शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

पाण्याच्या बाबतीत तेलंगणाची वाटचाल टंचाईकडून समृद्धीकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 11:34 IST

‘सिंचित भूमीतून आलेला महसूल सोन्याच्या खाणीतून आलेल्या महसुलापेक्षा मौल्यवान असतो

हैदराबाद : पाण्याच्या बाबतीत दयनीय स्थितीत असलेल्या तेलंगणा राज्यास तेलंगणा राष्ट्र समितीच्या (टीआरएस) सरकारने अल्पावधीतच समृद्धीच्या शिखरावर पोहोचविले आहे. स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या निर्मिती आंदोलनाच्या काळात टीआरएसने नील्लू (पाणी), निधुलू (स्रोत) आणि नियमाकलाऊ (रोजगार) ही तीन आश्वासने दिली होती. सिंचन हा ग्रामीण भागाच्या विकासाचा आत्मा आहे. ही बाब लक्षात घेऊन टीआरएस सरकारने सिंचन सुविधा वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले. 

अर्थमंत्री टी. हरीश राव यांनी सर आर्थर कॉटन यांच्या एका वक्तव्याच्या आधारे म्हटले होते की, ‘सिंचित भूमीतून आलेला महसूल सोन्याच्या खाणीतून आलेल्या महसुलापेक्षा मौल्यवान असतो.’ तेलंगणा जेव्हा अविभाजित आंध्र प्रदेशचा भाग होता, तेव्हा येथे सिंचनाच्या सुविधांचा अभाव होता. वादांमुळे पाणीसाठ्याची क्षमता घटली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पुढाकार घेऊन सिंचन प्रकल्पांची फेररचना केली. त्यामुळे मागील आठ वर्षांत राज्यात अनेक सिंचन प्रकल्प आकारास येऊ शकले. (वा.प्र.)

कालेश्वरम मेगा प्रकल्पगोदावरी नदीवरील कालेश्वरम लिफ्ट इरिगेशन योजना हे एक अभियांत्रिकी आश्चर्य समजले जाते. ४५ लाख एकर सिंचन क्षमता असलेला हा प्रकल्प केसीआर यांच्या एक कोटी एकर जमिनीला सिंचन सुविधा देण्याच्या स्वप्नाला साकार करण्यात महत्त्वाचा ठरणार आहे. १५३१ किमी लांबीचा गुरुत्वाकर्षणावर आधारित कालवा, २०३ किमी बोगदे, ९८ किमी प्रेशर मेन्स व वितरिका, २० लिफ्टस आणि १९ पंपगृहे असे या कालव्याचे स्वरूप आहे. या प्रकल्पाद्वारे गोदावरीचे पाणी ६०० फूट उंचीवर आणले जाणार आहे. यातील अनेक प्रकल्प पूर्णत्वास गेले आहेत.टीआरएस सरकारच्या प्रयत्नांमुळे तेलंगणात दरडोई पाण्याची उपलब्धता देशाच्या सरसरीपेक्षा अधिक झाली आहे. कृष्णा आणि गोदावरी खोऱ्यात १,३०० टीएमसी पाणी तेलंगणासाठी उपलब्ध असून, साठवण क्षमता ९५० टीएमसी आहे.

मिशन काकतीयभूजल पातळी वाढविण्यासाठी तेलंगणा सरकारने मिशन काकतीय हाती घेतले. त्यात ४६ हजार पाणीसाठ्यांचा पुनरुज्जीवनासाठी शोध घेण्यात आला. हजारो साठ्यांचे पुनरुज्जीवन करण्यात आले.

टॅग्स :WaterपाणीChief Ministerमुख्यमंत्रीTelanganaतेलंगणा