शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 23:44 IST

Pahalgam Terror Attack : पहलगाममधी दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभम द्विवेदी यांच्या पत्नी एशान्या यांनी या घटनेवरून संतप्त शब्दात आपली भावना व्यक्त केली आहे. केवळ एक दोन दहशतवाद्यांची घरं जाळून काही होणार नाही. या दहशतवाद्यांवर त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या झाडल्या पाहिजेत, अशी मागणी एशान्या यांनी केली.

गेल्या महिन्यात २२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी धर्म विचारून २६ जणांची हत्या केली होती. या प्रकारामुळे देशात संतापाचं वातावरण आहे. तसेच या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभम द्विवेदी यांच्या पत्नी एशान्या यांनी या घटनेवरून संतप्त शब्दात आपली भावना व्यक्त केली आहे. केवळ एक दोन दहशतवाद्यांची घरं जाळून काही होणार नाही. या दहशतवाद्यांवर त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या झाडल्या पाहिजेत, अशी मागणी एशान्या यांनी केली.

त्या म्हणाल्या की, केवळ एक दोन दहशतवाद्यांची घरं जाळून काय होणार, हे दहशतवादी कुठून येतात, कुठे जातात हा प्रश्न आहे. हे दहशतवादी पाकिस्तानी असावेत, असंही काही नाही. पहलगाम पाकिस्तानच्या सीमेपासून शेकडो किलोमीटर दूर आहे. हे दहशतवादी स्थानिक असले पाहिजेत. तसेच बैसरन येथए एवढे लोक असतानाही हे दहशतवादी कसे काय पळून गेले हाही प्रश्नच आहे, असेही त्या म्हणाल्या.

दहशतवाद्यांना शोधून, कुठलाही सवाल जबाब न करता त्वरित मारलं पाहिजे. हाच आमच्यासाठी बदला असेल. एक दोघांची घरं जाळून काही होणार नाही. या दहशतवाद्यांनी आमच्यासोबत जसं केलं. तसंच त्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालून ठार केलं पाहिजे. बेसरनमध्ये जेवढ्या महिलांनी त्यांच्या पतींना मरताना पाहिलंय, त्या सर्वजणी मनातून खचल्या आहेत, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी हिंदू-मुस्लिम ऐक्याबाबतही एशान्या यांनी मोठं विधान केलं. त्या म्हणाल्या की, जर दहशतवाद्यांनी धर्म विचारून मारलं असेल तर हा स्पष्टपणे धर्माशी संबंधित विषय आहे. जर त्यांनी हिंदू आहात का असं विचारून मागलं असेल, तर हा हिंदूशी संबंधित विषय आहे. मला या सर्व वादात पडायचं नाही. मात्र हिंदू-मुस्लिमांनी एकत्र व्हावं, असं आम्ही कसं काय सांगू शकतो. दहशतवाद्यांनी मुस्लिमांना वेगळे केले. त्यामुळे ते सुखरूप घरी गेले.  कदाचित आम्ही मुसलमान असतो तर आम्हीही वाचलो असतो.      

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला