शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस आणि तृणमूलमधील तणाव वाढला, राहुल गांधींच्या यात्रेचे पोस्टर फाडले, ममता त्याच दिवशी घेणार रॅली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 17:18 IST

Bharat Jodo Nyay Yatra: लोकसभा निवडणुकीपूर्वी कांग्रेसचे नेते राहुल गांधी हे भारत जोडो न्याय यात्रेवर निघाले आहेत. मणिपूरमधून निघालेली त्यांची ही यात्रा थोड्याच दिवसात आसाममधून पश्चिम बंगालमध्ये दाखल होणार आहे. मात्र ही यात्रा पश्चिम बंगालमध्ये पोहोचण्यापूर्वीच बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि काँग्रेसमध्ये खटके उडाले आहेत.

लोकसभा निवडणुकीपूर्वी कांग्रेसचे नेते राहुल गांधी हे भारत जोडो न्याय यात्रेवर निघाले आहेत. मणिपूरमधून निघालेली त्यांची ही यात्रा थोड्याच दिवसात आसाममधून पश्चिम बंगालमध्ये दाखल होणार आहे. मात्र ही यात्रा पश्चिम बंगालमध्ये पोहोचण्यापूर्वीच बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि काँग्रेसमध्ये खटके उडाले आहेत. तसेच तृणमूल काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार, अशी घोषणा ममता बॅनर्जी यांनी आज केली आहे. या घोषणेनंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये तणाव वाढला आहे. तसेच बंगालमधील कूचबिहार जिल्ह्यात राहुल गांधींच्या यात्रेचे काही पोस्टर लावण्यात आले होते. हे पोस्टर फाडण्यात आले आहेत. मात्र हे पोस्टर कुणी फाडले, याबाबतची माहिती समोर आली आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ही २५ जानेवारी रोजी पश्चिम बंगालमध्ये पोहोचणार आहे. मात्र ही यात्रा कोलकाता येथे जाणार नाही.

गुरुवारी पश्चिम बंगालमधील कुचबिहारमध्ये राहुल गांधींची भारत जोडो यात्रा दाखल होणार आहे. याच दिवशी ममता बॅनर्जी यांनी आपल्या रॅलीचं आयोजन केलं आहे. ममता बॅनर्जींनी आरोप केला की, राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचं निमंत्रण आतापर्यंत आपल्याला मिळालेलं नाही. आम्ही इंडिया आघाडीचे घटक आहोत. मात्र असं असूनही राहुल गांधींच्या यात्रेबाबत आमच्यासोबत काही बोलणं झालं नाही. तसेच पश्चिम बंगालशी संबंधित कुठल्याही गोष्टीबाबत आमच्यासोबत चर्चा झाली नाही.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कांग्रेसला मोठा धक्का देताना राज्यात स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत माझा कुणाशीही संपर्क झालेला नाही. बंगालमध्ये कुठल्याही पक्षात ताळमेळ जुळलेला नाही. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस स्वबळावर निवडणुकीत उतरेल. मी दिलेला कुठलाही प्रस्ताव इंडिया आघाडीने मान्य केलेला नाही. त्यामुळे आमचा पक्ष स्वबळावर निवडणुकीत लढणार आहे.  

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीMamata Banerjeeममता बॅनर्जी