शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
6
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
7
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
8
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
9
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
10
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
11
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
12
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
13
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
14
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
15
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
16
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
17
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
18
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
19
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
20
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार

सुनावणीच्या अखेरच्या टप्प्यात सरन्यायाधीशांचा तो प्रश्न आणि निरीक्षण, ठाकरे गटाची अडचण? धाकधूक वाढली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 17:07 IST

Supreme Court: सुनावणी शेवटच्या टप्प्यात आली असताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी विचारलेल्या एका प्रश्नामुळे ठाकरे गटाची धाकधुक वाढली आहे.

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये झालेलं बंड आणि त्यानंतर राज्यात झालेल्या सत्तांतराबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी पूर्ण झाली आहे. या सुनावणीमध्ये एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचे वकील, ठाकरे गटाच्या वकीलांनी जोरदार युक्तिवाद केले. दोन्हीकडच्या वकिलांचा युक्तिवाद आणि सरन्यायाधीशांकडून त्याबाबत विचारण्यात येत असलेले प्रतिप्रश्न यामुळे या सुनावणीला नवनवी वळणं मिळालं आहेत. दरम्यान, सुनावणी शेवटच्या टप्प्यात आली असताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी विचारलेल्या एका प्रश्नामुळे ठाकरे गटाची धाकधुक वाढली आहे.

आज सुनावणीदरम्यान, ठाकरे गटाच्या वकिलांकडून पूर्वस्थिती पुन:स्थापित करून ठाकरे सरकार पुन्हा स्थापित करावे अशी विनंती कोर्टात करण्यात आली होती. त्यावर सरन्यायाधीसांनी पुम्ही सरकार पुन:स्थापित करा असं म्हणत आहात, पण तुम्ही तर राजीनामा दिला आहे, असा सवाल केला. त्यावर ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी त्या राजीनाम्याला काही उत्तर नाही असं उत्तर दिलं. त्यावर सरन्यायाधीशांनी इथे ज्या सरकारने राजीनामा दिलाय, त्या सरकारला पुनस्थापित करण्याची मागणी केली जात आहे अशी टिप्पणी केली. 

तर न्यायमूर्ती शाह यांनी ज्या मुख्यमंत्र्यांनी फ्लोअर टेस्टचा सामना केला नाही त्याला कोर्ट पुनस्थापित कसं करू शकते असा प्रश्न केला. त्यावर ठाकरे गटाचे वकील सिंघवी यांनी न्यायव्यवस्थेने कुणाला पुनस्थापित करायचे नाही आहे. तर पूर्वस्थिती बहाल करायची आहे, असं उत्तर  दिलं.  

त्यानंतर सिंघवी यांनी राज्यपालांनी उचललेल्या बेकायदेशीर पावलांबाबतची केस कोर्टात प्रलंबित असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर सरन्यायाधीशांनी केवळ राज्यपालांनी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यास सांगितले म्हणून उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला का असा प्रश्न विचारला.  तसेच विश्वासदर्शक ठराव विरोधात जाणार याची कल्पना आल्याने उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला, हेही तुम्ही प्रांजळपणे मान्य करताय, असं निरीक्षण सरन्यायाधीशांनी नोंदवलं. त्यामुळे सत्तासंघर्षाच्या सुनावणीतील अखेरच्या टप्प्यात सरन्यायाधीशांनी नोंदवलेलं हे निरीक्षण निर्णायक ठरू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

दरम्यान, राज्यातील सत्तासंघर्षावर काल झालेल्या सुनावणीवेळी राज्यपालांची बाजू मांडणाऱ्या तुषार मेहता यांच्यावर सरन्यायाधीशांकडून प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली होती. तसेच या सर्व घटनाक्रमातील राज्यपालांच्या भूमिकेवर ताशेरे ओढण्यात आले होते. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे