शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

मोबाईलचे रिचार्ज 'इतके' महागणार?; कंपन्या नुकसान भरून काढण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 14:13 IST

मोबाईल कंपन्या लवकरच दरवाढ करण्याच्या तयारीत

नवी दिल्ली: देशातील कोट्यवधी मोबाईल धारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. सर्व मोबाईल सेवा पुरवठादार कंपन्यांचे रिचार्ज लवकरच महागण्याची शक्यता आहे. कोरोना संकट आणि लॉकडाऊन यामुळे कंपन्यांपुढील समस्या अचानक वाढल्या. त्यामुळे आता पुढील १२ ते १८ महिन्यांच्या कालावधीत दोनवेळा मोबाईल प्लान्स महाग होऊ शकतात. या वाढीनंतर रिचार्जचे दर आताच्या तुलनेत दुप्पट होतील. 'नवभारत टाईम्स'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.सध्याच्या घडीला मोबाईल सेवा पुरवठादार कंपन्या रिचार्जचे दर वाढवण्याच्या विचारात आहेत. याची तातडीनं अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. आता लगेच रिचार्जचे दर न वाढल्यास ते पुढील काही दिवसांत वाढवले जातील, अशी माहिती इमर्जिंग मार्केट्स टेक्नॉलॉजी, मीडिया एँड एंटरटेनमेंट एँड टेलिकम्युनिकेशन्स क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या प्रशांत सिंघल यांनी दिली. 'रिचार्जचे दर वाढवण्याची गरज आहे. पुढील ६ महिन्यांत दरांमध्ये वाढ आवश्यक आहे. ही दरवाढ जितकी लवकर होईल, तितकं कंपन्यांसाठी चांगलं असेल,' असं सिंघल म्हणाले.सध्याची परिस्थिती पाहता ग्राहकांना परवडणारे रिचार्ज देणं गरजेचं आहे. ग्राहकांची आर्थिक स्थिती लक्षात घेता मोबाईल प्लानचे दर वाढवणं फारशी चांगली कल्पना वाटत नाही, असं सिंघल यांनी सांगितलं. पुढील १२ ते १८ महिन्यांत दोनवेळा मोबाईल प्लान महाग होऊ शकतात. पुढील सहा महिन्यांत कंपन्या पहिली दरवाढ करतील. बाजारात स्थिर राहण्यासाठी कंपन्यांना हे पाऊल उचलावं लागेल, असंदेखील ते पुढे म्हणाले. मात्र अद्याप यावर कंपन्यांकडून कोणतंही भाष्य करण्यात आलेलं नाही.गेल्या डिसेंबरमध्ये कंपन्यांनी टॅरिफ प्लान्सचे दर वाढवले होते. भारतीय बाजाराचा आकार पाहता कंपन्यांकडे असणाऱ्या ग्राहकांची संख्या अतिशय मोठी आहे. मात्र प्रति ग्राहकाकडून अपेक्षित असलेला महसूल कमी आहे. त्यामुळे ग्राहक जास्त असूनही अनेक कंपन्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे गेल्या डिसेंबरमध्ये कंपन्यांनी टॅरिफचे दर ४० टक्क्यांनी वाढवले. आता दोन टप्प्यांमध्ये कंपन्या दरवाढ करण्याची शक्यता आहे.अन्य महत्त्वाच्या बातम्यामोठी बातमी! गलवान खोऱ्यातून चिनी सैन्य २ किलोमीटर माघारीचीनला धक्का देण्याची तयारी; पंतप्रधान मोदी 'खास' माणसावर सोपवणार जबाबदारी?

टॅग्स :Mobileमोबाइल