शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

विहिरीत सापडले ३ मुलींचे मृतदेह, आईनेच केली हत्या, समोर आलं धक्कादायक कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 15:46 IST

Madhya Pradesh: मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यामध्ये तीन मुलींचे मृतदेह विहिरीत सापडल्याने खळबळ उडाली आहे. या मुलींची हत्या कुणी अन्य व्यक्तीने नाही तर त्यांच्याच आईने केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यामध्ये तीन मुलींचे मृतदेह विहिरीत सापडल्याने खळबळ उडाली आहे. या मुलींची हत्या कुणी अन्य व्यक्तीने नाही तर त्यांच्याच आईने केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे. ही महिला तिच्या मुलींची हत्या केल्यानंतर त्यांचे मृतदेह विहिरीत टाकून फरार झाली होती. दरम्यान, या महिलेला कशाची तरी बाधा झाली होती. तिच्यावर तांत्रिकाकडून उपचारही सुरू होते, असा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

धार जिल्ह्यातील श्यामपुरा येथे तीन लहान मुलींचे मृतदेह विहीरीत सापडले होते.  मिळालेल्या माहितीनुसार ही महिला खिलेडी गावातील रहिवासी होती. ती तीन मुलींसह श्यामपुरा गावात विवाहात सहभागी होण्यासाठी गेली होती. त्यानंतर ती मुलींना आंबे तोडायचे आहेत, असं सांगून निघून गेली. संध्याकाळपर्यंत न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. तेव्हा विहिरीजवळ एका मुलीचा मृतदेह सापडला. त्यानंतर आजूबाजूला पाहिले असता आणखी दोन मुलींचे मृतदेह सापडले.

माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह जप्त करून पोस्टमार्टेमसाठी पाठवले. त्यानंतर विहिरीत महिलेचा शोघ घेण्यात आला. मात्र तिचा मृतदेह सापडला नाही. त्यानंतर पोलिसांनी तिची शोधाशोध सुरू केली. तपासादरम्यान, ती एका तलावाशेजारी असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. चौकशीमध्ये तिने मुलींना विहिरीत ढकलून फरार झाल्याचे कबूल केले.

दरम्यान, हे संपूर्ण कुटुंब अंधविश्वासाची शिकार झालेले आहे. या महिलेला कुणाची तरी बाधा झाली होती. ती मानसिकदृष्ट्या त्रस्त होती. तिच्यावर तांत्रिकांकडून उपचार सुरू होते, असा दावा नातेवाईकांनी केला.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीFamilyपरिवार