शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकार लागले कामाला! नवीन मंत्र्यांनी घेतला पदभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 06:54 IST

Central Government News: एकाच वेळी बदल आणि सातत्य दर्शवत भारताच्या नवीन सरकारने मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा कामाला सुरुवात केली. कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री पदभार स्वीकारण्यासाठी आपापल्या कार्यालयात पोहोचले.

 नवी दिल्ली - एकाच वेळी बदल आणि सातत्य दर्शवत भारताच्या नवीन सरकारने मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा कामाला सुरुवात केली. कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री पदभार स्वीकारण्यासाठी आपापल्या कार्यालयात पोहोचले.

मंत्र्यांना खात्यांचे वाटप झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी अनेक मंत्र्यांनी पदभार स्वीकारून महत्त्वाच्या फायलींवर स्वाक्षऱ्या केल्या. काहींनी प्रार्थना करून तर काहींनी त्यांच्या समर्थकांच्या घोषणाबाजीत पदभार स्वीकारला.  भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी सलग दुसऱ्यांदा केंद्रीय गृहमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली. २०१९ पासून ते ही जबाबदारी सांभाळत आहेत. कार्यभार स्वीकारण्यापूर्वी शाह यांनी शहरातील चाणक्यपुरी भागातील राष्ट्रीय पोलिस स्मारकाला भेट दिली आणि देशसेवा करताना प्राणांची आहुती देणाऱ्या पोलिसांना श्रद्धांजली वाहिली.

सहकाराच्या माध्यमातून शेतकरी आणि ग्रामीण भागात समृद्धी आणण्याचे काम करू. आम्ही केवळ पुण्यापासून महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात हवाई सेवा विस्तारित करू. पुणे विमानतळाचे विस्तारीकरण करणे बाकी आहे. -मुरलीधर मोहोळ केंद्रीय नागरी उड्डाण व सहकार राज्यमंत्री 

सरकार योग आणि आयुर्वेदाचा जगभरात प्रचार करणार आहे. आता जगभरात योग आणि आयुर्वेदाचा प्रचार करणे, हे सरकारचे काम आहे. महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेची युती मजबूत असून, विधानसभेत नक्कीच विजयी होईल.-प्रताप जाधव, आयुष आणि आरोग्य मंत्री 

नवीन सरकार भारताच्या सुरक्षेसाठी आपले प्रयत्न पुढील स्तरावर नेईल आणि भारताला दहशतवाद, अतिरेकी आणि नक्षलवादाच्या विरोधात मजबूत बालेकिल्ला म्हणून विकसित करील. -अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री‘इंडिया फर्स्ट’ आणि ‘वसुधैव कुटुंबकम’ ही भारतीय परराष्ट्र धोरणाची दोन मार्गदर्शक तत्त्वे असतील. चीनबरोबर काही सीमावादाच्या समस्या आहेत आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल.-एस. जयशंकर, परराष्ट्रमंत्रीजागतिक आणि स्थानिक पातळीवर दूरसंचार क्षेत्र, भारतीय टपाल विभाग या दोघांचीही महत्त्वाची भूमिका आहे. मी अनेक वर्षांपूर्वी २००७, २००८ आणि २००९ मध्ये या विभागात कनिष्ठ मंत्री म्हणून काम केले. त्यामुळे माझ्यासाठी या विभागाशी माझे खूप भावनिक नाते आहे.-ज्योतिरादित्य शिंदे, केंद्रीय दळणवळणमंत्रीसंसदेचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू. संख्याबळाच्या जोरावर एकमेकांना खाली पाडण्याची गरज नाही. संसदेबाहेर लोक बाहुबलाचा वापर करतात; पण सभागृहात आपण चांगल्या चर्चेसाठी भाषणाचा वापर केला पाहिजे.-किरेन रिजिजू, संसदीय कामकाजमंत्री

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारAmit Shahअमित शाह