शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणात विरोधकांना कौटुंबिक टीका-टिप्पणी नडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 04:15 IST

केसीआर यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर टीका करण्यात आली. कौैटुंबिक टीका-टिप्पणीमुळे विरोधकांना मिळालेली सहानुभूती कमी झाल्यामुळेच टीआरएसला निर्विवाद वर्चस्व राखता आले आहे.

- धनाजी कांबळेतेलंगणा राज्याच्या निर्मितीचा मुद्दा भावनिक होता. टीडीपी काँग्रेससोबत गेल्याने येथील जनतेमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करून त्यांची मते वळविण्यात केसीआर यशस्वी ठरले आहेत. विरोधकांनी पातळी सोडून टीका-टिप्पणी केल्याने त्याचा काँग्रेस आघाडीला नुकसानच झाल्याचे दिसत आहे.शेतकरी कर्जमाफी, दलित-आदिवासींना ३ एकर जमीन, रोजगार, मुस्लिमांना १२ टक्के आरक्षण, शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज, दोन खोल्यांची घरे, पेन्शन असे प्रश्न प्रामुख्याने विरोधकांकडून उपस्थित करण्यात आले; केसीआर यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर टीका करण्यात आली. कौैटुंबिक टीका-टिप्पणीमुळे विरोधकांना मिळालेली सहानुभूती कमी झाल्यामुळेच टीआरएसला निर्विवाद वर्चस्व राखता आले आहे.भाजपाने मात्र हिंदू-मुस्लिम अशी विभागणी करून मुस्लिमांचे लाड करून घेतले जाणार नाहीत, तसेच १२ टक्के आरक्षण देणे शक्यच नाही, कोणी देण्याचा प्रयत्न केला तर ते आम्ही होऊ देणार नाही, अशा पद्धतीने अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांनी भडकावू भाषणे केली.नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी शेवटच्या टप्प्यात मतदारांना भावनिक आवाहन केले; मात्र तेलंगणात केवळ २ जागांवरच भाजपाला समाधान मानावे लागले आहे. तेलंगणाला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर सोनिया गांधी प्रथमच येथे आल्या होत्या. त्यांच्या सभेचा परिणाम होईल, असे वाटले होते. मात्र, स्थानिक मुद्द्यांवरच निवडणूक झाल्याने काँग्रेसला देखील टीडीपीला सोबत घेऊनही मतदारांनी नाकारले आहे. टीडीपीचा तेलंगणातील वाढता हस्तक्षेप धोकादायक असून, आंध्रातील लोक आमच्यावर राज्य करतील, त्यांना वेळीच रोखा, असे आवाहन केसीआर यांनी सभांमधून केले आहे. त्यामुळे अस्मितेचा मुद्दाही येथे महत्त्वाचा ठरला आहे.एमआयएमने ८ जागा लढविल्या. त्यात त्यांना आता ५ जागांवर आघाडी मिळाली आहे. एमआयएमचे नेते असुदुद्दीन ओवेसी यांनी सुरुवातीलाच टीआरएसला सहकार्य करण्याची भूमिका जाहीर केली होती. त्यामुळे हैैदराबादमधील एमआयएमचे उमेदवार विजयी होतील, असेच अंदाज ‘एक्झिट पोल’मध्ये व्यक्त झाले होते.या कारणांमुळे झाला टीआरएसचा विजयतेलंगणाच्या जनतेवर आंध्रातील लोक राज्य करतील, हा भावनिक मुद्दाचित्र बदलण्यास कारणीभूत ठरला.काँग्रेसने टीडीपीला सोबत घेतल्याने काँग्रेसबद्दलची सहानुभूती कमी होऊन टीआरएसकडे कल वाढला.विकासकामे आणि राबविलेल्या योजनांमुळे लोकमत आपल्या बाजूला वळविण्यात केसीआर यांना यश आले. विरोधकांमधील बेकीमुळेही टीआरएसला मदत झाली.

टॅग्स :Telangana Assembly Election 2018तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018TelanganaतेलंगणाBJPभाजपाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनcongressकाँग्रेस