शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

बालाकोटमध्ये पुन्हा दहशतवादी तळ सक्रिय; लष्करप्रमुख म्हणाले आता एअरस्ट्राइक नव्हे तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 11:42 IST

लष्कर प्रमुख बिपीन रावत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की, भारतीय सैन्य पुन्हा एकदा एअरस्ट्राईक करणार का?

नवी दिल्ली - पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी गट सक्रीय झाल्याची माहिती आहे. चेन्नईमधील एका कार्यक्रमात लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी सांगितले की, भारताने एअरस्ट्राइक करत बालाकोटमध्ये दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. मात्र मागील 8 महिन्यांपासून त्या जागेवर पुन्हा दहशतवादी कारवाया सुरु झाल्याचं दिसून येत आहे. बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी कॅम्पला भारतीय हवाई दलाने नष्ट केले होते. 

लष्कर प्रमुख बिपीन रावत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की, भारतीय सैन्य पुन्हा एकदा एअरस्ट्राईक करणार का? यावर ते म्हणाले की, आम्ही एअर स्ट्राइक पुन्हा का करणार? यापुढेही जाऊ शकत नाही का? असं सांगत एकप्रकारे लष्करप्रमुखांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. भारतीय लष्कर सीमेवर पूर्णपणे सज्ज आहे. नियंत्रण रेषेवर जवान तैनात आहेत असं त्यांनी म्हटलं. तसेच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कायम आहे. भारताच्या उत्तर आणि पश्चिमी सीमेवर तणाव कायम आहे. आमच्या शेजारील राष्ट्रासोबत संबंध ताणले गेले आहेत असं सांगून पाकिस्तान आणि चीन यांच्यावर लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी निशाणा साधला आहे. युद्धात कोणीही उपविजेता नसतो. फक्त जिंकणे महत्वाचे असते. भविष्यात सायबर युद्ध होईल. त्यासाठी आपल्याला आवश्यक तयारी करणे गरजेचे आहे असंही रावत यांनी सांगितले. 

बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी प्रशिक्षण तळ आता पुन्हा सक्रिय करण्यात आले आहे.  जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करून हल्ले चढविण्यासाठी सध्या बालाकोटमध्ये ४० दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यामध्ये ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. त्यावर जवाबी कारवाई म्हणून भारताने बालाकोटचे दहशतवादी तळ नष्ट केले होते. मात्र, काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम भारताने रद्द केल्यानंतर अंगाचा तिळपापड झालेल्या पाकिस्तानच्या आशीर्वादाने जैश-ए-मोहम्मदने आपले हे तळ पुन्हा सुरू केले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या सोमवारी होणाऱ्या आमसभेत काश्मीरच्या मुद्यावर पुन्हा आकांडतांडव करण्याचाही पाकिस्तानचा मनसुबा आहे.

 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान