शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

आधार ई-केवायसी वापर बंद करा; सरकारचे टेलिकॉम कंपन्यांना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 09:48 IST

मोबाइल फोनधारकांची खासगी माहिती पडताळणीसाठी किंवा नवीन सिम कनेक्शन देण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांनी आधार कार्डची मागणी करणं बंद करण्यास सांगितले आहे.

नवी दिल्ली - मोबाइल फोनधारकांची खासगी माहिती पडताळणीसाठी किंवा नवीन सिम कनेक्शन देण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांनी आधार कार्डची मागणी करणं बंद करण्यास सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी सरकारने शुक्रवारी हे निर्देश जारी केले आहेत. सुप्रीम कोर्टानं गेल्या महिन्यात महत्त्वपूर्ण निर्णय देताना, कायदेशीर तरतुदींच्या अभावामुळे खासगी कंपन्यांद्वारे होणारा आधार ईKYCचा वापर करणं बंद करण्यास सांगितले होते. कोर्टाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी दूरसंचार विभागाने टेलिकॉम कंपन्यांसाठी तपशीलवार दिशानिर्देश जारी केले आहेत. यामध्ये कंपन्यांना आधारद्वारे इलेक्ट्रॉनिक स्वरुपात ई-केव्हायसीचा वापर करणं थांबवण्यास सांगितले आहे. शिवाय, यासंबंधीचा अहवाल 5 नोव्हेंबरपर्यंत देण्यास सांगितला आहे. 

दूरसंचार विभागानं आपल्या 3 पानांच्या परिपत्रकात म्हटले आहे की, ग्राहकांच्या खासगी माहितीच्या पडताळणीसहीत त्यांना नवीन सिम कनेक्शन देण्यासाठी आधार ई-केव्हायसीचा उपयोग केला जाऊ शकत नाही. दरम्यान, जर नवीन कनेक्शनसाठी ग्राहक स्व-ईच्छेनं आधार कार्डची प्रत पुरवत असेल तर कागदपत्रांच्या स्वरुपात त्याचा वापर केला जाऊ शकतो. पण याचा ऑफलाइनच वापर केला जाऊ शकतो. शिवाय, सर्व टेलिकॉम कंपन्या वेळबद्ध पद्धतीनं या आदेशाचे पालन सुनिश्चित करतील, असेही यात सांगण्यात आले आहे. 

दूरसंचार विभागाच्या अनुसार,  मोबाइल ग्राहकांना पर्यायी डिजिटल प्रक्रिया उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामध्ये कस्टमर एक्विझिशन फॉर्मसहीत ग्राहकांना फोटोसोबत ओळख आणि पत्त्यासाठी स्कॅन कॉपीचा उपयोग करता येईल. या पार्श्वभूमीवर नवीन ग्राहकांसाठी सर्व डिजिटल प्रक्रिया असतील.  

टॅग्स :MobileमोबाइलAdhar Cardआधार कार्डGovernmentसरकार