शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

काँग्रेस आणि तृणमूलमधील तणाव वाढला, राहुल गांधींच्या यात्रेचे पोस्टर फाडले, ममता त्याच दिवशी घेणार रॅली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 17:18 IST

Bharat Jodo Nyay Yatra: लोकसभा निवडणुकीपूर्वी कांग्रेसचे नेते राहुल गांधी हे भारत जोडो न्याय यात्रेवर निघाले आहेत. मणिपूरमधून निघालेली त्यांची ही यात्रा थोड्याच दिवसात आसाममधून पश्चिम बंगालमध्ये दाखल होणार आहे. मात्र ही यात्रा पश्चिम बंगालमध्ये पोहोचण्यापूर्वीच बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि काँग्रेसमध्ये खटके उडाले आहेत.

लोकसभा निवडणुकीपूर्वी कांग्रेसचे नेते राहुल गांधी हे भारत जोडो न्याय यात्रेवर निघाले आहेत. मणिपूरमधून निघालेली त्यांची ही यात्रा थोड्याच दिवसात आसाममधून पश्चिम बंगालमध्ये दाखल होणार आहे. मात्र ही यात्रा पश्चिम बंगालमध्ये पोहोचण्यापूर्वीच बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि काँग्रेसमध्ये खटके उडाले आहेत. तसेच तृणमूल काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार, अशी घोषणा ममता बॅनर्जी यांनी आज केली आहे. या घोषणेनंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये तणाव वाढला आहे. तसेच बंगालमधील कूचबिहार जिल्ह्यात राहुल गांधींच्या यात्रेचे काही पोस्टर लावण्यात आले होते. हे पोस्टर फाडण्यात आले आहेत. मात्र हे पोस्टर कुणी फाडले, याबाबतची माहिती समोर आली आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ही २५ जानेवारी रोजी पश्चिम बंगालमध्ये पोहोचणार आहे. मात्र ही यात्रा कोलकाता येथे जाणार नाही.

गुरुवारी पश्चिम बंगालमधील कुचबिहारमध्ये राहुल गांधींची भारत जोडो यात्रा दाखल होणार आहे. याच दिवशी ममता बॅनर्जी यांनी आपल्या रॅलीचं आयोजन केलं आहे. ममता बॅनर्जींनी आरोप केला की, राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचं निमंत्रण आतापर्यंत आपल्याला मिळालेलं नाही. आम्ही इंडिया आघाडीचे घटक आहोत. मात्र असं असूनही राहुल गांधींच्या यात्रेबाबत आमच्यासोबत काही बोलणं झालं नाही. तसेच पश्चिम बंगालशी संबंधित कुठल्याही गोष्टीबाबत आमच्यासोबत चर्चा झाली नाही.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कांग्रेसला मोठा धक्का देताना राज्यात स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत माझा कुणाशीही संपर्क झालेला नाही. बंगालमध्ये कुठल्याही पक्षात ताळमेळ जुळलेला नाही. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस स्वबळावर निवडणुकीत उतरेल. मी दिलेला कुठलाही प्रस्ताव इंडिया आघाडीने मान्य केलेला नाही. त्यामुळे आमचा पक्ष स्वबळावर निवडणुकीत लढणार आहे.  

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीMamata Banerjeeममता बॅनर्जी