शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

१७ वर्षांच्या तुरुंगवासानंतर आरोपी अल्पवयीन असल्याचं सिद्ध; सुप्रीम कोर्टाकडून सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 08:39 IST

१७ वर्षे तुरुंगात काढणाऱ्या गुन्हेगाराची सुटका; प्रदीर्घ काळ चालला कायदेशीर संघर्ष

नवी दिल्ली: हत्या प्रकरणात १७ वर्षांचा तुरुंगवास भोगल्यानंतर गुन्हेगार अल्पवयीन असल्याचं सिद्ध झालं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं त्याची सुटका करण्याचे आदेश दिले. या प्रकरणात आरोपीवर खुनाचा गुन्हा सिद्ध झाला. त्यामुळे त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. यानंतर दोषी व्यक्तीनं अर्ज दाखल करत घटनेच्या वेळी आपण अल्पवयीन असल्याचा दावा केला. त्यामुळे त्याची सुटका करण्यात आली. 

घटना उत्तर प्रदेशातील आहे. आरोपीला खालच्या कोर्टानं हत्या प्रकरणात १६ मे २००६ रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यानंतर प्रकरण अलाहाबाद उच्च न्यायालयात पोहोचलं. उच्च न्यायालयात याचिका फेटाळण्यात आली. त्यामुळे दोषीनं सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. सर्वोच्च न्यायालयानं २००९ मध्ये याचिका फेटाळून लावली.

२०२१ मध्ये याचिकाकर्त्यानं पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला. घटना घडली त्यावेळी आपण अल्पवयीन होतो. त्यामुळे मला जे जे कायद्याचा लाभ मिळायला हवा. माझी सुटका व्हायला हवी, अशी मागणी त्यानं केली. आरोपीनं दाखल केलेल्या हायस्कूल आणि इंटरमीडिएट प्रमाणपत्राची पडताळणी करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयानं महाराजगंजच्या जे जे बोर्डाला दिल्या. त्यानंतर जे जे बोर्डानं आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला. घटना घडली त्यावेळी दोषी व्यक्ती अल्पवयीन होती. त्याचं वय १७ वर्षे ७ महिने २३ दिवस होतं, असं जे जे बोर्डानं अहवालात नमूद केलं.

सर्वोच्च न्यायालयानं जे जे बोर्डाच्या अहवालावर विचार केला. 'दोषी व्यक्ती घटनेवेळी अल्पवयीन होता. जे जे कायद्याच्या अंतर्गत हा खटला चालल्यास त्याला कमाल तीन वर्षे स्पेशल होममध्ये ठेवण्याची तरतूद आहे. मात्र या प्रकरणात आरोपीनं १७ वर्षांचा तुरुंगवास भोगला आहे. त्यामुळे आता त्याला स्पेशल होममध्ये ठेवण्याची गरज नाही,' असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आणि दोषी व्यक्तीच्या सुटकेचे आदेश दिले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय