शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

पाण्याच्या बाबतीत तेलंगणाची वाटचाल टंचाईकडून समृद्धीकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 11:34 IST

‘सिंचित भूमीतून आलेला महसूल सोन्याच्या खाणीतून आलेल्या महसुलापेक्षा मौल्यवान असतो

हैदराबाद : पाण्याच्या बाबतीत दयनीय स्थितीत असलेल्या तेलंगणा राज्यास तेलंगणा राष्ट्र समितीच्या (टीआरएस) सरकारने अल्पावधीतच समृद्धीच्या शिखरावर पोहोचविले आहे. स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या निर्मिती आंदोलनाच्या काळात टीआरएसने नील्लू (पाणी), निधुलू (स्रोत) आणि नियमाकलाऊ (रोजगार) ही तीन आश्वासने दिली होती. सिंचन हा ग्रामीण भागाच्या विकासाचा आत्मा आहे. ही बाब लक्षात घेऊन टीआरएस सरकारने सिंचन सुविधा वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले. 

अर्थमंत्री टी. हरीश राव यांनी सर आर्थर कॉटन यांच्या एका वक्तव्याच्या आधारे म्हटले होते की, ‘सिंचित भूमीतून आलेला महसूल सोन्याच्या खाणीतून आलेल्या महसुलापेक्षा मौल्यवान असतो.’ तेलंगणा जेव्हा अविभाजित आंध्र प्रदेशचा भाग होता, तेव्हा येथे सिंचनाच्या सुविधांचा अभाव होता. वादांमुळे पाणीसाठ्याची क्षमता घटली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पुढाकार घेऊन सिंचन प्रकल्पांची फेररचना केली. त्यामुळे मागील आठ वर्षांत राज्यात अनेक सिंचन प्रकल्प आकारास येऊ शकले. (वा.प्र.)

कालेश्वरम मेगा प्रकल्पगोदावरी नदीवरील कालेश्वरम लिफ्ट इरिगेशन योजना हे एक अभियांत्रिकी आश्चर्य समजले जाते. ४५ लाख एकर सिंचन क्षमता असलेला हा प्रकल्प केसीआर यांच्या एक कोटी एकर जमिनीला सिंचन सुविधा देण्याच्या स्वप्नाला साकार करण्यात महत्त्वाचा ठरणार आहे. १५३१ किमी लांबीचा गुरुत्वाकर्षणावर आधारित कालवा, २०३ किमी बोगदे, ९८ किमी प्रेशर मेन्स व वितरिका, २० लिफ्टस आणि १९ पंपगृहे असे या कालव्याचे स्वरूप आहे. या प्रकल्पाद्वारे गोदावरीचे पाणी ६०० फूट उंचीवर आणले जाणार आहे. यातील अनेक प्रकल्प पूर्णत्वास गेले आहेत.टीआरएस सरकारच्या प्रयत्नांमुळे तेलंगणात दरडोई पाण्याची उपलब्धता देशाच्या सरसरीपेक्षा अधिक झाली आहे. कृष्णा आणि गोदावरी खोऱ्यात १,३०० टीएमसी पाणी तेलंगणासाठी उपलब्ध असून, साठवण क्षमता ९५० टीएमसी आहे.

मिशन काकतीयभूजल पातळी वाढविण्यासाठी तेलंगणा सरकारने मिशन काकतीय हाती घेतले. त्यात ४६ हजार पाणीसाठ्यांचा पुनरुज्जीवनासाठी शोध घेण्यात आला. हजारो साठ्यांचे पुनरुज्जीवन करण्यात आले.

टॅग्स :WaterपाणीChief Ministerमुख्यमंत्रीTelanganaतेलंगणा