शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
4
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
5
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
6
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
7
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
8
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
9
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
10
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
11
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
12
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
13
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
14
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
15
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
16
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
17
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
18
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
19
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
20
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
Daily Top 2Weekly Top 5

लडाखमध्ये तणाव! चीनने वाढवले पुन्हा सैनिक; भारतानं जवानांना धाडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2020 10:52 IST

भारतीय सैन्य विरोध करत असतानाच चीननं अशी आक्रमक भूमिका घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.  

ठळक मुद्देचीनची सेना लडाखमधील पँगॉग त्सो लेकजवळ आणि गॅल्व्हान व्हॅलीजवळच्या वास्तविक नियंत्रण रेषे (एलएसी)वर वेगाने आपल्या सैन्याचा विस्तार करीत आहे. भारताबरोबर असलेला सीमावादाचा संघर्ष चीन आणखी वाढवण्याच्या तयारीत आहे. गेल्या दोन आठवड्यांत विशेषत: गॅल्व्हन व्हॅलीमध्ये चिनी सैन्यानं सुमारे 100 तंबू उभारले आहेत. चिनी सैन्य तिथे बंकर बनवण्याच्याही प्रयत्नात आहे. भारतीय सैन्य विरोध करत असतानाच चीननं अशी आक्रमक भूमिका घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.  

नवी दिल्ली- चीनची सेना लडाखमधील पँगॉग त्सो लेकजवळ आणि गॅल्व्हान व्हॅलीजवळच्या वास्तविक नियंत्रण रेषे (एलएसी)वर वेगाने आपल्या सैन्याचा विस्तार करीत आहे. त्यामुळे भारताबरोबर असलेला सीमावादाचा संघर्ष चीन आणखी वाढवण्याच्या तयारीत आहे. गेल्या दोन आठवड्यांत विशेषत: गॅल्व्हन व्हॅलीमध्ये चिनी सैन्यानं सुमारे 100 तंबू उभारले आहेत. चिनी सैन्य तिथे बंकर बनवण्याच्याही प्रयत्नात आहे. भारतीय सैन्य विरोध करत असतानाच चीननं अशी आक्रमक भूमिका घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या संघर्षादरम्यान चीननं भारताच्या जवानांना ताब्यात घेतल्याच्याही बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या, परंतु भारतीय लष्करानं या वृत्ताचं खंडन केलं आहे. दरम्यान, लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी शुक्रवारी लेह येथील 14 वाहिनीच्या मुख्यालयाला भेट दिली आणि एलएसीवरील वादग्रस्त जागेसह संपूर्ण परिसराच्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. सैन्य सूत्रांनी सांगितले की, भारतीय सैन्य त्सो लेकजवळ आणि गॅल्व्हान व्हॅलीजवळच्या दोन्ही ठिकाणी चिनी सैन्याशी सामना करण्यासाठी सैन्य पाठवत आहे. इतर अनेक संवेदनशील भागात भारत चीनपेक्षा चांगल्या परिस्थितीत आहे. 5 मे रोजी पूर्वेकडील लडाखमधील परिस्थिती आणखी चिघळली होती, जेव्हा सुमारे 250 चिनी सैनिक आणि भारतीय सैनिक यांच्यात हिंसक चकमक झाली होती.दुसर्‍या दिवसापर्यंत तो संघर्ष सुरूच होता. नंतर दोन्ही बाजूच्या लोकल कमांडरची बैठक झाली आणि दोन्ही बाजूचे सैनिक माघारी फिरले. दोन्ही बाजूच्या सैनिकांनी लाठीकाठीने एकमेकांवर हल्ला केला आणि दगडफेकही केली होती. या हिंसक चकमकीत दोन्ही बाजूचे सुमारे 100 सैनिक जखमी झाले. 9 मे रोजी सिक्कीममध्ये पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली. नाकू ला पास येथे जवळपास 150 भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक चकमक झाली, ज्यामध्ये दोन्ही बाजूचे किमान दहा सैनिक जखमी झाले.गेल्या आठवड्यात पूर्व लडाखमध्ये चिनी सैनिकांनी भारतीय सीमेचे अनेक वेळा उल्लंघन केल्याच्या बातम्या आल्या आहेत. मात्र, याबाबत कोणताही अधिकृत प्रतिसाद मिळाला नाही किंवा याची पुष्टीही झालेली नाही. त्यावेळी दोन्ही बाजूंच्या स्थानिक कमांडरमध्ये किमान पाच बैठका झाल्या. या बैठकीत भारतीय कमांडरने गॅल्व्हान व्हॅलीमध्ये पीपल्स लिबरेशन आर्मी(पीएलए)ने मोठ्या प्रमाणात तंबू उभारल्याबद्दल आक्षेप घेतला. पीएलए ज्या भागात तंबू उभारत आहे, तो भाग भारताच्या हद्दीतील आहे. 

टॅग्स :chinaचीनIndiaभारत