शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

"दहशतवादास कुठलाही धर्म, देश किंवा समुहाशी जोडता कामा नये"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 19:02 IST

दहशतवादाला कुठल्याही धर्म, देश किंवा वर्गाशी जोडता कामा नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

नवी दिल्ली - दहशतवादी कारवायांकडे पाहण्याचा काहींचा दृष्टीकोन संकुचित असून त्याला ते धर्माशी जोडतात. मात्र, दहशतवाद हा कुठल्याही धर्माशी जोडलेला नसतो, ती एक प्रवृत्ती असून समाजविघातक आणि मानवविघातक वृत्तीने पछाडलेली लोकंच दहशतवादी कारवाया करतात. या दहशतवाद्यांना टेरर फंडींगच्या नावाने रसद पुरवली जाते. मात्र, दहशवाद्यांना होत असलेला रसद पुरवठा हाच सर्वात मोठा धोका असल्याचं केंद्रीयमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. तसेच, दहशतवादाला कुठल्याही धर्म, देश किंवा वर्गाशी जोडता कामा नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

राजधानी दिल्लीतील हॉटेल ताज पॅलेस दहशतवाद विरोधी वित्त पोषणवरील आयोजित 'आतंक के लिए कोई धन नही' या संमेलनात बोलताना अमित शहा यांनी दहशतवाद आणि त्यास पुरवली जाणारी रसद हाच सर्वात मोठा धोका असल्याचं म्हटलं. दहशतवाद्यांना संरक्षण देणे, रसद पुरवणे हे दहशतवादाला खतपाणी घालण्यासारखंच आहे. त्यामुळे, अशा घटकांना आणि देशांना आपल्यात सामावून न घेणं ही आपली सामाजिक जबाबदारी आहे, असेही शहा यांनी म्हटले. 

दहशतवाद्यांकडून तरुणांचा वापर करण्यात येतो. टेरर फंडींगसाठी, दहशतवादी कारवाया घडविण्यासाठी तरुणांना कट्टरपंथीय बनविण्यासाठी सातत्याने नवनवीन प्रयोग केले जातात. सध्या सायबर गुन्हेगारीतून कट्टरपंथीच प्रचार करण्यात येत असून स्वत:ची ओळखही लपविली जाते. त्यामुळेच, दहशतवाद हा विश्वशांतासाठी सर्वात मोठा धोका आहे. पण, दहशतवाद्यांना पुरवण्यात येणारी आर्थिक रसद हाच सर्वात मोठा धोका असल्याचं शहा यांनी म्हटलं. आर्थिक पुरवठा झाल्यामुळेच ते साधन आणि शस्त्रसामुग्रीने परिपूर्ण होतात. त्यातून, जगभरातील देशांच्या अर्थव्यवस्थेलाही धोका निर्माण करण्याचं काम होत असल्याचं शहा यांनी म्हटलं.  

टॅग्स :Amit Shahअमित शाहTerrorismदहशतवादterroristदहशतवादी