शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी मोर्चादरम्यानच मोदी सरकारचं विधान, MSP संदर्भात कृषिमंत्र्यांनी संसदेत दिलं मोठं आश्वासन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 18:21 IST

महत्वाचे म्हणजे, शेतकरी आपल्या मागण्या घेऊन दिल्लीच्या दिशेने जाण्याचा प्लॅन करत असतानाच, शिवराज सिंह यांनी हे आश्वासन दिले आहे...

मोदी सरकार सर्व शेतमालाची खरेदी किमान आधारभूत किंमतीवर करेल, असे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे. चौहान यांनी शुक्रवारी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान किमान आधारभूत किंमत (एमएसपी) या विषयावरील पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना शेतकरी बांधवांना हे आश्वासन दिले आहे.

महत्वाचे म्हणजे, शेतकरी आपल्या मागण्या घेऊन दिल्लीच्या दिशेने जाण्याचा प्लॅन करत असतानाच, शिवराज सिंह यांनी हे आश्वासन दिले आहे. सभागृहात माहिती देताना चौहान म्हणाले, “मला तुमच्या (अध्यक्ष) मार्फत सभागृहाला आश्वासन द्यायचे आहे की, शेतकऱ्यांच्या सर्व शेतमालाची किमान आधारभूत किंमतीवर खरेदी केली जाईल. हे मोदी सरकार आहे आणि मोदींची गॅरंटी पूर्ण करण्याची गॅरंटी आहे."

दस्तऐवज सभागृहाच्या पटलावर ठेवण्यास सहमत -चौहान म्हणाले, "दुसऱ्या बाजूला आमचे मित्र जेव्हा सत्तेत होते, तेव्हा त्यांनी रेकॉर्डवर सांगितले होते की, आम्ही एम एस स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकारू शकत नाहीत. विशेषत: उत्पादनाच्या खर्चापेक्षा 50 टक्के अधिक देण्याचा मुद्दा. माझ्याकडे रेकॉर्ड आहे. यावेळी त्यांनी, आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ माजी कृषी राज्यमंत्री कांतीलाल भुरिया, कृषिमंत्री शरद पवार आणि केव्ही थॉमस यांचा हवालाही दिला.

चौहान यांच्या या विधानानंतर, वरिष्ठ सभागृहाचे अध्यक्ष जगदीप धनखर यांनी त्यांना त्यांच्या दाव्याच्या पुष्टीसाठी कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. चौहान यांनीही, हे मान्य केले. एवढेच नाही तर, गत यूपीए सरकारने शेतकऱ्यांचा कधीही सन्मान केला नाही आणि कधीही शेतकऱ्यांच्या लाभदायक किंमतींच्या मागण्यांवर गांभीर्याने विचारही केला नाही, असा दावाही त्यांनी केला.

50 टक्क्यांपर्यंत मिळतोय लाभ -कृषिमंत्री पुढे म्हणाले, "मी आपल्या माध्यमाने सभागृहाला आश्वास्त करू इच्छितो की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 पासून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर 50 टक्के लाभ देऊन किमान आधारभूत किंमत मोजण्याचा निर्णय घेतला आहे." याशिवाय, मोदी सरकार आधीपासूनच शेतकऱ्यांना लाभदायक भाव देत आहे, असा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :shivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाFarmerशेतकरीRajya Sabhaराज्यसभा