शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

लडाखमध्ये तणाव! चीनने वाढवले पुन्हा सैनिक; भारतानं जवानांना धाडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2020 10:52 IST

भारतीय सैन्य विरोध करत असतानाच चीननं अशी आक्रमक भूमिका घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.  

ठळक मुद्देचीनची सेना लडाखमधील पँगॉग त्सो लेकजवळ आणि गॅल्व्हान व्हॅलीजवळच्या वास्तविक नियंत्रण रेषे (एलएसी)वर वेगाने आपल्या सैन्याचा विस्तार करीत आहे. भारताबरोबर असलेला सीमावादाचा संघर्ष चीन आणखी वाढवण्याच्या तयारीत आहे. गेल्या दोन आठवड्यांत विशेषत: गॅल्व्हन व्हॅलीमध्ये चिनी सैन्यानं सुमारे 100 तंबू उभारले आहेत. चिनी सैन्य तिथे बंकर बनवण्याच्याही प्रयत्नात आहे. भारतीय सैन्य विरोध करत असतानाच चीननं अशी आक्रमक भूमिका घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.  

नवी दिल्ली- चीनची सेना लडाखमधील पँगॉग त्सो लेकजवळ आणि गॅल्व्हान व्हॅलीजवळच्या वास्तविक नियंत्रण रेषे (एलएसी)वर वेगाने आपल्या सैन्याचा विस्तार करीत आहे. त्यामुळे भारताबरोबर असलेला सीमावादाचा संघर्ष चीन आणखी वाढवण्याच्या तयारीत आहे. गेल्या दोन आठवड्यांत विशेषत: गॅल्व्हन व्हॅलीमध्ये चिनी सैन्यानं सुमारे 100 तंबू उभारले आहेत. चिनी सैन्य तिथे बंकर बनवण्याच्याही प्रयत्नात आहे. भारतीय सैन्य विरोध करत असतानाच चीननं अशी आक्रमक भूमिका घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या संघर्षादरम्यान चीननं भारताच्या जवानांना ताब्यात घेतल्याच्याही बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या, परंतु भारतीय लष्करानं या वृत्ताचं खंडन केलं आहे. दरम्यान, लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी शुक्रवारी लेह येथील 14 वाहिनीच्या मुख्यालयाला भेट दिली आणि एलएसीवरील वादग्रस्त जागेसह संपूर्ण परिसराच्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. सैन्य सूत्रांनी सांगितले की, भारतीय सैन्य त्सो लेकजवळ आणि गॅल्व्हान व्हॅलीजवळच्या दोन्ही ठिकाणी चिनी सैन्याशी सामना करण्यासाठी सैन्य पाठवत आहे. इतर अनेक संवेदनशील भागात भारत चीनपेक्षा चांगल्या परिस्थितीत आहे. 5 मे रोजी पूर्वेकडील लडाखमधील परिस्थिती आणखी चिघळली होती, जेव्हा सुमारे 250 चिनी सैनिक आणि भारतीय सैनिक यांच्यात हिंसक चकमक झाली होती.दुसर्‍या दिवसापर्यंत तो संघर्ष सुरूच होता. नंतर दोन्ही बाजूच्या लोकल कमांडरची बैठक झाली आणि दोन्ही बाजूचे सैनिक माघारी फिरले. दोन्ही बाजूच्या सैनिकांनी लाठीकाठीने एकमेकांवर हल्ला केला आणि दगडफेकही केली होती. या हिंसक चकमकीत दोन्ही बाजूचे सुमारे 100 सैनिक जखमी झाले. 9 मे रोजी सिक्कीममध्ये पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली. नाकू ला पास येथे जवळपास 150 भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक चकमक झाली, ज्यामध्ये दोन्ही बाजूचे किमान दहा सैनिक जखमी झाले.गेल्या आठवड्यात पूर्व लडाखमध्ये चिनी सैनिकांनी भारतीय सीमेचे अनेक वेळा उल्लंघन केल्याच्या बातम्या आल्या आहेत. मात्र, याबाबत कोणताही अधिकृत प्रतिसाद मिळाला नाही किंवा याची पुष्टीही झालेली नाही. त्यावेळी दोन्ही बाजूंच्या स्थानिक कमांडरमध्ये किमान पाच बैठका झाल्या. या बैठकीत भारतीय कमांडरने गॅल्व्हान व्हॅलीमध्ये पीपल्स लिबरेशन आर्मी(पीएलए)ने मोठ्या प्रमाणात तंबू उभारल्याबद्दल आक्षेप घेतला. पीएलए ज्या भागात तंबू उभारत आहे, तो भाग भारताच्या हद्दीतील आहे. 

टॅग्स :chinaचीनIndiaभारत