शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

KCR यांना मोठा झटका! माजी मंत्री, खासदार आणि आमदारांसह BRS मधील ३५ नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 19:54 IST

गेल्या काही दिवसापासून तेलंगणातील बीआरएस पक्षाने महाराष्ट्रात प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे.

गेल्या काही दिवसापासून तेलंगणातील बीआरएस पक्षाने महाराष्ट्रात प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. अनेक मोठ्या नेत्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे, पण आता बीआरएस पक्षालाच मोठा झटका बसला आहे.  तेलंगणातील अनेक बीआरएस नेत्यांनी सोमवारी केसीआर यांना रामराम केला, आणि काँग्रेसशी हातमिळवणी केली. माजी खासदार पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी, तेलंगणाचे माजी मंत्री जुपल्ली कृष्ण राव यांच्यासह इतर नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत या नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

PM मोदींचा मध्य प्रदेश दौरा अचानक रद्द; मुख्यमंत्री चौहान यांनी सांगितलं कारण

कर्नाटकच्या विजयानंतर काँग्रेस जोरदार तयारी करत आहे, दक्षिणेकडील राज्यांमध्ये त्यांनी प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी तेलंगणातील अनेक नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्ष बदलाच्या या सोहळ्यामुळे सीएम केसीआर यांच्या पक्ष बीआरएसला मोठा झटका बसला आहे. तेलंगणामध्ये वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि या निवडणूक वर्षात अनेक BRS नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मिळालेल्या माहितीनुसार, बीआरएसच्या ३५ नेत्यांनी काँग्रेसचे सदस्यत्व घेतले आहे.

सोमवारी माजी खासदार पोंगुलेती श्रीनिवास रेड्डी, तेलंगणाचे माजी मंत्री जुपल्ली कृष्ण राव यांच्यासह इतर नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत या नेत्यांनी पक्षाशी हातमिळवणी केली. यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, पक्षाचे तेलंगण प्रभारी माणिकराव ठाकरे आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रेवंत रेड्डी उपस्थित होते. मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी नवी दिल्लीतील एआयसीसी कार्यालयात तेलंगणा काँग्रेस नेत्यांचीही भेट घेतली. तेलंगणातील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राहुल गांधी २ जुलै रोजी तेलंगणाचा दौरा करणार असल्याचे समोर आले आहे.

माजी खासदार पोंगुलेती श्रीनिवास रेड्डी आणि तेलंगणा सरकारचे माजी मंत्री जुपल्ली कृष्ण राव यांच्यासह किमान ३५ बीआरएस नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली होती. त्याअंतर्गत या नेत्यांनी सोमवारी येथे पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाची भेट घेतली. यानंतर जुलैच्या सुरुवातीलाच तेलंगणातील खम्मम येथे जाहीर सभा आयोजित केली जाणार आहे, जिथे हे सर्व नेते औपचारिकपणे काँग्रेसमध्ये प्रवेश घेतील. पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी हे गेल्या लोकसभा निवडणुकीत खम्मममधून बीआरएसचे खासदार होते.

भारत जोडो यात्रेने आणला बदल : पवनखेडा 

पवनखेडा म्हणाले की, भारत जोडो यात्रेनंतर परिवर्तनाचे वादळ आले आहे. याचा परिणाम आपण कर्नाटकात पाहिला आहे. पक्ष काँग्रेस आणि सोनिया गांधी यांनी तेलंगणाला दिला. आज अनेक बड्या नेत्यांनी खरगे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. 'देशभर परिवर्तनाचे वारे वाहत आहेत, त्याचा परिणाम कर्नाटकात दिसला आणि इतर राज्यांमध्ये बदलाचे वारे दिसले. आता बीआरएसचे महत्त्वाचे नेते काँग्रेसमध्ये सामील होत आहेत, असंही ते म्हणाले. 

टॅग्स :Telanganaतेलंगणाcongressकाँग्रेस