शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

“२०२४ पर्यंत POK भारतात आणून दाखवा, अखंड हिंदुस्थानाचे स्वप्न...”; संजय राऊतांचे थेट आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 23:04 IST

Sanjay Raut Reaction On POK: मोदींनी काश्मिरी पंडितांना गॅरंटी दिली होती. ती पूर्ण करा, अन्यथा तेव्हा खोटे बोललो, हे देशासमोर मान्य करा, अशी टीका संजय राऊतांनी केली.

Sanjay Raut Reaction On POK: जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय योग्य होता, असा ऐतिहासिक निकाल  सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्याबरोबरच जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा आणि राज्यात विधानसभा निवडणूक घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे आदेश दिले आहेत. या निर्णयावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्राला थेट आव्हान दिले आहे.

मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे. केंद्रातील मोदी-शाहांचे सरकार आता तिथे निवडणुका घेऊ शकतात. माहिती नाही, ते कधी घेतील. मात्र, २०१४ मध्ये सत्तेत येताना काश्मिरी पंडितांना काश्मीर खोऱ्यात घरवापसीचे आश्वासन दिले होते. मोदी यांनी ही गॅरंटी दिली होती. मोदी प्रत्येक निवडणुकीत काही ना काही गॅरंटी देतात. गॅरंटी कार्ड दाखवतात. मग आता काश्मिरी पंडितांना दिलेल्या गॅरंटीचे काय करणार, अशी विचारणा संजय राऊत यांनी केली.

२०२४ च्या निवडणुकांदरम्यान काश्मिरी पंडितांची घरवापसी होणार का?

२०२४ च्या निवडणुकांदरम्यान काश्मिरी पंडितांची घरवापसी होणार का, त्यांना मतदानाचा हक्क देणार का, असा सवाल करत, त्याशिवाय तेथे निवडणुका होणार नाहीत. याची गॅरंटी मोदीजींना द्यावीच लागेल. अन्यथा काश्मिरी पंडितांना दिलेले आश्वासन हे जुमलेबाजी होती. त्यावेळेस खोटे बोललो, हे देशासमोर मान्य करा. सन २०२४ पर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारतात आणू शकत असाल तर आणून दाखवा. तीही तुमची गॅरंटी आहे. अखंड हिंदुस्थानाचे स्वप्न साकार होईल. जम्मू काश्मीरचा सगळा भाग भारतात आणणे, काश्मिरी पंडितांची घरवापसी करणे ही सगळी गॅरंटी तुम्ही दिली होती. ते सगळे घेऊन जनतेसमोर जावे, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले. 

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सुचनेनुसार निवडणूक घेण्याआधी पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेतले तर संपूर्ण काश्मीरमध्ये एकत्रित निवडणक घेता येईल. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तो कायम आपला भाग राहील. काश्मीर सोडून गेलेल्या काश्मिरी पंडितांना परत काश्मीरमध्ये आणण्याची गॅरंटी कोण देणार? येणाऱ्या निवडणुकांआधी ते परत येतील याची गँरंटी कोणी देईल का? पंतप्रधान मोदी तरी देतील का? कारण हल्ली गॅरंटीचा काळ आहे. ते सतत गॅरंटी-गॅरंटी म्हणत असतात, अशी टीका ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाJammu Kashmirजम्मू-काश्मीरPOK - pak occupied kashmirपीओकेCentral Governmentकेंद्र सरकार