शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये ईव्हीएमशी छेडछाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 04:01 IST

मध्य प्रदेश व छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकांत काही जणांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांशी (ईव्हीएम) छेडछाड केल्याचा आरोप काँग्रेसने केला.

नवी दिल्ली : मध्य प्रदेश व छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकांत काही जणांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांशी (ईव्हीएम) छेडछाड केल्याचा आरोप काँग्रेसने केला. काँग्रेसने या प्रकरणी कोणाचे नाव घेतले नसले तरी त्यांचा इशारा भाजपाकडेच आहे. राज्यातील एका खासगी हॉटेलमध्ये सापडलेली इव्हीएम तेथून निवडणूक अधिकारी घेऊन जात आहेत, सागर जिल्ह्यात निवडणूक कामासाठी नोंदणी न केलेल्या एका स्कूलबसमधून ही यंत्रे नेली जात आहेत, अशी यंत्रे एका स्ट्राँगरुममध्ये ठेवण्यात आल्याची दृश्ये असलेल्या व्हिडीओफिती पुरावा म्हणून काँग्रेसने निवडणूक आयोगाला शनिवारी सादर केल्या.मध्य प्रदेश, छत्तीसगढ या राज्यांत काही जणांनी मतदान प्रक्रियेत खूप गैरप्रकार केले आहेत असा आरोप काँग्रेसने केला आहे. या पक्षाचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी यासंदर्भात केलेल्या टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, या दोन राज्यांत पराभव होणार हे दिसू लागल्यानंतर स्ट्राँगरुममध्ये ठेवलेल्या इव्हीएम यंत्रांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न भाजपाने केला आहे. या गैरप्रकारांची निवडणूक आयोगाने चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली. छत्तीसगढ राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीच्या आधी निवडणूक आयोगाने काही गोष्टी अमलात आणाव्यात. स्ट्राँगरुममधून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे मतमोजणीसाठी संबंधित केंद्रांमध्ये नेली जात असताना त्यावेळी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना तेथे हजर राहाण्याची परवानगी द्यावी.पात्र मतदारांकडून टपालाद्वारे मतपत्रिका मिळाल्या आहेत की नाही याची नीट तपासणी व्हावी. राजनंदनगाव, कोंडागाव, विलासपूर येथील निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या कामांचा आढावा घेण्यात यावा. मतमोजणीची पहिलीफेरी संपल्यानंतरच दुसºया फेरीला सुरुवात करावी.>भोपाळमधील स्ट्राँगरुममध्ये एक तास वीज गायबकाँग्रेस नेते अभिषेक सिंघवी, मनीष तिवारी, प्रणब झा, पक्षाचे छत्तीसगढचे प्रभारी पी. एल. पुनिया यांच्यासह अन्य नेत्यांच्या एका शिष्टमंडळाने निवडणूक आयोगासमोर या तक्रारींचा पाढा वाचला. पुनिया म्हणाले की, मतदानानंतर इव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरुमच्या जवळपास लॅपटॉप, मोबाइल हाती घेतलेले लोक आढळून आले होते. काँग्रेसचे राज्यसभा खासदार विवेक तनखा यांनी म्हटले आहे की, मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील इव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरुममध्ये एके दिवशी तासभर वीजच नव्हती. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरेही बंद पडले होते. इव्हीएम यंत्रे एखाद्या खासगी हॉटेलमध्ये ठेवण्याचे कारणच काय असा सवाल मनीष तिवारी यांनी विचारला आहे.

टॅग्स :Chhattisgarh Assembly Election 2018छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018Madhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018