शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

मुदतपूर्व सरकार बरखास्ती टीआरएसच्या पथ्यावर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 06:08 IST

केसीआर यांचा प्लॅन यशस्वी ठरण्याची चिन्हे

- धनाजी कांबळेहैदराबाद : तेलंगणात मुदतीआधीच सरकार बरखास्त करून एकहाती सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न सत्यात उतरताना दिसत आहे. तीन महिने आधीच प्रचाराची संधी मिळाल्याने केसीआर यांच्या टीआरएसच्या उमेदवारांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याआधीच घरोघरी गाठीभेटी सुरू केल्या होत्या. त्यामुळेच विरोधकांनी आश्चर्यकारकरित्या एकजूट बांधून केलेल्या आघाडीचा म्हणावा तसा परिणाम झाल्याचे सध्याच्या एक्झिट पोलवरून तरी दिसत नाही. मुदतपूर्व सरकार बरखास्त करण्याचा निर्णय केसीआर यांच्या पथ्थ्यावरच पडेल, अशीस्थिती आहे.तेलंगणात ११९ जागांसाठी निवडणूक झाली. यापैकी १०५ उमेदवारांची घोषणा केसीआर यांनी ६ सप्टेंबर रोजी सरकार बरखास्त केल्यानंतर काही मिनिटांतच केली होती. त्यामागे पुरेसा वेळ मिळावा, हीच रणनिती असावी, असे राजकीय विश्लेषकांनी म्हटले आहे. काँग्रेस, टीडीपी, टीजेएस आणि सीपीआय आघाडीने देखील मिळालेल्या कालावधीत चांगली टक्कर देण्याचा प्रयत्न केला आहे.मात्र, टीडीपीबद्दल जे आकर्षण आणि लोकप्रियता आंध्र प्रदेश राज्य एकत्रित असताना होती. ती आता दिसली नाही. त्याउलट काही मतदारसंघात केवळ एन. चंद्राबाबू नायडू यांच्यावर प्रेम करणारे मतदारच अधिक दिसले. विशेषत: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत प्रचारसभांमध्ये चंद्राबाबू ज्या ज्या मतदारसंघात गेले. त्या ठिकाणी काही प्रमाणात हलचल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काँग्रेसने देखील २०१४ मध्ये २१ जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांचीही ताकद दुर्लक्षित करता येत नाही.२०१४ मध्ये केसीआर यांच्या टीआरएसला ३४.३ टक्के मतदान झाले होते. तर काँग्रेस २१, टीडीपी १५, एमआयएम ३.८, तर भाजपला ७.१ टक्के मतदान झाले होते. आता मात्र पक्षनिहाय मिळालेली मतांची टक्केवारी अनेकांची गणिते घडविणारी किंवा बिघडवणारी ठरणार आहे. प्रत्यक्षात मतदारांनी कोणाला किती मतांचे दान दिले आहे, हे ११ डिसेंबरलाच समजणार आहे. के. चंद्रशेखर राव गजवेल मतदारसंघातून रिंगणात होते. आताही याच मतदारसंघातून ते रिंगणात आहेत. गेल्या वेळी त्यांना ८६, ६९४ मते मिळाली होती. त्यांनी टीडीपीच्या प्रताप रेड्डी यांचा १९,३९१ मतांनी पराभव केला होता. या वेळी मात्र काँग्रेस आघाडीत टीडीपी सहभागी आहे. त्यामुळे पुन्हा निवडणूक रिंगणात उतरलेल्या रेड्डी यांनीही त्यांना चांगली टक्कर दिली असण्याची शक्यता आहे. ते येत्या मंगळवारी स्पष्ट होईलच.रंगतदार लढतीकाही मतदारसंघात निवडणूक अतिशय रंगतदार झाली आहे. मात्र, गेल्या वेळी २०१४ मधील काही निवडक मतदारसंघातील उमेदवार आणि त्यांच्या मतांची टक्केवारी बघितल्यास या वेळी कोणत्या पक्षाला तिथे संधीमिळू शकते, हे स्पष्ट होते.टीआरएसचे नेते आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, त्यांचे पुत्र के.टी. रामाराव, भाचे टी. हरीश राव तसेच एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी, भाजपचे टी. राजा सिंह यांच्या मतदारसंघातील निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

 

टॅग्स :Telangana Assembly Election 2018तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018Telanganaतेलंगणाcongressकाँग्रेस