शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
2
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
3
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
4
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
5
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
6
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
7
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
8
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
9
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
10
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
12
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
13
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
14
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
15
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
16
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
17
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
18
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
19
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
20
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 09:21 IST

पंतप्रधान आपल्या  भाषणात म्हणाले की, “आज १५ ऑगस्टचे विशेष महत्त्व आहे. आज मला लाल किल्ल्यावरून ‘ऑपरेशन सिंदूर’मधील वीर जवानांना सलाम करण्याची संधी मिळाली."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७९ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. आपल्या भाषणाची सुरुवात करताना पंतप्रधान म्हणाले की, हा १४० कोटी लोकांसाठी आनंदाचा क्षण आहे. देश एकतेची भावना सातत्याने मजबूत करत आहे. वाळवंट असो, हिमालय असो, समुद्रकिनारा असो किंवा दाट लोकवस्तीचा भाग असो, भारताच्या प्रत्येक घरात आज तिरंगा फडकवला जात आहे. सर्वत्र एकच भावना आहे की, 'आपल्या प्राणांपेक्षा प्रिय असलेल्या या भूमीला आमचे वंदन आहे.'

पंतप्रधान आपल्या  भाषणात म्हणाले की, “आज १५ ऑगस्टचे विशेष महत्त्व आहे. आज मला लाल किल्ल्यावरून ‘ऑपरेशन सिंदूर’मधील वीर जवानांना सलाम करण्याची संधी मिळाली. या शूर सैनिकांनी शत्रूंना त्यांच्या कृत्याची शिक्षा दिली. पहलगाममध्ये सीमेपलीकडून आलेल्या दहशतवाद्यांनी लोकांचा धर्म विचारून त्यांची हत्या केली. पत्नीसमोर पतीला आणि मुलांसमोर वडिलांना ठार मारले. या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती आणि जगालाही या हल्ल्याने धक्का बसला होता.”

ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख केला. ते म्हणाले की, "'ऑपरेशन सिंदूर' ही आपल्या देशातील लोकांच्या रागाची प्रतिक्रिया होती. २२ एप्रिलनंतर लष्कराला पूर्ण मोकळीक देण्यात आली. रणनीती, निशाणे आणि वेळ लष्करानेच ठरवावी, अशा सूचना दिल्या गेल्या. आणि आमच्या लष्कराने ते करून दाखवले, जे अनेक दशकांपासून शक्य झाले नव्हते. शेकडो किलोमीटर आत घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले. पाकिस्तानची अजूनही झोप उडलेली आहे."

"पाकिस्तानमध्ये झालेली ही विध्वंसक कारवाई इतकी मोठी आहे की, दररोज नवीन माहिती आणि खुलासे समोर येत आहेत. आपण अनेक दशकांपासून दहशतवादाचा सामना करत आहोत आणि आपल्या देशाची छाती अनेकदा छिन्नविछिन्न झाली आहे. पण आता आम्ही एक 'न्यू नॉर्मल' स्थापित केले आहे. आता आम्ही दहशतवादी आणि त्यांना आश्रय व ताकद देणाऱ्यांना वेगळे मानणार नाही.

अणुहल्ल्याच्या धमकीवर पाकिस्तानला सडेतोड उत्तर

पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अलीकडेच अणुहल्ल्याची धमकी दिली होती. यावर पंतप्रधान मोदींनी सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले की, “भारत आता अणुहल्ल्याची धमकी सहन करणार नाही. हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार खूप काळापासून सुरू आहे, पण आता तो खपवून घेतला जाणार नाही. जर असे प्रयत्न पुढेही सुरू राहिले, तर आमचे सैन्य आपल्या पद्धतीने त्याला उत्तर देईल. लष्कराने ठरवलेल्या वेळेनुसार, पद्धतीनुसार आणि उद्दिष्टांनुसार आम्ही कारवाई करू आणि त्यांना जोरदार प्रत्युत्तर देऊ. आता रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही. देशाला आता समजले आहे की सिंधू नदीचा करार किती अन्यायकारक आणि एकतर्फी आहे. भारतातून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी शत्रूंच्या शेतांचे सिंचन करते आणि माझ्या देशाची जमीन मात्र पाण्यावाचून तहानलेली आहे. हा कसला करार होता?”, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनOperation Sindoorऑपरेशन सिंदूरNarendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तान