शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
3
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
4
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
5
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
6
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
7
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
8
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
9
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
10
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
11
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
12
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
13
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
14
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
15
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
16
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
17
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
18
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
19
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
20
५० रुपये प्रति तास या हिशोबाने भाड्याने मिळतायेत 'Friend'; केरळमधील अजब ट्रेंडनं वाढवलं टेन्शन

भाजपा अन् जेडीयूमध्ये असा निर्माण झाला दुरावा; नेमकी कुठे अचानक माशी शिंकली, पाहा...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 08:25 IST

लालू - नितीश यांच्यात पुन्हा मैत्री; चिराग पासवान- आरसीपी सिंह निमित्त

- शरद गुप्तानवी दिल्ली : तीन महिन्यांपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे आपले सरकारी निवासस्थान सोडून लालू प्रसाद यादव यांच्या शेजारच्या बंगल्यात राहावयास गेले तेव्हापासून दोघांत दृढ सलोखा झाला.  त्याची निष्पत्ती मंगळवारी  नवीन राजकीय समीकरणांतून दिसून आली. अनेक कारणे आहेत, ज्यामुळे लालुंसोबत पुन्हा मैत्री करण्याची गरज नितीश कुमार यांना पडली.

लालू प्रसाद आणि नितीश कुमार यांच्यात एवढा सलोखा वाढला की, ६ जुलै रोजी नितीश कुमार हे पाटण्यातील एका खासगी इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले लालू प्रसाद यादव यांना भेटण्यास गेले. त्यांनी लालू प्रसाद यांना सरकारी खर्चाने उपचारासाठी दिल्लीला पाठविण्याची आणि गरज पडल्यास उपचारासाठी सिंगापूरला नेण्याचे घोषित केले. 

नितीश कुमार यांची सहमती नसताना पंतप्रधान मोदी यांनी जेडीयूच्या कोट्यातून आरसीपी सिंह यांना केंद्रीय मंत्रिपदी नियुक्त करून नितीश कुमार यांना आणखी नाराज केले. नितीश कुमार यांनी आरसीपी सिंह यांना दुसऱ्यांदा राज्यसभेवर पाठविण्यास नकार तर दिलाच; शिवाय अधिक संपत्ती जमविल्यासंदर्भात नोटीसही पाठविली होती. यादरम्यान नितीश कुमार यांना असे वाटायचे की, भाजप जेडीयूचे आमदार फोडून स्वबळावर सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करीत आहे. अशा लोकांना हेरून त्यांनी त्यांच्याविरुद्ध कारवाई सुरू केली. 

दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी म्हटले होते की, भाजप विचारधारेचा पक्ष आहे. अन्य सर्व पक्ष संपतील. जे झाले नाहीत, तेही लवकरच नामशेष होतील. केवळ भाजपच असेल. त्यांचे हे वक्तव्य नितीश कुमार यांच्यासह विरोधी पक्ष आणि मित्रपक्षांनी इशाराच मानला. जेडीयूने राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवारांना पाठिंबा देऊनही नितीश कुमार हे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्यावेळी गेले नव्हते.

तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निरोप समारंभानिमित्त २२ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित प्रीतीभोजनातही ते सहभागी झाले नव्हते. २५ जुलै रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या शपथविधी सोहळ्यातही ते सहभागी नव्हते. कोरोनामुळे ते रविवारी आयोजित निती आयोगाच्या बैठकीलाही गेले नव्हते; तथापि, त्याच दिवशी पाटण्यातील अनेक सार्वजनिक कार्यक्रमांत दिसले. 

चिराग पासवान यांचा भाजपकडून वापर

मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने चिराग पासवान यांच्या माध्यमातून जेडीयूचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला होता. मागच्या निवडणुकीत चिराग पासवान यांनी सर्व जागांवर उमेदवार उभे केले होते; परंतु, भाजपविरुद्ध उमेदवार मैदानात उतरविले नव्हते. परिणामी जेडीयूच्या आमदारांची संख्या २०२० मध्ये ४३वर आली, तर भाजपचे संख्याबळ वाढून ५३ वरून ७४ झाले. २०१५ मध्ये जेडीयूचे संख्याबळ ७२ होते. चिराग पासवान हे स्वत:ला मोदी यांचे हनुमान म्हणतात.  त्यांना आजही राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकांना बोलावले जाते. हा प्रकार नितीश कुमार यांच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखा होता.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीBiharबिहार