शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

Coronavirus: वाढत्या कोरोना रुग्णांसाठी केंद्र सरकारचा मोठा दिलासादायक निर्णय; महाराष्ट्रालाही फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 08:36 IST

कोविड १९ च्या दिवसेंदिवस वाढत्या रुग्णांमुळे देशात ऑक्सिजनची कमतरता भासत आहे.

ठळक मुद्देपरदेशातून ५० हजार मेट्रिक टन ऑक्सिजन मागवण्यात येणार आहे.या ऑक्सिजनच्या क्षमतेने १२ राज्यांच्या गरजा भागवल्या जाऊ शकतात.देशात दररोज ७ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन करण्याची क्षमता आहे.

नवी दिल्ली – कोरोना व्हायरस महामारीमुळं संपूर्ण देशात हाहाकार माजला आहे. मेडिकल ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्यानं केंद्र सरकारने मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. देशात कोरोनाचे वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता केंद्राने ५० हजार मेट्रिक टन मेडिकल ऑक्सिजन परदेशातून आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने गुरुवारी याची महिती दिली. सरकारनं सांगितलं की, कोविड १९ च्या दिवसेंदिवस वाढत्या रुग्णांमुळे देशात ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. त्यासाठी परदेशातून ५० हजार मेट्रिक टन ऑक्सिजन मागवण्यात येणार आहे. परराष्ट्र मंत्रालयातच्या माध्यमातून केंद्र सरकार ही प्रक्रिया पार पाडणार आहे. या ऑक्सिजनच्या क्षमतेने १२ राज्यांच्या गरजा भागवल्या जाऊ शकतात. आरोग्य मंत्रालयाने याबाबत एक निवेदन जारी केले आहे.

या गरज असणाऱ्या १२ राज्यांमध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पंजाब, हरियाणा आणि राजस्थान यांचा समावेश आहे. विशेषत:महाराष्ट्रासह अनेक राज्यं आहेत ज्याठिकाणी कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजनचा अभाव असल्याच्या अनेक बातम्या समोर येत आहे. याच दरम्यान केंद्र सरकारने राज्य सरकारला निर्देश केले की, ऑक्सिजनचा योग्य आणि सावधानकारक वापर करावा. कुठेही ऑक्सिजन वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी. देशात दररोज ७ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन करण्याची क्षमता आहे. आरोग्य आपत्कालीन परिस्थितीत स्टील संयंत्रात वापरले जाणाऱ्या अतिरिक्त ऑक्सिजनचा वापरही केला जाऊ शकतो.

हवाई दलामार्फत ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करा

देशातील कोरोना रुग्णांची संख्या पाहता, महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आढळून येत आहेत. दररोज हजारोंच्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. या रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडत आहे. ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी रस्त्याच्या मार्गाने ११०० ते १३०० कि. मी. चे अंतर पार करावे लागत आहे. यासाठी ऑक्सिजनचा पुरवठा वायुसेनेच्या हवाई दलामार्फत करावा, अशी मागणी खासदार भावना गवळी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय रक्षामंत्री राजनाथ सिंह यांना पत्राव्दारे केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्र