बनावट चकमक; 17 पोलिसांना जन्मठेप
By Admin | Updated: June 10, 2014 00:34 IST2014-06-10T00:34:58+5:302014-06-10T00:34:58+5:30
एमबीए पदवीधर असलेल्या एका 22 वर्षीय तरुणाला 2क्क्9 मध्ये बनावट चकमकीत ठार केल्याप्रकरणी 17 पोलिसांना दिल्लीतील एका न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

बनावट चकमक; 17 पोलिसांना जन्मठेप
>नवी दिल्ली : एमबीए पदवीधर असलेल्या एका 22 वर्षीय तरुणाला 2क्क्9 मध्ये बनावट चकमकीत ठार केल्याप्रकरणी 17 पोलिसांना दिल्लीतील एका न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या निर्णयाबद्दल पीडिताच्या कुटुंबियांनी असमाधान व्यक्त केले असून, फाशीची शिक्षा द्यायला हवी होती, असे म्हटले आहे.
विशेष सीबीआय न्यायाधीश जेपीएस मलिक यांनी 17 पोलिसांना बनावट चकमकप्रकरणी दोषी ठरवले होते. न्यायालयाने त्यांना कट रचणो, अपहरण आणि खूनप्रकरणी दोषी ठरवले. रणबीरसिंग गाङिायाबाद येथून देहरादूूनला नोकरी शोधण्यासाठी 3 जुलै 2क्क्9 रोजी आला होता. पोलिसांनी त्याचे अपहण केले आणि खोटय़ा चकमकीत त्याच्यावर गोळ्या झाडून खून केला होता.
याशिवाय न्यायालयाने सात पोलिसांना प्रत्येकी 5क् हजार रुपयांचा दंड सुनावला आहे. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक संतोषकुमार जयस्वाल, गोपाल दत्त भट्ट (एसएचओ), राजेश बिश्त, नीरजकुमार, नितीनकुमार चौहान, चंदरमोहनसिंग रावत आणि कॉन्स्टेबल अजितसिंग यांचा समावेश आहे. हे सर्व रणबीरच्या खुनाचे दोषी आहेत. तसेच न्यायालयाने रणबीरचे अपहरण आणि खून करण्यासाठी दोषी ठरविलेल्या 1क् पोलिसांना प्रत्येकी 2क् हजार रुपये दंड भरण्यास सांगितला आहे.
न्यायालयाने दंडातून प्राप्त रक्कम पीडित तरुणाच्या कुटुंबाला देण्याचे निर्देश दिले. पीडित तरुण मेरठ विद्यापीठातून एमबीए झालेला होता.
(वृत्तसंस्था)
4न्यायालयात हजर असलेल्या पीडित तरुणांच्या कुटुंबियांनी न्यायालयाच्या निर्णयाबद्दल असमाधान व्यक्त केले आणि वरिष्ठ न्यायालयात त्याविरुद्ध दाद मागणार असल्याचे सांगितले.
4दोषींना फाशीची शिक्षा द्यायला हवी होती, असे कुटुंबियांनी म्हटले आहे.