शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
2
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
3
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
4
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
5
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
6
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
7
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
8
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
9
एक चूक अन् मिळाला १४ कोटी पगार; सुपरवायझरची गेली नोकरी
10
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
11
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
12
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
13
रक्त चाचणी आता होईल केवळ ५८२ रुपयांत; हिमोफिलिया, व्हॉन विलेब्रडग्रस्तांचे पैसे वाचणार
14
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
15
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
16
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
17
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
18
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
19
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
20
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर

भाजपा अन् जेडीयूमध्ये असा निर्माण झाला दुरावा; नेमकी कुठे अचानक माशी शिंकली, पाहा...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 08:25 IST

लालू - नितीश यांच्यात पुन्हा मैत्री; चिराग पासवान- आरसीपी सिंह निमित्त

- शरद गुप्तानवी दिल्ली : तीन महिन्यांपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे आपले सरकारी निवासस्थान सोडून लालू प्रसाद यादव यांच्या शेजारच्या बंगल्यात राहावयास गेले तेव्हापासून दोघांत दृढ सलोखा झाला.  त्याची निष्पत्ती मंगळवारी  नवीन राजकीय समीकरणांतून दिसून आली. अनेक कारणे आहेत, ज्यामुळे लालुंसोबत पुन्हा मैत्री करण्याची गरज नितीश कुमार यांना पडली.

लालू प्रसाद आणि नितीश कुमार यांच्यात एवढा सलोखा वाढला की, ६ जुलै रोजी नितीश कुमार हे पाटण्यातील एका खासगी इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले लालू प्रसाद यादव यांना भेटण्यास गेले. त्यांनी लालू प्रसाद यांना सरकारी खर्चाने उपचारासाठी दिल्लीला पाठविण्याची आणि गरज पडल्यास उपचारासाठी सिंगापूरला नेण्याचे घोषित केले. 

नितीश कुमार यांची सहमती नसताना पंतप्रधान मोदी यांनी जेडीयूच्या कोट्यातून आरसीपी सिंह यांना केंद्रीय मंत्रिपदी नियुक्त करून नितीश कुमार यांना आणखी नाराज केले. नितीश कुमार यांनी आरसीपी सिंह यांना दुसऱ्यांदा राज्यसभेवर पाठविण्यास नकार तर दिलाच; शिवाय अधिक संपत्ती जमविल्यासंदर्भात नोटीसही पाठविली होती. यादरम्यान नितीश कुमार यांना असे वाटायचे की, भाजप जेडीयूचे आमदार फोडून स्वबळावर सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करीत आहे. अशा लोकांना हेरून त्यांनी त्यांच्याविरुद्ध कारवाई सुरू केली. 

दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी म्हटले होते की, भाजप विचारधारेचा पक्ष आहे. अन्य सर्व पक्ष संपतील. जे झाले नाहीत, तेही लवकरच नामशेष होतील. केवळ भाजपच असेल. त्यांचे हे वक्तव्य नितीश कुमार यांच्यासह विरोधी पक्ष आणि मित्रपक्षांनी इशाराच मानला. जेडीयूने राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवारांना पाठिंबा देऊनही नितीश कुमार हे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्यावेळी गेले नव्हते.

तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निरोप समारंभानिमित्त २२ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित प्रीतीभोजनातही ते सहभागी झाले नव्हते. २५ जुलै रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या शपथविधी सोहळ्यातही ते सहभागी नव्हते. कोरोनामुळे ते रविवारी आयोजित निती आयोगाच्या बैठकीलाही गेले नव्हते; तथापि, त्याच दिवशी पाटण्यातील अनेक सार्वजनिक कार्यक्रमांत दिसले. 

चिराग पासवान यांचा भाजपकडून वापर

मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने चिराग पासवान यांच्या माध्यमातून जेडीयूचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला होता. मागच्या निवडणुकीत चिराग पासवान यांनी सर्व जागांवर उमेदवार उभे केले होते; परंतु, भाजपविरुद्ध उमेदवार मैदानात उतरविले नव्हते. परिणामी जेडीयूच्या आमदारांची संख्या २०२० मध्ये ४३वर आली, तर भाजपचे संख्याबळ वाढून ५३ वरून ७४ झाले. २०१५ मध्ये जेडीयूचे संख्याबळ ७२ होते. चिराग पासवान हे स्वत:ला मोदी यांचे हनुमान म्हणतात.  त्यांना आजही राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकांना बोलावले जाते. हा प्रकार नितीश कुमार यांच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखा होता.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीBiharबिहार