शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
3
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
4
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
5
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
6
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
7
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
8
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
9
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
10
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
11
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
12
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
13
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
14
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
15
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
16
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
17
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
18
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
19
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
20
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...

व्हॉट्सअ‍ॅप कॉलवरुन डॉक्टर करत होती महिलेवर उपचार; जुळ्या मुलांचा गर्भातच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 17:07 IST

तेलंगणामध्ये व्हिडीओ कॉलवर केलेल्या शस्त्रक्रियेमुळे दोन जुळ्या बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Telangana 'Video Call' Treatment: पुण्यात गर्भवती महिलेल्याचे मृत्यूचे प्रकरण ताजे असतानाच तेलंगणामधून आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. तेलंगणामध्ये शस्त्रक्रियेदरम्यान, दोन जुळ्या बाळांचा गर्भातच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे ही शस्त्रक्रिया चक्क व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉलवरुन सुरु होती. त्यामुळे दोन जुळ्या बालकांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत महिलेच्या कुटुंबियांनी रुग्णालयात गोंधळ घातला. पोलिसांनी याप्रकरणी रुग्णालयाविरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात हा सगळा प्रकार घडला. २६ वर्षीय बत्ती कीर्ती ही पाच महिन्यांची गर्भवती होती. बत्ती कीर्तीच्या जुळ्या बाळांचा गर्भाशयातच मृत्यू झाल्याने एकच गोंधळ उडाला होता. खाजगी रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे हा सगळा प्रकार घडल्याचा आरोप कीर्तीच्या कुटुंबियांनी केला. कारण कीर्तीवर उपचार करणारी डॉक्टर व्हिडिओ कॉलद्वारे परिचारिकांना सूचना देत होती आणि शस्त्रक्रिया करण्यास सांगत होती. पोलिसांनी तक्रार मिळताच विजय लक्ष्मी रुग्णालयाच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १०६(१) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सात वर्षांपूर्वी बत्ती कीर्तीचे लग्न झालं होतं. पाच महिन्यांपूर्वी, तिला इन व्हिट्रो फर्टिलायझेशनद्वारे गर्भधारणा झाली. बत्ती कीर्ती ६ एप्रिल रोजी विजया लक्ष्मी रुग्णालयात तपासणीसाठी गेली होती. त्यावेळी डॉ. व्ही. अनुषा रेड्डी यांनी कीर्तीचे गर्भाशय सैल झाल्याचे पाहिले.  या प्रकरणात, डॉक्टरांनी गर्भाशयाभोवतीचा भाग टाके घालून तिला घरी पाठवले. महिन्याभरानंतर चार मे रोजी कीर्तीला पोटात असह्य वेदना सुरु झाल्या. त्यामुळे तिला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टर अनुषा रेड्डी त्यावेळी तिथे नव्हत्या. त्यामुळे कीर्तीला दुसऱ्या दवाखान्यात जाण्याचा सल्ला द्यायला हवा होता. मात्र रुग्णालयाने तसे केले नाही.

रुग्णालय प्रशासनाने व्हिडीओ कॉलवरच कीर्तीवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉ. रेड्डी यांनी परिचारिकांना कीर्तीला  वेदना नियंत्रित करण्यासाठी इंजेक्शन देण्यास सांगितले. पण या इंजेक्शन्समुळे वेदना कमी झाल्याच नाहीत. तसेच तिच्या गर्भाशय ग्रीवामधील टाकेही तुटले. त्यानंतर १०.३० सुमारास गर्भाशयातून जुळ्या बाळांना बाहेर काढण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. डॉ. रेड्डी तिथे पोहोचल्यावर त्यांनी कीर्तीला वाचवले. मात्र जुळ्या बालकांचा मृत्यू झाला होता.

या घटनेची माहिती मिळताच कीर्तीच्या कुटुंबियांना संताप अनावर झाला. तिच्या कुटुंबियांनी रुग्णालयाबाहेर गोंधळ घालत कठोर कारवाईची मागणी केली. कुटुंबातील सदस्यांनीच्या तक्रार दाखल रंगारेड्डी जिल्हा वैद्यकीय आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी घेतली. आरोग्य विभागाच्या अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :TelanganaतेलंगणाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस