शहरं
Join us  
Trending Stories
1
काय झालास तू? 'व्होट बँके'साठी महाभियोग प्रस्ताव आणल्याचा आरोप, ठाकरेंना अमित शाहांनी घेरले
2
नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले
3
"त्यांच्यावर बोलायला मी रिकामा नाही"; राहुल गांधींच्या आरोपांची मुख्यमंत्री फडणवीसांनी उडवली खिल्ली
4
सीतामढी जिल्ह्यात 'HIV ब्लास्ट', आतापर्यंत 7400 HIV ग्रस्त आढळले? डॉक्टर म्हणाले, बाधितांनी निगेटिव्हसोबत लग्न करू नये
5
इस्रायली पंतप्रधानांचा PM मोदींना फोन, या संदर्भात व्यक्त केला आनंद; गाझावरही चर्चा
6
भरधाव ब्रेझा उभ्या असलेल्या वॅगनआरला धडकली, दोन्ही कारने घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू
7
संस्थेची गाडी, हातात अर्ज अन् चर्चांना उधाण; तानाजी सावंतांच्या मुलाने भरला भाजपचा उमेदवारी अर्ज?
8
'उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवताय का?'; मुंढवा जमीन घोटाळ्याच्या FIR वर हायकोर्टाचा पोलिसांना थेट सवाल
9
स्मृती मानधना लग्न मोडल्यावर पहिल्यांदाच सर्वांसमोर, 'तिला' पाहताच मारली मिठी... (VIDEO)
10
STवर ४ हजार कोटींचा आर्थिक भार, देणी कधीपर्यंत फेडणार?; प्रताप सरनाईकांनी तारीखच सांगितली
11
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: लक्ष्मी देवीसह स्वामी सेवा करा; धनधान्य, वैभव, कालातीत कृपा लाभेल!
12
IND vs SA T20: संजू सॅमसनला Playing XI मध्ये का घेतलं नाही? माजी क्रिकेटरने सांगितलं 'लॉजिक'
13
समसप्तक वसुमान योगात कालाष्टमी २०२५: ६ राशींना धनलाभ योग, चौपट भरभराट; पण पैसे उसने देऊ नका!
14
अयोध्येच्या राम मंदिरात दर्शन घ्यायला केव्हा जाणार? अखिलेश यादव यांनी काय उत्तर दिलं पाहा
15
"काय बोलायचं ते मी ठरवेन, तुम्ही सांगू नका..."; अमित शाह-राहुल गांधींमध्ये लोकसभेत खडाजंगी
16
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
17
“ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली ते १ नंबरवरून दोनवर गेले”; जयंत पाटलांचा एकनाथ शिंदेंना टोला
18
चालत्या बसमधून उचलून २ महिने जेलमध्ये डांबलं; टॉपर विद्यार्थ्याला अडकवणारे पोलीस CCTV मुळे फसले
19
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
20
IPL 2026 Auction : मिनी लिलावाच्या फायनल यादीत घोळ! विराट-क्रिसचं नाव झालेले ‘गायब’, आता...
Daily Top 2Weekly Top 5

बेळगावसह सीमावर्ती भागातील मराठी भाषकांसाठी ठाकरेंचे शिलेदार सरसावले; लोकसभेत मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 16:25 IST

Thackeray Group MP Arvind Sawant Lok Sabha News: लोकसभेचे कामकाज सुरू असताना ठाकरे गटाच्या खासदारांनी मराठी भाषेत मत व्यक्त करताना बेळगावसह सीमावर्ती भागाचा मुद्दा मांडला.

Thackeray Group MP Arvind Sawant Lok Sabha News: अलीकडेच बेळगाव, कारवार, निपाणीचा सीमा भागातील मुद्दा चर्चेला आता होता. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकाला कन्नड येत नसल्याने त्याच्या तोंडाला काळे फासण्याचा संतापजनक प्रकार घडला होता. यावरून सीमा भागाच्या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप झाले. यातच आता ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत एक महत्त्वाची मागणी केली आहे. 

मुंबई-बंगळुरू या एसटी महामंडळाच्या बसला चित्रदुर्ग येथे अडवत कर्नाटकातील संघटनेच्या कार्यकर्त्यांना चालकास कन्नड भाषा येत नसल्याचे कारण देत मारहाण केली होती. याचे तीव्र पडसाद उमटल्याने महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारी एसटी बस वाहतूक थांबवण्यात आली. कोल्हापूरसह सीमावर्ती जिल्ह्यातील विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करत त्यांच्या बस महाराष्ट्रात येऊ देणार नसल्याचा इशारा दिला. परिणामी, कर्नाटकनेही त्यांची वाहतूक थांबवली होती. कालांतराने दोन्ही राज्यातील सेवा पूर्ववत झाल्या. परंतु, या निमित्ताने पुन्हा एकदा सीमावर्ती भागातील मुद्दा चर्चिला गेला. यातच लोकसभेत सीमावर्ती भागातील मुद्दा मांडत ठाकरे गटाचे खासदार यांनी मोठी मागणी करत, सरकारने पुढाकार घ्यावा, असे म्हटले आहे. 

बेळगाव, कारवार, निपाणी भागात राष्ट्रपती राजवट लावावी

आत्ता काय होते आहे की, बेळगावमध्ये मराठी भाषिक कोणी असेल किंवा मराठी भाषेसाठी कोणी प्रयत्न करत असेल, आंदोलन करत असेल, तर त्याला तडीपार केले जात आहे. शुभम शेळके नावाच्या एका कार्यकर्त्याला तडीपार केले जात आहे. या शुभम शेळके यांने विधानसभेची निवडणूक लढवलेली होती. म्हणून आपल्या माध्यमातून मागणी करतो की, या बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर हा जो भूभाग आहे, त्यावर राष्ट्रपती राजवट लावावी आणि मराठी भाषिकांना सन्मानाने जगता यावे, यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, ही विनंती, असे अरविंद सावंत यांनी लोकसभेत म्हटले आहे.  अरविंद सावंत यांनी लोकसभेत बोलताना थेट मराठी भाषेतूनच आपले मत मांडले.

दरम्यान,  सीमावर्ती भागातील मराठी भाषकांवर होत असलेल्या कारवाया, अन्याय यावरून महाराष्ट्रातील भाजपा, शिवसेना ठाकरे गट आणि शिवेसना शिंदे गट नेहमीच आक्रमक भूमिका मांडत असतात. सीमावर्ती भागातील मराठी भाषकांचे रक्षण व्हावे, त्यांना संरक्षण मिळावे, यासाठी अनेकदा दोन्ही गट आक्रमक होताना पाहायला मिळतात. त्यामुळे खासदार अरविंद सावंत यांनी केलेल्या मागणीचे पुढे काय होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले असेल, असे सांगितले जात आहे. 

 

टॅग्स :lok sabhaलोकसभाArvind Sawantअरविंद सावंतShiv SenaशिवसेनाKarnatakकर्नाटकbelgaonबेळगाव