शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

Coronavirus: वाढत्या कोरोना रुग्णांसाठी केंद्र सरकारचा मोठा दिलासादायक निर्णय; महाराष्ट्रालाही फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 08:36 IST

कोविड १९ च्या दिवसेंदिवस वाढत्या रुग्णांमुळे देशात ऑक्सिजनची कमतरता भासत आहे.

ठळक मुद्देपरदेशातून ५० हजार मेट्रिक टन ऑक्सिजन मागवण्यात येणार आहे.या ऑक्सिजनच्या क्षमतेने १२ राज्यांच्या गरजा भागवल्या जाऊ शकतात.देशात दररोज ७ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन करण्याची क्षमता आहे.

नवी दिल्ली – कोरोना व्हायरस महामारीमुळं संपूर्ण देशात हाहाकार माजला आहे. मेडिकल ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्यानं केंद्र सरकारने मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. देशात कोरोनाचे वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता केंद्राने ५० हजार मेट्रिक टन मेडिकल ऑक्सिजन परदेशातून आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने गुरुवारी याची महिती दिली. सरकारनं सांगितलं की, कोविड १९ च्या दिवसेंदिवस वाढत्या रुग्णांमुळे देशात ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. त्यासाठी परदेशातून ५० हजार मेट्रिक टन ऑक्सिजन मागवण्यात येणार आहे. परराष्ट्र मंत्रालयातच्या माध्यमातून केंद्र सरकार ही प्रक्रिया पार पाडणार आहे. या ऑक्सिजनच्या क्षमतेने १२ राज्यांच्या गरजा भागवल्या जाऊ शकतात. आरोग्य मंत्रालयाने याबाबत एक निवेदन जारी केले आहे.

या गरज असणाऱ्या १२ राज्यांमध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पंजाब, हरियाणा आणि राजस्थान यांचा समावेश आहे. विशेषत:महाराष्ट्रासह अनेक राज्यं आहेत ज्याठिकाणी कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजनचा अभाव असल्याच्या अनेक बातम्या समोर येत आहे. याच दरम्यान केंद्र सरकारने राज्य सरकारला निर्देश केले की, ऑक्सिजनचा योग्य आणि सावधानकारक वापर करावा. कुठेही ऑक्सिजन वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी. देशात दररोज ७ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन करण्याची क्षमता आहे. आरोग्य आपत्कालीन परिस्थितीत स्टील संयंत्रात वापरले जाणाऱ्या अतिरिक्त ऑक्सिजनचा वापरही केला जाऊ शकतो.

हवाई दलामार्फत ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करा

देशातील कोरोना रुग्णांची संख्या पाहता, महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आढळून येत आहेत. दररोज हजारोंच्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. या रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडत आहे. ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी रस्त्याच्या मार्गाने ११०० ते १३०० कि. मी. चे अंतर पार करावे लागत आहे. यासाठी ऑक्सिजनचा पुरवठा वायुसेनेच्या हवाई दलामार्फत करावा, अशी मागणी खासदार भावना गवळी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय रक्षामंत्री राजनाथ सिंह यांना पत्राव्दारे केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्र