शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

"दहशतवादास कुठलाही धर्म, देश किंवा समुहाशी जोडता कामा नये"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 19:02 IST

दहशतवादाला कुठल्याही धर्म, देश किंवा वर्गाशी जोडता कामा नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

नवी दिल्ली - दहशतवादी कारवायांकडे पाहण्याचा काहींचा दृष्टीकोन संकुचित असून त्याला ते धर्माशी जोडतात. मात्र, दहशतवाद हा कुठल्याही धर्माशी जोडलेला नसतो, ती एक प्रवृत्ती असून समाजविघातक आणि मानवविघातक वृत्तीने पछाडलेली लोकंच दहशतवादी कारवाया करतात. या दहशतवाद्यांना टेरर फंडींगच्या नावाने रसद पुरवली जाते. मात्र, दहशवाद्यांना होत असलेला रसद पुरवठा हाच सर्वात मोठा धोका असल्याचं केंद्रीयमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. तसेच, दहशतवादाला कुठल्याही धर्म, देश किंवा वर्गाशी जोडता कामा नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

राजधानी दिल्लीतील हॉटेल ताज पॅलेस दहशतवाद विरोधी वित्त पोषणवरील आयोजित 'आतंक के लिए कोई धन नही' या संमेलनात बोलताना अमित शहा यांनी दहशतवाद आणि त्यास पुरवली जाणारी रसद हाच सर्वात मोठा धोका असल्याचं म्हटलं. दहशतवाद्यांना संरक्षण देणे, रसद पुरवणे हे दहशतवादाला खतपाणी घालण्यासारखंच आहे. त्यामुळे, अशा घटकांना आणि देशांना आपल्यात सामावून न घेणं ही आपली सामाजिक जबाबदारी आहे, असेही शहा यांनी म्हटले. 

दहशतवाद्यांकडून तरुणांचा वापर करण्यात येतो. टेरर फंडींगसाठी, दहशतवादी कारवाया घडविण्यासाठी तरुणांना कट्टरपंथीय बनविण्यासाठी सातत्याने नवनवीन प्रयोग केले जातात. सध्या सायबर गुन्हेगारीतून कट्टरपंथीच प्रचार करण्यात येत असून स्वत:ची ओळखही लपविली जाते. त्यामुळेच, दहशतवाद हा विश्वशांतासाठी सर्वात मोठा धोका आहे. पण, दहशतवाद्यांना पुरवण्यात येणारी आर्थिक रसद हाच सर्वात मोठा धोका असल्याचं शहा यांनी म्हटलं. आर्थिक पुरवठा झाल्यामुळेच ते साधन आणि शस्त्रसामुग्रीने परिपूर्ण होतात. त्यातून, जगभरातील देशांच्या अर्थव्यवस्थेलाही धोका निर्माण करण्याचं काम होत असल्याचं शहा यांनी म्हटलं.  

टॅग्स :Amit Shahअमित शाहTerrorismदहशतवादterroristदहशतवादी