शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये ईव्हीएमशी छेडछाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 04:01 IST

मध्य प्रदेश व छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकांत काही जणांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांशी (ईव्हीएम) छेडछाड केल्याचा आरोप काँग्रेसने केला.

नवी दिल्ली : मध्य प्रदेश व छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकांत काही जणांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांशी (ईव्हीएम) छेडछाड केल्याचा आरोप काँग्रेसने केला. काँग्रेसने या प्रकरणी कोणाचे नाव घेतले नसले तरी त्यांचा इशारा भाजपाकडेच आहे. राज्यातील एका खासगी हॉटेलमध्ये सापडलेली इव्हीएम तेथून निवडणूक अधिकारी घेऊन जात आहेत, सागर जिल्ह्यात निवडणूक कामासाठी नोंदणी न केलेल्या एका स्कूलबसमधून ही यंत्रे नेली जात आहेत, अशी यंत्रे एका स्ट्राँगरुममध्ये ठेवण्यात आल्याची दृश्ये असलेल्या व्हिडीओफिती पुरावा म्हणून काँग्रेसने निवडणूक आयोगाला शनिवारी सादर केल्या.मध्य प्रदेश, छत्तीसगढ या राज्यांत काही जणांनी मतदान प्रक्रियेत खूप गैरप्रकार केले आहेत असा आरोप काँग्रेसने केला आहे. या पक्षाचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी यासंदर्भात केलेल्या टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, या दोन राज्यांत पराभव होणार हे दिसू लागल्यानंतर स्ट्राँगरुममध्ये ठेवलेल्या इव्हीएम यंत्रांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न भाजपाने केला आहे. या गैरप्रकारांची निवडणूक आयोगाने चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली. छत्तीसगढ राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीच्या आधी निवडणूक आयोगाने काही गोष्टी अमलात आणाव्यात. स्ट्राँगरुममधून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे मतमोजणीसाठी संबंधित केंद्रांमध्ये नेली जात असताना त्यावेळी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना तेथे हजर राहाण्याची परवानगी द्यावी.पात्र मतदारांकडून टपालाद्वारे मतपत्रिका मिळाल्या आहेत की नाही याची नीट तपासणी व्हावी. राजनंदनगाव, कोंडागाव, विलासपूर येथील निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या कामांचा आढावा घेण्यात यावा. मतमोजणीची पहिलीफेरी संपल्यानंतरच दुसºया फेरीला सुरुवात करावी.>भोपाळमधील स्ट्राँगरुममध्ये एक तास वीज गायबकाँग्रेस नेते अभिषेक सिंघवी, मनीष तिवारी, प्रणब झा, पक्षाचे छत्तीसगढचे प्रभारी पी. एल. पुनिया यांच्यासह अन्य नेत्यांच्या एका शिष्टमंडळाने निवडणूक आयोगासमोर या तक्रारींचा पाढा वाचला. पुनिया म्हणाले की, मतदानानंतर इव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरुमच्या जवळपास लॅपटॉप, मोबाइल हाती घेतलेले लोक आढळून आले होते. काँग्रेसचे राज्यसभा खासदार विवेक तनखा यांनी म्हटले आहे की, मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील इव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरुममध्ये एके दिवशी तासभर वीजच नव्हती. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरेही बंद पडले होते. इव्हीएम यंत्रे एखाद्या खासगी हॉटेलमध्ये ठेवण्याचे कारणच काय असा सवाल मनीष तिवारी यांनी विचारला आहे.

टॅग्स :Chhattisgarh Assembly Election 2018छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018Madhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018