टाने कुठल्या धोरणाखाली, प्रक्रियेतंर्गत या जमिनीचे वाटप केले त्याची कागदपत्रे सादर करण्याचे आदेश सरकारला दिले आहेत.  

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय