शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये वाद वाढला? शिंदेसेनेच्या शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा; भरारी पथकाकडून झाडाझडती
2
आमदार ज्ञानेश्वर कटकेंची मर्सिडीज कार चार वर्षांच्या मुलीला धडकली; अपघाताचा CCTV व्हिडिओ आला समोर
3
Stock Market Today: ३५९ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; निफ्टीतही तेजी, हे स्टॉक्स ठरले टॉप गेनर्स
4
'ग्रेगरी थॉमस' नव्हे, 'मिलिंद सेठ'! १४ वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर ३२ वर्षीय तरुणाला मिळाले हक्काचे हिंदू नाव
5
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
6
व्हॉट्सअ‍ॅपला स्टेटस ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली लिहिलं; पत्नीसह २ मुलांचा खून, पतीनं संपवलं आयुष्य
7
भाजपाचं 'ऑपरेशन लोटस'! काँग्रेस अन् शिंदेसेनेला मातब्बर फोडणार; गोल्डन वुमननं हाती घेतलं कमळ
8
डोंबिवली पश्चिमेत शिंदेसेना, भाजप कार्यकर्ते आमने-सामने; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला
9
पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या तळावर हल्ला, बॉम्बस्फोट; तीन जण ठार
10
सनी देओलसोबत किसींग सीन, जुही शूटच्या दिवशीच गायब झालेली; निर्मात्यांनी सांगितला किस्सा
11
IND vs SA: विराट कोहली पुन्हा कसोटी क्रिकेट खेळणार? रांची एकदिवसीय सामन्यानंतर केलं मोठं विधान!
12
Post Office च्या या स्कीममध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
13
जया बच्चन यांनी लग्नाला म्हटलं 'जुनी परंपरा', नात नव्याच्या बाबतीत व्यक्त केली ही इच्छा
14
संसदेतील ग्रंथालय झाले आहे शोभेची वास्तू? ९० टक्क्यांहून अधिक खासदार वाचतच नाहीत!
15
लग्नानंतर देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; भीषण अपघातात ५ जण जागीच ठार, सुदैवाने नवरा नवरी वाचले
16
Local Body ELections: उमेदवारीसाठी पैसे मागितल्याच्या आरोपावरून भाजपचे दोन गट भिडले
17
अंबरनाथची संपूर्ण, तर बदलापूरमध्ये ६ प्रभागांची निवडणूक पुढे ढकलली
18
आजपासून संसदेचे अधिवेशन! पान मसाला, सिगारेट, तंबाखु महागणार; सरकार विधेयक सादर करणार
19
Nepal Earthquake: भारताच्या शेजारी देशात ४.४ तीव्रतेचा भूकंप; नागरिकांमध्ये घबराट!
20
Philippines Protest 2025: फिलिपिन्समध्ये लोक रस्त्यावर; भ्रष्टाचाराविरोधात देशभरात आंदोलन पेटले
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादी हल्ला; २० शहीद

By admin | Updated: June 5, 2015 02:02 IST

मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात गुरुवारी सकाळी लष्कराच्या एका ताफ्यावर दहशतवाद्यांनी घात लावून केलेल्या भीषण हल्ल्यात २० जवान शहीद तर १० जखमी झाले.

स्फोट व अंधाधुंद गोळीबार : पीपल्स लिबरेशन आर्मीवर संशय, ‘एएफएसपीए’ कायदा लागूचइम्फाळ/दिल्ली : मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात गुरुवारी सकाळी लष्कराच्या एका ताफ्यावर दहशतवाद्यांनी घात लावून केलेल्या भीषण हल्ल्यात २० जवान शहीद तर १० जखमी झाले. मागील काही वर्षांतील हा सर्वांत मोठा हल्ला आहे. दरम्यान, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या भ्याड हल्ल्याची तीव्र शब्दांत निंदा केली आहे.सहा-डोगरा रेजिमेंटचे एक पथक येथून जवळपास ८० किमी अंतरावरील तेंगनोपाल-न्यू समतल मार्गावर नियमित गस्तीवर असताना सकाळी ९ वाजता पारालोंग आणि चारोंग गावाच्या दरम्यान एका अज्ञात दहशतवादी संघटनेने घात लावून प्रथम भूसुरुंग स्फोट घडविला. त्यानंतर लष्कराच्या या चार वाहनांवर त्यांनी रॉकेटचलित ग्रेनेडस् (आरपीजी) आणि स्वयंचलित शस्त्रांनी अंधाधुंद गोळीबार केला, अशी माहिती इम्फाळमधील पोलीस अधिकाऱ्याने दिली. या हल्ल्यात लष्कराचे २० जवान शहीद तर ११ जखमी झाले, असे लष्कराचे प्रवक्ते कर्नल रोहन आनंद यांनी नवी दिल्ली येथे सांगितले. एक संशयित दहशतवादी ठार झाला असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.मणिपूरचे गृहसचिव जे. सुरेशबाबू यांनी या भीषण हल्ल्यामागे राज्यातील बंडखोर संघटना पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए)चा हात असण्याचा संशय व्यक्त केला आहे. हे कृत्य पीएलएचे असून, त्याला केवायकेएलने साथ दिली असावी. अद्याप अधिक माहितीच्या प्रतीक्षेत आहोत, असे त्यांनी सांगितले. कांग्लेई यावोल कन्ना लुप ही मणिपुरातील मेईती क्रांतिकारी संघटना आहे. हल्लेखोर बंडखोरांना पकडण्यासाठी सुरक्षा दलाचा ताफा घटनास्थळी रवाना झाला आहे. (वृत्तसंस्था)शहिदांना मोदींचे वंदनपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यास ‘अविचारी’ आणि ‘क्लेषदायी’ असे संबोधले. देशासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या शूर जवानांना माझे मान झुकवून वंदन, असेही त्यांनी नमूद केले.मनोहर पर्रीकर यांच्याकडून निषेधसंरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी लष्करावरील या भ्याड हल्ल्याचा निषेध केला असून, राज्यात शांतता आणि सामान्य परिस्थिती निर्माण करण्याच्या दिशेने लष्कराचे कार्य यापुढेही सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. संरक्षणमंत्र्यांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले असल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात सांगण्यात आले.हल्ल्यामागचे कारणया हल्ल्यामागे नेमकी कोणती संघटना आहे व त्यामागे कारण काय, हे लगेच स्पष्ट झाले नसले तरी गेल्या आठवड्यात लष्कराच्या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला त्याचा सूड घेण्यासाठी हा हल्ला झाला असावा, असे मानले जात आहे. या गोळीबारानंतर चंदेल जिल्ह्यात कडकडीत हरताळ पाळण्यात आला होता.सरकारची कठोर भूमिकानरेंद्र मोदी सरकारने कठोर भूमिका घेतली असून, ईशान्येकडील राज्यांमधील फुटीरवादी संघटनांशी कोणत्याही प्रकारची बोलणी केली जाणार नाहीत, असे गृह राज्यमंत्री किरण रिजिजू यांनी जाहीर केले. त्रिपुरा वगळता संपूर्ण ईशान्य राज्यांमध्ये लष्करास विशेष अधिकार देणारा ‘एएफएसपीए’ कायदा यापुढेही लागूच राहील, असेही त्यांनी सांगितले. त्रिपुरात २७ मेपासून हा कायदा मागे घेण्यात आला आहे.