शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

भारताचं ‘चिकन नेक’ कापण्यास निघालेल्या बांगलादेशची केंद्रानं दाबली नस, केली अशी कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 10:59 IST

India Vs Bangladesh: बांगलादेशमध्ये झालेल्या सत्तांतरापासून भारत आणि बांगलादेशमधील संबंध तणावपूर्ण झालेले आहेत. दोन्ही देशांमध्ये मतभेद उफाळले असून, बांदलादेशकडून भारताला सातत्याने धमकीवजा आव्हान दिलं जात आहे.

बांगलादेशमध्ये झालेल्या सत्तांतरापासून भारत आणि बांगलादेशमधील संबंध तणावपूर्ण झालेले आहेत. दोन्ही देशांमध्ये मतभेद उफाळले असून, बांदलादेशकडून भारताला सातत्याने धमकीवजा आव्हान दिलं जात आहे. या तणावपूर्ण वातावरणादरम्यान, भारताने बांगलादेशवर मोठी कारवाई करत बांगलादेशला देण्यात येत असलेली ट्रान्स-शिपमेंट सुविधा अचानक बंद केली आहे. हा निर्णय बांगलादेशमधील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी पूर्वोत्तर भारताला देशाच्या मुख्य भागाशी जोडणाऱ्या चिकन नेक अर्थात सिलिगुडी कॉरिडॉरबाबत केलेल्या विधानानंतर घेण्यात आला आहे.

भारताची पूर्वोत्तरेतील राज्ये ही भूवेष्टित असून, या राज्यांना समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी बांगलादेश हा एकमेव पर्याय आहे, असं विधान बांगलादेशमधील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी केलं होतं. युनूस यांनी त्यांच्या हल्लीच झालेल्या चीन दौऱ्यावेळी हे विधान केलं होतं. त्याला भारताने तीव्र विरोध केला होता.

आता भारताने बांगलादेशला झटका देताना बांगलादेशला देण्यात येत असलेली ट्रान्स-शिपमेंट सुविधा बंद केली आहे. बांगलादेशला आपला माल भारतातील बंदरे आणि विमानतळांच्या माध्यमातून त्रयस्त देशात पाठवता यावा, यासाठी  भारताने २०२० मध्ये बांगलादेशला ही सुविधा दिली होती. या माध्यमातून बांगलादेश आपल्या वस्तूंची मध्य पूर्व, युरोप आणि इतर देशांमध्ये निर्यात करत असे. बांगलादेशला भारतामधून व्यापार करण्याची सुलभ संधी देणं हा या सुविधेचा एकमेव हेतू होता.

मात्र आता वित्त मंत्रायलयाच्या केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क विभागाने ही सुविधा रद्द केली आहे. बोर्डाच्या ८ एप्रिल रोजीच्या अधिसूचनेत म्हटल्याप्रमाणे जुना नियम तात्काळ प्रबावाने रद्द करण्यात आला आहे. जो माल आधीच भारतात आला आहे, त्याला जुन्या नियमांनुसार बाहेर जाऊ दिलं जाईल.

याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी सांगितले की, या सुविधेमुळे आमची विमानतळे आणि बंदरांवर गर्दी वाढली होती. त्यामुळे भारताच्या आपल्या वस्तूंच्या निर्यातीमध्ये उशीर होत होता, तसेच खर्चही वाढत होता. त्यामुळे ८ एप्रिलपासून ही सुविधा ररद्द करण्यात आली आहे. मात्र नेपाळ आणि भूतानसाठी बांगलादेशचा माल हा भारतीय सीमेमधूनच जाईल. दरम्यान, केंद्र सरकारनं उचललेल्या या पावलाचं आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी स्वागत केलं आहे.  

टॅग्स :IndiaभारतBangladeshबांगलादेशInternationalआंतरराष्ट्रीय