शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

“२०२४ पर्यंत POK भारतात आणून दाखवा, अखंड हिंदुस्थानाचे स्वप्न...”; संजय राऊतांचे थेट आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 23:04 IST

Sanjay Raut Reaction On POK: मोदींनी काश्मिरी पंडितांना गॅरंटी दिली होती. ती पूर्ण करा, अन्यथा तेव्हा खोटे बोललो, हे देशासमोर मान्य करा, अशी टीका संजय राऊतांनी केली.

Sanjay Raut Reaction On POK: जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय योग्य होता, असा ऐतिहासिक निकाल  सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्याबरोबरच जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा आणि राज्यात विधानसभा निवडणूक घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे आदेश दिले आहेत. या निर्णयावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्राला थेट आव्हान दिले आहे.

मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे. केंद्रातील मोदी-शाहांचे सरकार आता तिथे निवडणुका घेऊ शकतात. माहिती नाही, ते कधी घेतील. मात्र, २०१४ मध्ये सत्तेत येताना काश्मिरी पंडितांना काश्मीर खोऱ्यात घरवापसीचे आश्वासन दिले होते. मोदी यांनी ही गॅरंटी दिली होती. मोदी प्रत्येक निवडणुकीत काही ना काही गॅरंटी देतात. गॅरंटी कार्ड दाखवतात. मग आता काश्मिरी पंडितांना दिलेल्या गॅरंटीचे काय करणार, अशी विचारणा संजय राऊत यांनी केली.

२०२४ च्या निवडणुकांदरम्यान काश्मिरी पंडितांची घरवापसी होणार का?

२०२४ च्या निवडणुकांदरम्यान काश्मिरी पंडितांची घरवापसी होणार का, त्यांना मतदानाचा हक्क देणार का, असा सवाल करत, त्याशिवाय तेथे निवडणुका होणार नाहीत. याची गॅरंटी मोदीजींना द्यावीच लागेल. अन्यथा काश्मिरी पंडितांना दिलेले आश्वासन हे जुमलेबाजी होती. त्यावेळेस खोटे बोललो, हे देशासमोर मान्य करा. सन २०२४ पर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारतात आणू शकत असाल तर आणून दाखवा. तीही तुमची गॅरंटी आहे. अखंड हिंदुस्थानाचे स्वप्न साकार होईल. जम्मू काश्मीरचा सगळा भाग भारतात आणणे, काश्मिरी पंडितांची घरवापसी करणे ही सगळी गॅरंटी तुम्ही दिली होती. ते सगळे घेऊन जनतेसमोर जावे, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले. 

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सुचनेनुसार निवडणूक घेण्याआधी पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेतले तर संपूर्ण काश्मीरमध्ये एकत्रित निवडणक घेता येईल. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तो कायम आपला भाग राहील. काश्मीर सोडून गेलेल्या काश्मिरी पंडितांना परत काश्मीरमध्ये आणण्याची गॅरंटी कोण देणार? येणाऱ्या निवडणुकांआधी ते परत येतील याची गँरंटी कोणी देईल का? पंतप्रधान मोदी तरी देतील का? कारण हल्ली गॅरंटीचा काळ आहे. ते सतत गॅरंटी-गॅरंटी म्हणत असतात, अशी टीका ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाJammu Kashmirजम्मू-काश्मीरPOK - pak occupied kashmirपीओकेCentral Governmentकेंद्र सरकार