शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

नक्षलवाद्यांच्या आदेशाने मंदिर बंद; 21 वर्षांनंतर उघडले श्रीराम मंदिराचे दरवाजे, ग्रामस्थ खुश...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 16:26 IST

पाच दशकांपूर्वी झाली मंदिराची स्थापना केली, पण नक्षलवाद्यांनी बळजबरीने मंदिर बंद केले. आता CRPF जवानांनी मंदिर उघडून केली पूजा.

Ram Mandir: श्रीराम जन्मभूमी अयोध्येत भगवान श्रीरामाच्या भव्य मंदिर उभारणीसाठी रामभक्तांना 500 वर्षे वाट पाहावी लागली. त्याचप्रमाणे नक्षलवादाचा फटका बसलेल्या सुकमा जिल्ह्यातील ग्रामस्थदेखील 21 वर्षांपासून तेथील श्रीराम मंदिराचे दरवाजे उघडण्याची वाट पाहत होते. नक्षलवाद्यांच्या आदेशामुळे 2003 साली मंदिर बंद करण्यात आले होते. पण, आता दोन दशकानंतर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) 74 व्या कोरचा कॅम्प उभारल्यानंतर सैनिकांनी मंदिरात पूजा सुरू केली आहे.      छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील लखापाल आणि केरळपेंडा या नक्षलग्रस्त गावांची ही घटना आहे. गावात सुमारे पाच दशकांपूर्वी श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्तींचा अभिषेक सोहळा झाला. पण नंतर नक्षलवादाच्या वाढत्या उद्रेकामुळे 2003 मध्ये राम मंदिराची पूजा बंद करण्यात आली. नक्षलवाद्यांच्या भीतीमुळे दोन दशकांपासून या मंदिराचे दरवाजे उघडण्याची कुणाचीही हिम्मत झाली नाही.

कधी बांधले मंदिर?1970 मध्ये बिहारी महाराजांनी मंदिराची स्थापना केली होती. त्याकाळी मालाची ने-आण करण्यासाठी ना रस्ते होते, ना वाहने उपलब्ध होती. म्हणूनच संपूर्ण गावाने सुमारे 80 किलोमीटरवरुन पायी स्वतःच्या डोक्यावर सिमेंट, दगड, खडी आणि इतर सामान आणले होते. मंदिराच्या स्थापनेत गावातील सर्व लोकांनी उत्साहाने सहभाग घेतला. मंदिराच्या स्थापनेनंतर संपूर्ण परिसर श्रीरामाचे भक्त बनले. 

मोठी जत्रा भरायची, अयोध्येतून संतांचे आगमन व्हायचेग्रामस्थांनी सांगितले की, प्राचीन काळी येथे खूप मोठी जत्रा भरत असे, अयोध्येतून साधू-संतही यायचे. मात्र नक्षलवादी वाढल्याने आणि पूजाअर्चा बंद झाल्याने सर्व गोष्टी पूर्णपणे ठप्प झाल्या. नक्षलवाद्यांच्या दबावामुळे पूजा थांबल्यावर जत्राही थांबली. नंतर नक्षलवाद्यांनी या मंदिराची विटंबना करून कुलूप लावले. गावातील पुजारी मंदिराची पूजा आणि देखभाल करत असत. मात्र नक्षलवाद्यांच्या आदेशानंतर पुजारी निघून गेले. नंतर मंदिर परिसरात गवत व झाडे वाढून मंदिराची अवस्था दयनीय झाली.

सीआरपीएफ कॅम्प उभारल्यानंतर सैनिकांनी दरवाजे उघडलेअखेर दोन दशकानंतर सीआरपीएफ जवानांनी नक्षलवाद्यांच्या आदेशानंतर बंद केलेले मंदिराचे दरवाजे उघडले. दरवाजे उघडल्यानंतर ग्रामस्थांसह अधिकारी व जवानांनी मंदिराची स्वच्छता आणि विधीवत पूजाही करण्यात आली. यावेळी गावातील बहुसंख्य स्त्री-पुरुष सहभागी झाले होते. या मंदिरात विधीवत पूजा केल्याने ग्रामस्थ खुप खुश आहेत.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरChhattisgarhछत्तीसगडnaxaliteनक्षलवादी