शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्युमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 10:06 IST

दहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी

नवी दिल्ली : सलग दुसऱ्या वर्षी अमेरिकन सरकारनं दहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारताला तिसरं स्थान दिलं आहे. याबद्दलची आकडेवारी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं प्रसिद्ध केली आहे. दहशतवादाचा फटका बसणाऱ्या देशांची यादी दरवर्षी अमेरिकेकडून तयार करण्यात येते. यावर्षी या यादीत इराक पहिल्या, तर अफगाणिस्तान दुसऱ्या क्रमांरावर आहे. अमेरिकेकडून धोकादायक दहशतवादी संघटनांचीही यादी तयार करण्यात आली आहे. जगातील दहशतवादी संघटनांचा विचार केल्यास इसिस, तालिबान, अल-शबाब यांच्यानंतर सीपीआय-माओवादी संघटना चौथ्या स्थानी आहे. 2015 मध्ये दहशतवादग्रस्त देशांच्या यादीत पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर होता. मात्र गेल्या दोन वर्षांपासून भारत तिसऱ्या स्थानावर आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं याबद्दलची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये जम्मू-काश्मीरमधील वाढत्या हल्ल्यांचादेखील समावेश आहे. 2017 मध्ये जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये 24 टक्क्यांनी वाढ झाली. तर या हल्ल्यांमध्ये मृत्यूमुखी पावलेल्यांचं प्रमाण तब्बल 89 टक्क्यांनी वाढलं, अशी आकडेवारी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं प्रसिद्ध केली आहे. 2017 मध्ये भारतात एकूण 860 दहशतवादी हल्ले झाले. यातील 25 टक्के हल्ले एकट्या जम्मू-काश्मीरमध्ये झाले, अशी आकडेवारी अमेरिकेन सरकारच्या अहवालात आहे. भारत आणि पाकिस्तानमधील दहशतवादात मोठा फरक असल्याचं भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. 'भारतात होणाऱ्या बहुतांश दहशतवादी हल्ल्यांना पाकिस्तानचा पाठिंबा असतो. पाकिस्तानमधूनच या हल्ल्यांची योजना आखली जाते. पाकिस्तानच्या यंत्रणा आणि त्यांचं लष्कर या हल्ल्यांना प्रोत्साहन देतं. मात्र पाकिस्तानमध्ये होणाऱ्या हल्ल्यांमध्ये भारताचा हात नसतो. पाकिस्ताननं ज्या दहशतवादी संघटना पोसल्या, त्याच तिथे हल्ले घडवतात,' असं भारतीय लष्करातील एका अधिकाऱ्यानं म्हटलं. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं जगातील धोकादायक दहशतवादी संघटनांचाही यादी तयार केली आहे. यामध्ये सीपीआय-माओवादी संघटना चौथ्या क्रमांकावर आहे. भारतात झालेल्या 53 टक्के हल्ल्यांमध्ये याच संघटनेचा हात असल्याची आकडेवारी अमेरिकेनं दिली आहे. '2016 आणि 2017 मध्ये माओवाद्यांचे हल्ले कमी झाले आहेत. मात्र हल्ल्यांची संख्या कमी झाली असली, तरी त्यात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या 16 टक्क्यांनी वाढली आहे. तर जखमींच्या संख्येत 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे,' अशी आकडेवारी अहवालात आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादterroristदहशतवादीPakistanपाकिस्तान