शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Asadudditn owaisee: 'भाजपने गरिबांविरुद्ध युद्धच पुकारले, कुठलिही नोटीस न देता घरांवर बुलडोझर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 18:30 IST

सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची प्रत प्राप्त होईपर्यंत कारवाई सुरुच राहिल अशी रोखठोक भूमिका प्रशासनानं घेतली आहे

नवी दिल्ली - उत्तर दिल्ली महापालिकेनं आज दिल्लीच्या जहांगीरपुरी येथील हिंसाचाराच्या आरोपींच्या बेकायदेशीर घरं आणि मालमत्तांवर मोठी कारवाई करत बुलडोजर चालवण्यास सुरुवात केली आहे. पण कारवाईला सुरुवात होण्याच्या काही मिनिटांत सुप्रीम कोर्टानं जहांगीरपुरीमधील एमसीडीच्या कारवाईला स्थगितीचे आदेश दिले. आता याप्रकरणावर गुरुवारी सुनावणी होणार असल्याचं कोर्टानं आदेश जारी केलेत. विशेष म्हणजे पालिकेकडून अजूनही कारवाई थांबविण्यात आलेली नाही. या कारवाईनंतर सोशल मीडियात फोटो व्हायरल झाले आहेत. तर, एमआयएमचे नेते असदुद्दीन औवेसींनी ही कारवाई म्हणजे गरिब मुस्लीमांना शिक्षा असल्याचं म्हटलं आहे. 

सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची प्रत प्राप्त होईपर्यंत कारवाई सुरुच राहिल अशी रोखठोक भूमिका प्रशासनानं घेतली आहे. त्यामुळे या परिसरात सकाळपासूनच हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळला. प्रशासनाने पोलीस बळाचा वापर करुन अनेकांच्या घरावर आणि दुकानांवर बुलडोझर चालवला. एमआयएमचे प्रमुख असुदुद्दीन औवेसींनी या कारवाईविरुद्ध ट्विटवरुन आवाज उठवला आहे. त्यांनी कारवाईचे फोटो ट्विटरवरुन शेअर करत दिल्ली सरकार आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 

भाजपने एकप्रकारे गरिबांविरुद्ध युद्धच पुकारले आहे. अतिक्रमणाच्या नावाखाली युपी आमि एमपीप्रमाणे लोकांची घरे उध्वस्त केली जात आहेत. या नागरिकांना न्यायालयात जाण्याची संधीही देण्यात आली नाही. गरिब मुस्लींमांना जिवंत राहण्याची शिक्षा दिली जातेय. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या दुटप्पी भूमिकेवर स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी असुदुद्दीने औवेसींनी केली आहे. दिल्लीतील केजरीवाल सरकार हे पीडब्लूडीच्या या पाडकाम मोहिमेचा भाग आहे का, याच विश्वासघात आणि भ्याडपणासाठी जहिंगीरपुरीच्या लोकांनी त्यांना मतदान केले का?, असा सवाल औवेसींनी विचारला आहे. कायदेशीरपणा किंवा नैतिकतेचा ढोंगही आता करता येणार नाही, असा टोलाही औवेसींनी लगावला आहे. 

हिंसाचारानंतर प्रशासनाकडून कडक कारवाई

हनुमान जयंतीच्या दिवशी काही किरकोळ वादातून जहांगीरपुरी भागात हिंसाचार उसळला होता. दोन गटांमध्ये तुफान दगडफेक आणि सार्वजनिक मालमत्तेचं मोठं नुकसान यात झालं. पोलीस प्रशासनानं याप्रकरणातील संबंधित आरोपींना अटक केली आहे. उत्तर दिल्ली महापालिकेनं याप्रकरणी कठोर भूमिका घेत आरोपींच्या बेकायदेशीर मालमत्तांवर बुलडोजर चालवला जाणार असल्याचा निर्णय जारी केला होता. त्यानुसार २० आणि २१ एप्रिल रोजी जहांगीरपुरी भागातील बेकायदेशीर मालमत्तांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. आज सकाळी मोठ्या पोलीस बंदोबस्तात या कारवाईला सुरुवात झाली. 

सुप्रीम कोर्टाकडून कारवाई थांबवण्याचे आदेश

दिल्ली पोलिसांचे जवळपास दीड हजाराहून अधिक पोलीस या कारवाईवेळी उपस्थित असून बुलडोझरच्या सहाय्यानं जहांगीरपुरीमधील घरांवर कारवाई करण्यात येत आहे. जहांगीरपुरीमधील कारवाईचा मुद्दा थेट सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात हिंसाचाराच्या आरोपींविरोधात त्यांच्या मालमत्तेवर केली जाणारी पाडकामाच्या कारवाई विरोधात जमीयत-ए-हिंदनं याचिका दाखल केली होती. आता याच जमीयत-ए-हिंदनं सुप्रीम कोर्टात जहांगीरपुरीमधील कारवाईबाबतही याचिका दाखल केली. सुप्रीम कोर्टानं यावर आज तातडीनं सुनावणी करत उत्तर पालिका प्रशासनाला कारवाई स्थगित करण्याचे आदेश दिले. कारवाई आता ज्या स्थितीत आहे त्याच स्थितीत थांबवली जावी असे निर्देश कोर्टानं दिले. पण याबाबत जेव्हा पालिका आयुक्तांना विचारण्यात आलं असता त्यांनी आम्हाला कोर्टाच्या आदेशाची प्रत अद्याप मिळालेली नाही. तोवर कारवाई सुरुच राहणार असल्याचा पवित्रा घेतला आहे. 

कारवाईत अनेक घरं उध्वस्त

एमसीडीचे महापौर राजा इकबाल सिंह यांनी जोवर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची प्रत प्राप्त होत नाही, तोवर जारवाई सुरूच ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे. दुसरीकडे जहांगीरपुरीमध्ये सध्या गोंधळाचं वातावरण सुरू असून कारवाईमध्ये अनेक घरं उद्ध्वस्त करण्यात आली आहे. स्थानिक लोक अतिक्रमाणावरील कारवाईचा विरोध करत आहेत. पोलिसांनी काहींना अटक देखील केली आहे. तर याचिकाकर्ते पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात पोहोचले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशांचं पालन केलं जात नसल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. 

टॅग्स :delhiदिल्लीEnchroachmentअतिक्रमणArvind Kejriwalअरविंद केजरीवालMuslimमुस्लीमAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी