शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

महाकुंभ मेळा 2025 मध्ये सादर होणार सनातन बोर्डाचा मसुदा, साधू-संतांनी तारीखही ठरवली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 17:35 IST

"जोवर सरकार सनातन बोर्ड स्थापन करत नाही, तोवर आम्ही कुंभमेळ्यातून परतणार नाही," असेही ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे. 

महाकुंभ मेळ्यात सेक्टर १७ मध्ये होणाऱ्या धर्मसभेत येणाऱ्या २७ जानेवारी रोजी सनातन बोर्डाचा मसुदा सादर केला जाणार आहे. हा दिवस 'धर्म स्वातंत्र्य दिन' म्हणून साजरा केला जाईल. अशी माहिती प्रसिद्ध आध्यात्मिक प्रवक्ते देवकीनंदन ठाकूर यांनी दिली आहे. ते गुरुवारी निरंजनी आखाड्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

देवकीनंदन ठाकूर म्हणाले, "आपला धर्म स्वतंत्र नाही. आपली मंदिरे सरकारांच्या ताब्यात आहेत, गुरुकुलं बंद आहेत आणि गौ माता रस्त्यावर भटकत आहे. आपला धर्म आणि संस्कृती जपण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी आपल्याला सनातन बोर्डाची आवश्यकता आहे."

देवकीनंदन ठाकूर पुढे म्हणाले, "या धार्म सभेत सर्व आखाड्यांचे प्रतिनिधी, चार शंकराचार्य आणि सनातन धर्माशी संबंधित प्रमुख लोक सहभागी होतील. तसेच, जोवर सरकार सनातन बोर्ड स्थापन करत नाही, तोवर आम्ही कुंभमेळ्यातून परतणार नाही," असेही ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे. 

जुनापीठाधीश्वर महंत स्वामी यतिंद्रानंद गिरी म्हणाले, "सनातन बोर्ड केवळ भारतासाठीच नाही, तर संपूर्ण मानवतेसाठी आवश्यक आहे. दहशतवाद, द्वेष आणि अराजक संपवण्याचा मार्ग केवळ सनातन धर्मातूनच जातो." निरंजनी आखाड्याचे ज्येष्ठ महामंडलेश्वर आणि उज्जैनमधील अर्जुन हनुमान मंदिराचे महंत स्वामी प्रेमानंद पुरी म्हणाले, "काही लोक गंगेची भूमी वक्फ बोर्डाची असल्याचा दावा करतात. त्यांनी हे समजून घ्यायला हवे की, सूर्याच्या उत्पत्तीपासून सनातन धर्म अस्तित्वात आहे. देशाचे अखंडत्व आबाधित राखण्यासाठी सनातन बोर्डाची स्थापना होणे अत्यंत आवश्यक आहे.

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाHinduहिंदूHinduismहिंदुइझम