दहशतवाद्यांना भररस्त्यात गोळी घातली पाहिजे - साक्षी महाराज

By Admin | Updated: November 1, 2016 13:12 IST2016-11-01T12:53:42+5:302016-11-01T13:12:00+5:30

जिथे दहशतवादी दिसतील तिथे त्यांना कच-याच्या ढिगा-यात ठेऊन आग लावली पाहिजे, गोळी घातली पाहिज, असे विधान साक्षी महाराजांनी केले आहे.

The terrorists should be shot in the arms - Sakshi Maharaj | दहशतवाद्यांना भररस्त्यात गोळी घातली पाहिजे - साक्षी महाराज

दहशतवाद्यांना भररस्त्यात गोळी घातली पाहिजे - साक्षी महाराज

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 1 - अनेकदा बेताल वक्तव्य करुन अडचणीत आलेले भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी चकमकीत ठार झालेल्या सिमीच्या दहशतवाद्यांबाबत प्रतिक्रिया देताना विरोधकांवर निशाणा साधत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.  'अशा दहशतवाद्यांना भररस्त्यात गोळी घातली पाहिजे', असे विधान भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी केले आहे.  सोमवारी सकाळी चकमकीत ठार झालेले भोपाळमधील मध्यवर्ती कारागृहातील सिमीच्या आठ दहशवाद्यांसंदर्भात बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 
 
तसेच जिथे दहशतवादी दिसतील तिथे त्यांना कच-याच्या ढिगा-यात ठेऊन आग लावली पाहिजे, असेही विधान साक्षी महाराजांनी केले आहे. तसेच या चकमकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्यावरही त्यांनी हल्लाबोल केला आहे.  
आणखी बातम्या
'सिमी दहशतवाद्यांच्या चकमकीप्रकरणी चौकशीची मागणी करणारे दहशतवादी संघटनांचे जनक आहेत', अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे. देशात काही आस्तीन साप पाळले जात आहेत. काँग्रेसमुळे हे  साप देशात राहत आहेत, वाढत आहेत, अशी टिप्पणी करत साक्षी महाराज यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. 
 
या आधी त्यांनी LoC प्रमाणे देशांतर्गतही सर्जिकल स्ट्राईक केले पाहिजे, असं वक्तव्य केले होते. 
 

Web Title: The terrorists should be shot in the arms - Sakshi Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.