शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

सैन्यमाघारीशिवाय तणाव निवळणार नाही; लष्करप्रमुखांचा यांचा चीनला स्पष्‍ट संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 09:40 IST

जनरल मनोज नरवणे यांनी एका मुलाखतीमध्ये पूर्व लडाखबाबत भारताची स्थ‍िती स्पष्ट केली. त्यांनी सांगितले, सद्यस्थितीत एकतर्फी बदल करण्यात येणार नाही, ही भारतीय सेनेची भूमिका स्पष्ट भूमिका आहे.

नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये सर्व संघर्षप्रवण ठिकाणांवरून संपूर्ण सैन्य माघारी केल्याशिवाय तणाव कमी होऊ शकत नाही, असा स्पष्ट संदेश  लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी चीनला दिला आहे. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय सेना पूर्णपणे सज्ज असल्याचेही लष्करप्रमुखांनी सांगितले. जनरल मनोज नरवणे यांनी एका मुलाखतीमध्ये पूर्व लडाखबाबत भारताची स्थ‍िती स्पष्ट केली. त्यांनी सांगितले, सद्यस्थितीत एकतर्फी बदल करण्यात येणार नाही, ही भारतीय सेनेची भूमिका स्पष्ट भूमिका आहे. गेल्या वर्षी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये भीषण चकमक उडाली होती. राखीव सैनिक सज्जभारतीय सैन्याची सद्य:स्थितीत उंचावरील सर्व महत्त्वपूर्ण तळांवर मजबूत पकड आहे. कोणत्याही विपरीत परिस्थितीत प्रत्युत्तर देण्यासाठी पुरेशा प्रमाणात राखीव सैनिक सज्ज ठेवण्यात आले आहेत, अशी माहितीही नरवणे यांनी दिली. पँगाँग तलावाच्या परिसरातून सैन्यकपातीबाबत करार केल्यानंतर चिनी सैन्याने उल्लंघन करण्यात आलेले नाही. त्यामुळे अप्रिय घटना घडण्याची शक्यता कमी असलचेही लष्करप्रमुखांनी सांगितले. चीनकडून अरुणाचल प्रदेश आणि भूतानच्या सीमेलगत गावे वसविण्यात येत आहेत. तसेच या भागात पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहेत. 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावmanoj naravaneमनोज नरवणे