शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
3
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
4
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
5
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
6
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
7
इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
8
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
9
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा कापरा आवाज...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
10
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
11
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!
12
माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; ६ वर्षांच्या चिमुकलीला आईनंच संपवलं
13
Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!
14
इंदूर सलग आठव्यांदा ठरलं भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या शहरानं पटकावला तिसरा क्रमांक  
15
"तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; छांगुर गँग द्यायची धमक्या, महिलांनी केला पर्दाफाश
16
“ST महामंडळात काय चाललेय हे मलाच माहिती नाही”; खुद्द प्रताप सरनाईक उद्विग्न, प्रकरण काय?
17
"आता हाच माझा पती"; फेसबुकवर झाली मैत्री, २० वर्षांच्या मुलासोबत २ मुलांच्या आईने थाटला संसार! पतीला कळलं अन्...
18
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
19
Reliance Infra Share Price: १२००% नं वधारला अनिल अंबानींच्या कंपनीचा 'हा' शेअर; आता ₹९००० कोटी उभारण्याची तयारी
20
महिलेने ९ भिक्षूंना ब्लॅकमेल करून उकळले तब्बल १०२ कोटी रुपये; घरी सापडले ८०,००० अश्लील व्हिडिओ!

दहशतवादी हल्ला; २० शहीद

By admin | Updated: June 5, 2015 02:02 IST

मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात गुरुवारी सकाळी लष्कराच्या एका ताफ्यावर दहशतवाद्यांनी घात लावून केलेल्या भीषण हल्ल्यात २० जवान शहीद तर १० जखमी झाले.

स्फोट व अंधाधुंद गोळीबार : पीपल्स लिबरेशन आर्मीवर संशय, ‘एएफएसपीए’ कायदा लागूचइम्फाळ/दिल्ली : मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात गुरुवारी सकाळी लष्कराच्या एका ताफ्यावर दहशतवाद्यांनी घात लावून केलेल्या भीषण हल्ल्यात २० जवान शहीद तर १० जखमी झाले. मागील काही वर्षांतील हा सर्वांत मोठा हल्ला आहे. दरम्यान, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या भ्याड हल्ल्याची तीव्र शब्दांत निंदा केली आहे.सहा-डोगरा रेजिमेंटचे एक पथक येथून जवळपास ८० किमी अंतरावरील तेंगनोपाल-न्यू समतल मार्गावर नियमित गस्तीवर असताना सकाळी ९ वाजता पारालोंग आणि चारोंग गावाच्या दरम्यान एका अज्ञात दहशतवादी संघटनेने घात लावून प्रथम भूसुरुंग स्फोट घडविला. त्यानंतर लष्कराच्या या चार वाहनांवर त्यांनी रॉकेटचलित ग्रेनेडस् (आरपीजी) आणि स्वयंचलित शस्त्रांनी अंधाधुंद गोळीबार केला, अशी माहिती इम्फाळमधील पोलीस अधिकाऱ्याने दिली. या हल्ल्यात लष्कराचे २० जवान शहीद तर ११ जखमी झाले, असे लष्कराचे प्रवक्ते कर्नल रोहन आनंद यांनी नवी दिल्ली येथे सांगितले. एक संशयित दहशतवादी ठार झाला असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.मणिपूरचे गृहसचिव जे. सुरेशबाबू यांनी या भीषण हल्ल्यामागे राज्यातील बंडखोर संघटना पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए)चा हात असण्याचा संशय व्यक्त केला आहे. हे कृत्य पीएलएचे असून, त्याला केवायकेएलने साथ दिली असावी. अद्याप अधिक माहितीच्या प्रतीक्षेत आहोत, असे त्यांनी सांगितले. कांग्लेई यावोल कन्ना लुप ही मणिपुरातील मेईती क्रांतिकारी संघटना आहे. हल्लेखोर बंडखोरांना पकडण्यासाठी सुरक्षा दलाचा ताफा घटनास्थळी रवाना झाला आहे. (वृत्तसंस्था)शहिदांना मोदींचे वंदनपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यास ‘अविचारी’ आणि ‘क्लेषदायी’ असे संबोधले. देशासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या शूर जवानांना माझे मान झुकवून वंदन, असेही त्यांनी नमूद केले.मनोहर पर्रीकर यांच्याकडून निषेधसंरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी लष्करावरील या भ्याड हल्ल्याचा निषेध केला असून, राज्यात शांतता आणि सामान्य परिस्थिती निर्माण करण्याच्या दिशेने लष्कराचे कार्य यापुढेही सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. संरक्षणमंत्र्यांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले असल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात सांगण्यात आले.हल्ल्यामागचे कारणया हल्ल्यामागे नेमकी कोणती संघटना आहे व त्यामागे कारण काय, हे लगेच स्पष्ट झाले नसले तरी गेल्या आठवड्यात लष्कराच्या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला त्याचा सूड घेण्यासाठी हा हल्ला झाला असावा, असे मानले जात आहे. या गोळीबारानंतर चंदेल जिल्ह्यात कडकडीत हरताळ पाळण्यात आला होता.सरकारची कठोर भूमिकानरेंद्र मोदी सरकारने कठोर भूमिका घेतली असून, ईशान्येकडील राज्यांमधील फुटीरवादी संघटनांशी कोणत्याही प्रकारची बोलणी केली जाणार नाहीत, असे गृह राज्यमंत्री किरण रिजिजू यांनी जाहीर केले. त्रिपुरा वगळता संपूर्ण ईशान्य राज्यांमध्ये लष्करास विशेष अधिकार देणारा ‘एएफएसपीए’ कायदा यापुढेही लागूच राहील, असेही त्यांनी सांगितले. त्रिपुरात २७ मेपासून हा कायदा मागे घेण्यात आला आहे.