शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 09:37 IST

Anil Chauhan on china pakistan relations: भारताचे सीडीएस प्रमुख अनिल चौहान यांनी पाकिस्तान, चीन आणि बांगलादेश यांच्यातील वाढत चाललेल्या जवळीकतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी देशातील सामाजिक सलोखा टिकवून ठेवणे महत्त्वाचे असल्याचेही म्हटले आहे.

Anil Chauhan News: भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान यांनी चीन, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात वाढत चालेल्या जवळीकतेवरून सावधगिरीचा इशारा दिला आहे. चीन, पाकिस्तान आणि बांगलादेश एकत्र येणे, हे भारताच्या सुरक्षिततेसाठी आणि स्थिरतेसाठी धोकादायक आहे, असे चौहान म्हणाले.  

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

सीडीएस प्रमुख जनरल अनिल चौहान मंगळवारी एका थिंक टँक कार्यक्रमात बोलत होते. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेवर आज बाहेरून आतूनही प्रचंड ताण आहे, असे ते म्हणाले. 

अमेरिकेची भूमिका अडथळे निर्माण करणारी

"आज जागतिक परिस्थिती खूप अस्थिर आहे. संपूर्ण जग जुन्या पद्धतीने नवीन जागतिक संतुलन साधण्याच्या दिशेने पावले टाकत आहे. या संक्रमणाच्या काळात अमेरिकेची भूमिका अनेक पातळ्यांवर अडथळे निर्माण करत आहे", असे सीडीएस प्रमुख अनिल चौहान म्हणाले. 

"एक मजबूत आणि लवचिक अर्थव्यवस्था कोणत्याही देशासाठी राष्ट्रीय शक्तीचा पाया असते. आर्थिक आणि व्यावसायिक सुरक्षाही राष्ट्रीय सुरक्षेतील महत्त्वाचा घटक आहेत. स्थिर विकास आणि शाश्वत विकास मजबूत अर्थव्यवस्था उभी करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे", असे भाष्य सीडीएस प्रमुख चौहान यांनी केले. 

सामाजिक आणि देशांतर्गत सुरक्षा महत्त्वाची

"आपला देश बहुभाषिक आहे. बहुधर्मिय आणि अनेक जाती असलेला आहे. अशा परिस्थितीत सामाजिक एकात्मता टिकवून ठेवणे खूपच गरजेचे आहे. सामाजिक सुरक्षेला देशांतर्गत सुरक्षा व्यवस्थेत खूप महत्त्वाचं म्हणून बघितले गेले पाहिजे. भारत आतून कमकुवत होत गेला, तर परकीय धोके अधिक दुष्परिणाम करणारे असतील", असे मत चौहान यांनी मांडले. 

चीन-पाकिस्तान-बांगलादेशपासून सावध राहण्याची गरज

सीडीएस प्रमुख चौहान यांनी चीन, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील वाढत चाललेल्या जवळीकतेच्या मुद्द्यावरही बोट ठेवले. तीन देश एकत्र येणे भारताच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक आहेत, असे ते म्हणाले. 

"चीन, पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्या कोणत्याही प्रकारे राजनैतिक सहकार्य करण्यावर एकमत झाले, तर त्याचा थेट परिणाम भारताच्या सुरक्षेवर होईल. या तिन्ही देशातील समान हित भारताच्या विरोधात एक राजनैतिक आव्हान असेल. विशेषतः तेव्हा जेव्हा बांगलादेशात राजकीय अस्थिरता आहे आणि माजी पंतप्रधान भारतात शरणार्थी म्हणून राहत आहेत", असा इशारा त्यांनी दिला.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानchinaचीनPakistanपाकिस्तानBangladeshबांगलादेशInternationalआंतरराष्ट्रीय