शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

Punjab Assembly Election 2022 : काँग्रेसला दोन तृतीयांश बहुमत मिळेल, सरकार आमचेच येणार; चरणजितसिंग चन्नी यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 11:19 IST

मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून राहुल गांधी यांनी घोषणा केल्यानंतर  चरणजितसिंग चन्नी यांची ‘लोकमत’ला विशेष मुलाखत दिली. त्याचा हा भाग...

यदु जोशी -

लुधियाना : काँग्रेस पक्षाने आज मला मोठा सन्मान दिला, आता तो सर्वांना सोबत घेऊन सार्थ करणारच. आम्ही दोन तृतीयांश जागा जिंकणारच, पुढचे सरकारदेखील आमचेच, या शब्दांत पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी त्यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी जाहीर होताच व्यक्त केला. मुख्यमंत्री पदासाठी नाव जाहीर होताच तासाभरात पहिली विशेष मुलाखत त्यांनी ‘लोकमत’ला दिली. 

चन्नी यांनी महान संत रविदास यांच्या भजनातील काही ओळी म्हटल्या. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, नेते राहुल गांधी यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करताना ते अतिशय भावुक झाले.

दलित समाजातून आलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीला काँग्रेसने एकदा मुख्यमंत्री केले अन् आज पुन्हा विश्वास व्यक्त केला असे म्हणत त्यांनी महान संत रविदास यांच्या भजनातील काही ओळी उदृत केल्या. ‘ऐसी लाल तुझ बिन कउनु करै, गरीब निवाजु गुसाईआ मेरा माथै छत्रु धरै, नीच उच करै मेरा गोबिंदु काहू ते न डरै‘, असे म्हणत त्यांनी ईश्वर अन् ईश्वरासारखी कृपा करणाऱ्या पक्षश्रेष्ठींचे आभार मानले.आपल्यालाच पुढची संधी दिल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्या नाराजीचा सामना आपल्याला करावा लागणार नाही का?- अजिबात नाही. सिद्धू माझे मित्र, सहकारी आहेत. काही मुद्द्यांवर मतभेद असू शकतात; पण आपल्या मनात पंजाबच्या विकासाचा जो रोडमॅप आहे तो पूर्णत्वास काँग्रेसच नेऊ शकते, असे त्यांनी आजच्याच राहुलजींच्या सभेत सांगितले. त्यांच्यासह सर्वांच्याच विकासाचा रोडमॅप मला पुढे न्यायचा आहे. आपल्याला मुख्यमंत्री पदाचे उमेदवार केल्याने काँग्रेस जिंकेल असे आपल्याला वाटते का?-  मी तसे म्हणालो नाही. आजचा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा आहे आणि तो त्यांनी सगळ्यांच्या मनाचा कानोसा घेऊन केलेला आहे. काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल, हे उद्याचे चित्र मला आजच दिसत आहे. माझे नाव जाहीर झाल्यानंतर पंजाबभर दिवाळी साजरी होत असल्यासारखेच वातावरण आहे. उद्याच्या विजयाची ही नांदीच आहे. कोण आम आदमी? अहो! आम आदमी तर मीच आहे अन् आम आदमी पक्षासोबत आहे. 

आपली लढत कोणाशी आहे, आपशी की भाजपशी?- समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याच्या काँग्रेसच्या विचारांचा विरोध करणाऱ्या प्रत्येकच पक्षाशी आमचा लढा आहे आणि राहील. मला माझ्या पक्षाची रेष मोठी करायची आहे. काँग्रेस ही पंजाबची लाइफलाइन आहे. इतर सर्वच पक्षांनी इथल्या मतदारांची घोर निराशा केली आहे. 

टॅग्स :Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२Punjabपंजाबcongressकाँग्रेस