शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा आमदाराने केली शंकर, विष्णूची थट्टा, तर दुर्गा, लक्ष्मी, सरस्वतीबाबत आक्षेपार्ह विधान, म्हणाले...   

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 11:28 IST

BJP MLA Bansidhar Bhagat: आपल्या विधानांमुळे नेहमीच वादाच सापडणारे उत्तराखंडचे माजी मंत्री आणि कालाढुंगी येथील भाजपा आमदार बंशीधर भगत यांनी पुन्हा एकदा अत्यंत वादग्रस्त विधान केलं आहे.

देहराडून - आपल्या विधानांमुळे नेहमीच वादाच सापडणारे उत्तराखंडचे माजी मंत्री आणि कालाढुंगी येथील भाजपा आमदार बंशीधर भगत यांनी पुन्हा एकदा अत्यंत वादग्रस्त विधान केलं आहे. हल्द्वानी येथे आंतरराष्ट्रीय बालिका दिवस कार्यक्रमात भगत यांनी हिंदूंच्या देवी-देवतांबाबत वादग्रस्त विधान केलं. त्यावेळी त्यांनी दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वतीबाबत अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी केली. त्यांनी उधळलेली मुक्ताफळे ऐकून या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिला आणि मुलींनाही धक्का बसला. 

उत्तराखंडभाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष असलेले बंशीधर भगत आंतरराष्ट्रीय बालिका दिवस कार्यक्रमासाठी हल्द्वानी येथे आले होते. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांची जीभ घसरली. ते म्हणाले की, मुलींचा नेहमी सन्मान केला जातो. तसाच मुलांनाही सन्मान मिळाला पाहिजेय यावेळी त्यांनी लक्ष्मी, सरस्वती आणि दुर्गामातेबाबतही त्यांनी आक्षेपार्ह उल्लेख केला. 

विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, विद्या, ज्ञान हवं असेल तर सरस्वतीला पटवा, शक्ती, बळ हवं असेल तर दुर्गामातेला पटवा आणि धन हवं असेल तर लक्ष्मीला पटवा, असं प्रक्षोभक विधान त्यांनी केलं. भगत एवढ्यावरच थांबले नाहीत, पुरुषांकडे काय आहे. एक पुरुष भगवान शिवजी आहेत. ते पर्वतात थंडीमध्ये जाऊन बसले आहेत. त्यांच्या डोक्यावर साप आहे आणि वरून पाणी पडतंय. तर दुसरे विष्णू समुद्राच्या तळाला लपले आहेत. दोघांमध्ये बोलणंही होत नाही, महिला सशक्तीकरण तर आधीपासून देवानेच करून ठेवलं आहे, अशी मुक्ताफळे भगत यांनी उधळली.

बंशीधर भगत यांची ही विधानं ऐकून तिथे उपस्थित असलेल्या महिलांना धक्का बसला. मात्र काही लोकांनी ही गोष्ट हसण्यावारी नेली. मात्र या विधानामुळे संतप्त झालेल्या महिलांनी पटवा शब्दाऐवजी देवी देवता यांना प्रसन्न करून घ्या हा शब्द वापण्याची परंपरा आहे, असे सांगितले.

बंशीधर भगत यांनी आक्षेपार्ह विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे. ते नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जातात. त्यांनी आधीही अशी विधाने केलेली आहेत. त्यांच्या अशा विधानांमुळे भाजपावरही अनेकदा नामुष्की ओढवली आहे. आता पुन्हा एकदा ते या विधानामुळे चर्चेत आले आहेत.  

टॅग्स :BJPभाजपाUttarakhandउत्तराखंडPoliticsराजकारण