शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
3
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
4
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
5
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
6
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
7
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
8
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
9
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
10
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
11
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
12
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
13
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
14
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
15
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
16
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
17
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
18
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
19
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
20
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  

Jaya Bachchan : "...म्हणून मला राग अनावर होतो"; जया बच्चन यांनी मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 17:13 IST

Jaya Bachchan : जया बच्चन यांनी त्यांच्या निरोपाच्या भाषणादरम्यान सभागृहातील सर्व सदस्यांची माफी मागितली आहे. मला राग आला असला तरी कुणाला दुखावण्याचा हेतू नव्हता, असं त्यांनी स्पष्ट केलं. 

समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन या आठवड्यात संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान जगदीप धनखड यांच्यावर टीकास्त्र सोडल्यामुळे चर्चेत होत्या. मात्र आता जया बच्चन यांनी त्यांच्या निरोपाच्या भाषणादरम्यान सभागृहातील सर्व सदस्यांची माफी मागितली आहे. मला राग आला असला तरी कुणाला दुखावण्याचा हेतू नव्हता, असं त्यांनी स्पष्ट केलं. 

"लोक मला अनेकदा विचारतात की मला राग का येतो?... हा माझा स्वभाव आहे, मी स्वतःला बदलू शकत नाही. जर मला एखादी गोष्ट आवडली नाही किंवा ती पटली नाही, तर मला राग अनावर होतो. जर मी तुमच्यापैकी कोणाशीही अनुचित वर्तन केलं असेल किंवा काही पर्सनल झालं असेल तर मी माफी मागते" असं जया बच्चन यांनी राज्यसभेत आपल्या निरोपाच्या भाषणात म्हटलं आहे.

ज्या 68 सदस्यांचा राज्यसभेतील कार्यकाळ फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत पूर्ण होत आहे, त्यात जया बच्चन यांचाही समावेश आहे. आपल्या 20 वर्षांच्या अनुभवांचा उल्लेख करताना जया बच्चन म्हणाल्या, "20 वर्षे हा आयुष्यातील खूप मोठा काळ आहे. मला अनेक चांगले-वाईट अनुभव आले. सर्वात चांगला अनुभव म्हणजे माझं कुटुंब खूप मोठं झालं"

"माझे सहकारी मला अनेकदा विचारतात की, मला इतका राग का येतो?... मी काय करू, माझा स्वभावच असा आहे की मला जे काही चुकीचं वाटतं, ते मी सहन करू शकत नाही, मी ते व्यक्त करते. माझ्या बोलण्याने जर कोणाला दुखावलं असेल तर मी माफी मागते" असं जया बच्चन यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Jaya Bachchanजया बच्चन