शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

Jaya Bachchan : "...म्हणून मला राग अनावर होतो"; जया बच्चन यांनी मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 17:13 IST

Jaya Bachchan : जया बच्चन यांनी त्यांच्या निरोपाच्या भाषणादरम्यान सभागृहातील सर्व सदस्यांची माफी मागितली आहे. मला राग आला असला तरी कुणाला दुखावण्याचा हेतू नव्हता, असं त्यांनी स्पष्ट केलं. 

समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन या आठवड्यात संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान जगदीप धनखड यांच्यावर टीकास्त्र सोडल्यामुळे चर्चेत होत्या. मात्र आता जया बच्चन यांनी त्यांच्या निरोपाच्या भाषणादरम्यान सभागृहातील सर्व सदस्यांची माफी मागितली आहे. मला राग आला असला तरी कुणाला दुखावण्याचा हेतू नव्हता, असं त्यांनी स्पष्ट केलं. 

"लोक मला अनेकदा विचारतात की मला राग का येतो?... हा माझा स्वभाव आहे, मी स्वतःला बदलू शकत नाही. जर मला एखादी गोष्ट आवडली नाही किंवा ती पटली नाही, तर मला राग अनावर होतो. जर मी तुमच्यापैकी कोणाशीही अनुचित वर्तन केलं असेल किंवा काही पर्सनल झालं असेल तर मी माफी मागते" असं जया बच्चन यांनी राज्यसभेत आपल्या निरोपाच्या भाषणात म्हटलं आहे.

ज्या 68 सदस्यांचा राज्यसभेतील कार्यकाळ फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत पूर्ण होत आहे, त्यात जया बच्चन यांचाही समावेश आहे. आपल्या 20 वर्षांच्या अनुभवांचा उल्लेख करताना जया बच्चन म्हणाल्या, "20 वर्षे हा आयुष्यातील खूप मोठा काळ आहे. मला अनेक चांगले-वाईट अनुभव आले. सर्वात चांगला अनुभव म्हणजे माझं कुटुंब खूप मोठं झालं"

"माझे सहकारी मला अनेकदा विचारतात की, मला इतका राग का येतो?... मी काय करू, माझा स्वभावच असा आहे की मला जे काही चुकीचं वाटतं, ते मी सहन करू शकत नाही, मी ते व्यक्त करते. माझ्या बोलण्याने जर कोणाला दुखावलं असेल तर मी माफी मागते" असं जया बच्चन यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Jaya Bachchanजया बच्चन