शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
2
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
3
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
4
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
5
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
6
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
7
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
8
एक चूक अन् मिळाला १४ कोटी पगार; सुपरवायझरची गेली नोकरी
9
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
10
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
11
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
12
रक्त चाचणी आता होईल केवळ ५८२ रुपयांत; हिमोफिलिया, व्हॉन विलेब्रडग्रस्तांचे पैसे वाचणार
13
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
14
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
15
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
16
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
17
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
18
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
19
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
20
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल

जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्युमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 10:06 IST

दहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी

नवी दिल्ली : सलग दुसऱ्या वर्षी अमेरिकन सरकारनं दहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारताला तिसरं स्थान दिलं आहे. याबद्दलची आकडेवारी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं प्रसिद्ध केली आहे. दहशतवादाचा फटका बसणाऱ्या देशांची यादी दरवर्षी अमेरिकेकडून तयार करण्यात येते. यावर्षी या यादीत इराक पहिल्या, तर अफगाणिस्तान दुसऱ्या क्रमांरावर आहे. अमेरिकेकडून धोकादायक दहशतवादी संघटनांचीही यादी तयार करण्यात आली आहे. जगातील दहशतवादी संघटनांचा विचार केल्यास इसिस, तालिबान, अल-शबाब यांच्यानंतर सीपीआय-माओवादी संघटना चौथ्या स्थानी आहे. 2015 मध्ये दहशतवादग्रस्त देशांच्या यादीत पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर होता. मात्र गेल्या दोन वर्षांपासून भारत तिसऱ्या स्थानावर आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं याबद्दलची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये जम्मू-काश्मीरमधील वाढत्या हल्ल्यांचादेखील समावेश आहे. 2017 मध्ये जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये 24 टक्क्यांनी वाढ झाली. तर या हल्ल्यांमध्ये मृत्यूमुखी पावलेल्यांचं प्रमाण तब्बल 89 टक्क्यांनी वाढलं, अशी आकडेवारी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं प्रसिद्ध केली आहे. 2017 मध्ये भारतात एकूण 860 दहशतवादी हल्ले झाले. यातील 25 टक्के हल्ले एकट्या जम्मू-काश्मीरमध्ये झाले, अशी आकडेवारी अमेरिकेन सरकारच्या अहवालात आहे. भारत आणि पाकिस्तानमधील दहशतवादात मोठा फरक असल्याचं भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. 'भारतात होणाऱ्या बहुतांश दहशतवादी हल्ल्यांना पाकिस्तानचा पाठिंबा असतो. पाकिस्तानमधूनच या हल्ल्यांची योजना आखली जाते. पाकिस्तानच्या यंत्रणा आणि त्यांचं लष्कर या हल्ल्यांना प्रोत्साहन देतं. मात्र पाकिस्तानमध्ये होणाऱ्या हल्ल्यांमध्ये भारताचा हात नसतो. पाकिस्ताननं ज्या दहशतवादी संघटना पोसल्या, त्याच तिथे हल्ले घडवतात,' असं भारतीय लष्करातील एका अधिकाऱ्यानं म्हटलं. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं जगातील धोकादायक दहशतवादी संघटनांचाही यादी तयार केली आहे. यामध्ये सीपीआय-माओवादी संघटना चौथ्या क्रमांकावर आहे. भारतात झालेल्या 53 टक्के हल्ल्यांमध्ये याच संघटनेचा हात असल्याची आकडेवारी अमेरिकेनं दिली आहे. '2016 आणि 2017 मध्ये माओवाद्यांचे हल्ले कमी झाले आहेत. मात्र हल्ल्यांची संख्या कमी झाली असली, तरी त्यात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या 16 टक्क्यांनी वाढली आहे. तर जखमींच्या संख्येत 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे,' अशी आकडेवारी अहवालात आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादterroristदहशतवादीPakistanपाकिस्तान