शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
3
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
4
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
5
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
6
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
7
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
8
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
9
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
10
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
11
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
12
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
13
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
14
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
15
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
16
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
17
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
18
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
19
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
20
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 

आम्हाला अभिनंदनसारखं व्हायचंय; लष्करात दाखल होण्यासाठी लोटले २००० काश्मिरी तरुण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 14:53 IST

भारतावर मनापासून प्रेम करणारेही हजारो काश्मिरी आहेत आणि ते देशरक्षणासाठीही सज्ज आहेत.

भारताने पाकिस्तानवर केलेला एअर स्ट्राईक, विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी दाखवलेलं शौर्य आणि एकूणच भारतीय लष्कराचा 'जोश' याचे सकारात्मक परिणाम जम्मू-काश्मीरमध्ये पाहायला मिळत आहेत. ज्या खोऱ्यात प्रामुख्याने भारतविरोधी कारवाया पाहायला मिळतात, तिथे देशप्रेमाचा सूर ऐकू येऊ लागलाय. अभिनंदन वर्धमान हे तर काश्मिरी तरुणांचे आदर्शच झालेत. त्यांच्यासारखा पराक्रम करण्यासाठी आम्हाला लष्करात दाखल व्हायचंय, असं म्हणत दोन हजारांहून अधिक तरुण आज जम्मूतील डोडा स्पोर्ट्स स्टेडियममध्ये सैन्य भरतीसाठी पोहोचले. 

देशाची आणि माझ्या कुटुंबाची सेवा करण्यासाठी भारतीय लष्करात सहभागी व्हायची इच्छा मुबस्सीर अली या तरुणानं बोलून दाखवली. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्याबद्दल तरुणाईमध्ये आदराची भावना पाहायला मिळाली. पाकिस्तानच्या छळाला न जुमानता अभिनंदन यांनी ज्या धीरानं, जिद्दीनं परिस्थितीचा सामना केला आणि मायदेशात परतले, त्या धाडसाला तरुणाई सलाम करतेय. त्यांचं शौर्य पाहूनच लष्करात येण्याची प्रेरणा मिळाल्याचं अनेकांनी प्रांजळपणे सांगितलं.  

 पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर, एका विशिष्ट वर्गामुळे, काश्मिरी जनतेबद्दल देशवासीयांच्या मनात संशयाची भावना आहे. जैश-ए-मोहम्मदनं या आत्मघातकी हल्ल्यासाठी काश्मिरी तरुणाचाच वापर केल्यानं, इथल्या तरुणाईकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. परंतु, भारतावर मनापासून प्रेम करणारेही हजारो काश्मिरी आहेत आणि ते देशरक्षणासाठीही सज्ज आहेत, हेच लष्कर भरतीतील काश्मिरी तरुणांची संख्या पाहून लक्षात येतं. याआधी बारामुल्ला इथेही सैन्य भरतीसाठी हजारो तरुण रांगेत दिसले होते. त्यांच्यातील ही देशप्रेमाची ज्योत तेवत ठेवणं ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. 

टॅग्स :Abhinandan Varthamanअभिनंदन वर्धमानIndian Armyभारतीय जवानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक