शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 09:21 IST

पंतप्रधान आपल्या  भाषणात म्हणाले की, “आज १५ ऑगस्टचे विशेष महत्त्व आहे. आज मला लाल किल्ल्यावरून ‘ऑपरेशन सिंदूर’मधील वीर जवानांना सलाम करण्याची संधी मिळाली."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७९ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. आपल्या भाषणाची सुरुवात करताना पंतप्रधान म्हणाले की, हा १४० कोटी लोकांसाठी आनंदाचा क्षण आहे. देश एकतेची भावना सातत्याने मजबूत करत आहे. वाळवंट असो, हिमालय असो, समुद्रकिनारा असो किंवा दाट लोकवस्तीचा भाग असो, भारताच्या प्रत्येक घरात आज तिरंगा फडकवला जात आहे. सर्वत्र एकच भावना आहे की, 'आपल्या प्राणांपेक्षा प्रिय असलेल्या या भूमीला आमचे वंदन आहे.'

पंतप्रधान आपल्या  भाषणात म्हणाले की, “आज १५ ऑगस्टचे विशेष महत्त्व आहे. आज मला लाल किल्ल्यावरून ‘ऑपरेशन सिंदूर’मधील वीर जवानांना सलाम करण्याची संधी मिळाली. या शूर सैनिकांनी शत्रूंना त्यांच्या कृत्याची शिक्षा दिली. पहलगाममध्ये सीमेपलीकडून आलेल्या दहशतवाद्यांनी लोकांचा धर्म विचारून त्यांची हत्या केली. पत्नीसमोर पतीला आणि मुलांसमोर वडिलांना ठार मारले. या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती आणि जगालाही या हल्ल्याने धक्का बसला होता.”

ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख केला. ते म्हणाले की, "'ऑपरेशन सिंदूर' ही आपल्या देशातील लोकांच्या रागाची प्रतिक्रिया होती. २२ एप्रिलनंतर लष्कराला पूर्ण मोकळीक देण्यात आली. रणनीती, निशाणे आणि वेळ लष्करानेच ठरवावी, अशा सूचना दिल्या गेल्या. आणि आमच्या लष्कराने ते करून दाखवले, जे अनेक दशकांपासून शक्य झाले नव्हते. शेकडो किलोमीटर आत घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले. पाकिस्तानची अजूनही झोप उडलेली आहे."

"पाकिस्तानमध्ये झालेली ही विध्वंसक कारवाई इतकी मोठी आहे की, दररोज नवीन माहिती आणि खुलासे समोर येत आहेत. आपण अनेक दशकांपासून दहशतवादाचा सामना करत आहोत आणि आपल्या देशाची छाती अनेकदा छिन्नविछिन्न झाली आहे. पण आता आम्ही एक 'न्यू नॉर्मल' स्थापित केले आहे. आता आम्ही दहशतवादी आणि त्यांना आश्रय व ताकद देणाऱ्यांना वेगळे मानणार नाही.

अणुहल्ल्याच्या धमकीवर पाकिस्तानला सडेतोड उत्तर

पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अलीकडेच अणुहल्ल्याची धमकी दिली होती. यावर पंतप्रधान मोदींनी सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले की, “भारत आता अणुहल्ल्याची धमकी सहन करणार नाही. हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार खूप काळापासून सुरू आहे, पण आता तो खपवून घेतला जाणार नाही. जर असे प्रयत्न पुढेही सुरू राहिले, तर आमचे सैन्य आपल्या पद्धतीने त्याला उत्तर देईल. लष्कराने ठरवलेल्या वेळेनुसार, पद्धतीनुसार आणि उद्दिष्टांनुसार आम्ही कारवाई करू आणि त्यांना जोरदार प्रत्युत्तर देऊ. आता रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही. देशाला आता समजले आहे की सिंधू नदीचा करार किती अन्यायकारक आणि एकतर्फी आहे. भारतातून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी शत्रूंच्या शेतांचे सिंचन करते आणि माझ्या देशाची जमीन मात्र पाण्यावाचून तहानलेली आहे. हा कसला करार होता?”, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनOperation Sindoorऑपरेशन सिंदूरNarendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तान