शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

पाकिस्तान हद्दीतील दहशतवाद्यांचा तळ नष्ट; गोळीबाराला उत्तर देताना BSFची मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 08:23 IST

पाकिस्तानने जम्मू सेक्टरमध्ये विनाकारण गोळीबार चालवला होता. यावेळी बीएसएफने चोख प्रत्युत्तर देत आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी सैनिकांच्या चौक्यांवर हल्ले केले.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: भारतीय सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) आंतरराष्ट्रीय सीमेवर अखनूरजवळ पाकिस्तानच्या हद्दीत असलेला दहशतवाद्यांचा तळ पूर्णपणे उद्ध्वस्त केला आहे. या भागात पाकिस्तानी सैनिकांनी चालवलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना बीएसएफने ही कारवाई केली.

शुक्रवारी रात्री पाकिस्तानने जम्मू सेक्टरमध्ये विनाकारण गोळीबार चालवला होता. यावेळी बीएसएफने चोख प्रत्युत्तर देत आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी सैनिकांच्या चौक्यांवर हल्ले केले. यात शत्रूपक्षाचे प्रचंड नुकसान झाले. या कारवाईदरम्यान बीएसएफने सियालकोट जिल्ह्यात असलेल्या लुनी येथील दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला. भारताने शनिवारी पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानमधील अखनूरजवळील दहशतवादी तळ पूर्णपणे उद्ध्वस्त केला आहे.

मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री अब्दुल्लांनी जाहीर केली मदत

मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीर भागात पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाइकांना प्रत्येक १० लाख रुपयांची मदत जाहीर केली. ७ मे रोजी भारताने सीमापार दहशतवादी तळांवर हल्ले केल्यानंतर पाकिस्तानने गेल्या चार दिवसांपासून पूंछ, राजोरी, जम्मू आणि बारामुल्ला भागात गोळीबार सुरू केला आहे. यात एका प्रशासकीय अधिकाऱ्यासह १९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

श्रीनगर हादरले

सीमेवर पाकिस्तानी हद्दीतून शनिवारी क्षेपणास्त्रसदृश वस्तू दल सरोवरात पडली आणि याच वेळी स्फोटाचा मोठा आवाज झाला आणि पाण्यावर धुराचे लोट उठले. बॉम्बनाशक पथके तत्काळ घटनास्थळी रवाना झाली. सुरक्षा दलांनीही या भागात शोधमोहीम सुरू केली आहे.

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकBSFसीमा सुरक्षा दलPakistanपाकिस्तान