शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

लाल किल्ल्यामागील परिसरही जलमय; पाण्याची पातळी आणखी वाढल्यास दिल्लीपुढे मोठं संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 13:41 IST

यमुनेच्या पाण्याची पातळी वाढल्याने वजीराबाद, चंद्रावल आणि ओखला येथील वॉटर ट्रीटमेंट प्लान्ट बंद करावे लागले आहेत.

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील अनेक भागात पुराचा धोका वाढला आहे. हथनी कुंड बॅरेजमधून पाणी सोडल्यानंतर यमुना नदीच्या पाण्यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. दिल्लीतील काही रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. यमुना बँक मेट्रो स्थानकावरील प्रवेश आणि बाहेर जाण्याचे मार्ग तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. याशिवाय अनेक जलशुद्धीकरण केंद्रे बंद करावी लागली.

यमुनेच्या पाण्याची पातळी वाढल्याने वजीराबाद, चंद्रावल आणि ओखला येथील वॉटर ट्रीटमेंट प्लान्ट बंद करावे लागले आहेत. त्यामुळे दिल्लीतील काही भागात पाण्याची समस्या निर्माण होणार आहे. यमुनेचे पाणी कमी होताच आम्ही ते लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न करू. जलसंकटामुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी मुख्यमंत्री केजरीवाल वजीराबाद जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. 

यमुनेच्या काठावरील अनेक भाग पाण्याखाली जात आहे. रिंगरोडपर्यंत पाणी पोहोचले आहे. काश्मिरे गेट बसस्थानकही धोकादायक स्थितीत आहे. राजघाट, आयटीओ, पुराणा किला परिसर जलमय झाला आहे. लाल किल्ल्यामागील परिसरात देखील पाणी शिरले आहे. जुनी दिल्ली रेल्वे स्थानकाकडे जाणारे रस्ते आणि रस्ते पाण्याखाली गेले आहेत. सखल भागातील घरे पाण्यात बुडाली आहेत.

यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. दिल्लीतील अनेक भाग पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. यमुनेच्या पाण्याची पातळी २०८ मीटरच्या पुढे गेली आहे. यापूर्वी १९७८मध्ये प्रथमच लोखंडी पुलाजवळील पाण्याची पातळी २०७.४९ मीटर नोंदवण्यात आली होती. यमुनेला आलेल्या पुरामुळे सर्व मोठ्या नाल्यांचा प्रवाह पूर्णपणे थांबला आहे. यमुना नदीच्या पाण्याची पातळी आणखी वाढल्यास दिल्लीसाठी मोठे संकट उभे राहू शकते.

हिमाचलमध्ये २००० पर्यटकांची सुटका 

हिमाचलच्या कासोलमध्ये अडकलेल्या किमान २,००० पर्यटकांना बाहेर काढण्यात आले आहे. हिमाचलमध्ये शिमला-किन्नौर मार्गावर एक वाहन सतलज नदीत पडून एकाच कुटुंबातील चार सदस्य बेपत्ता झाले आहेत.  पंजाबच्या फरीदकोट जिल्ह्यात घराचे छत कोसळून एका दाम्पत्यासह त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. पंजाबच्या पटियाला, रूपनगर, मोगा, लुधियाना, मोहाली आदी भागांतून १० हजारांवर लोकांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. उत्तराखंडमध्ये पौडी जिल्ह्यात एक कार पूर आलेल्या नदीत कोसळून त्यातील पाचपैकी तीन व्यक्तींचा मृत्यू झाला.

टॅग्स :floodपूरdelhiदिल्लीRed Fortलाल किल्लाArvind Kejriwalअरविंद केजरीवाल