शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

मथुरेत तणावपूर्ण वातावरण; जाणून घ्या काय आहे ईदगाह आणि मंदिराचे संपूर्ण प्रकरण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 15:03 IST

गेल्या महिन्यात अखिल भारत हिंदू महासभेच्या नेत्या राजश्री चौधरी यांनी 6 डिसेंबर रोजी शाही मशिदीत भगवान कृष्णाची मूर्ती बसवून जलाभिषेक करणार असल्याची घोषणा केली होती.

मथुरा:मथुरा शहरात सध्या कलम 144 लागू आहे. शहरातील सर्व गेट, मुख्य मार्गांवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरात प्रवेश करताना लोकांची तपासणी केली जात आहे. संशयितांकडून ओळखपत्रे मागविण्यात येत आहेत. शहरात हजारो पोलिस तैनात आहेत. यामागे कारण आहे ईदगाह-मंदिर आणि जलाभिषेक. जाणून घ्या काय आहे नेमकं हे प्रकरण ?

का चर्चेत आहे मथुरा ?

गेल्या महिन्यात अखिल भारत हिंदू महासभेच्या नेत्या राजश्री चौधरी यांनी 6 डिसेंबर रोजी शाही मशिदीत भगवान कृष्णाची मूर्ती बसवून जलाभिषेक करणार असल्याची घोषणा केली होती. या संस्थेचा दावा आहे की, भगवान कृष्णाचे खरे जन्मस्थान मशिदीच्या आत आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेच्या या घोषणेला श्रीकृष्ण जन्मभूमी निर्माण न्यास, नारायणी सेना आणि श्रीकृष्ण मुक्ती दलानेही पाठिंबा दिला होता. यानंतर शहरात तणाव वाढू नये म्हणून पोलिस तैनात करण्यात आले.

केशव मौर्य यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली

हिंदू संघटनांच्या वक्तव्यामुळे निवडणुकीच्या दिशेने निघालेल्या उत्तर प्रदेशचे राजकीय वातावरण तापले आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी 1 डिसेंबर रोजी विधान केल्यावर ही बाब चर्चेत आली. एका ट्विटमध्ये ते म्हणाले की, अयोध्या काशीच्या भव्य मंदिराचे बांधकाम सुरू आहे, मथुरेची तयारी सुरू आहे. त्यांचे ट्विट आजही त्याच्या ट्विटर टाइमलाइनवर पाहिले जाऊ शकते. या ट्विटनंतर पोलीस यंत्रणा अलर्टवर आहेत.

काय आहे मंदिर-मशीद वाद?

मुघल शासक औरंगजेबाने 1669 मध्ये श्रीकृष्ण मंदिर पाडून त्याच्या एका भागात ईदगाह बांधल्याचा दावा हिंदू संघटना करतात. हे ईदगाह हटवण्यासाठी हिंदू पक्षाच्या वतीने न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. हिंदू बाजूंचा दावा आहे की, जिथे कंसाचे तुरुंग होते, तिथेच भगवान कृष्णाचा जन्म झाला. 1669 मध्ये मुघल शासक औरंगजेबाने या तुरुंगाची नासधूस करुन शाही ईदगाह बांधली होती. 

ईदगाहचा झालेला करार चुकीचामागील अनेक वर्षांपासून हिंदू महासभा या ठिकाणाहून ईदगाह हटवण्याची मागणी करत आहे. सध्या हे प्रकरण मथुरा दिवाणी न्यायालयात सुरू आहे. त्याची पुढील सुनावणी 15 फेब्रुवारीला होणार आहे. अहवालानुसार, कृष्ण जन्मभूमीची 13.33 एकर जमीन अखिल भारतीय हिंदू महासभेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष मदन मोहन मालवीय यांनी राजा माल यांच्याकडून खरेदी केली होती. हिंदू संघटनेने मथुरा न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संस्थान आणि शाही ईदगाह व्यवस्थापन समिती यांच्यात 2 ऑक्टोबर 1968 रोजी झालेला करार चुकीचा आहे. हा करार रद्द करून मंदिर परिसरात असलेली ईदगाह हटवून ती जमीन हिंदूंच्या ताब्यात द्यावी, अशी मागणी या संघटनेने न्यायालयाकडे केली आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmathura-pcमथुरा