शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
2
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
3
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
4
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
5
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
6
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
7
पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
8
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
9
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
10
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
11
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
12
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
13
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
14
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
15
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
16
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
17
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
18
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
19
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
20
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य

तेलंगणात विरोधकांना कौटुंबिक टीका-टिप्पणी नडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 04:15 IST

केसीआर यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर टीका करण्यात आली. कौैटुंबिक टीका-टिप्पणीमुळे विरोधकांना मिळालेली सहानुभूती कमी झाल्यामुळेच टीआरएसला निर्विवाद वर्चस्व राखता आले आहे.

- धनाजी कांबळेतेलंगणा राज्याच्या निर्मितीचा मुद्दा भावनिक होता. टीडीपी काँग्रेससोबत गेल्याने येथील जनतेमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करून त्यांची मते वळविण्यात केसीआर यशस्वी ठरले आहेत. विरोधकांनी पातळी सोडून टीका-टिप्पणी केल्याने त्याचा काँग्रेस आघाडीला नुकसानच झाल्याचे दिसत आहे.शेतकरी कर्जमाफी, दलित-आदिवासींना ३ एकर जमीन, रोजगार, मुस्लिमांना १२ टक्के आरक्षण, शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज, दोन खोल्यांची घरे, पेन्शन असे प्रश्न प्रामुख्याने विरोधकांकडून उपस्थित करण्यात आले; केसीआर यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर टीका करण्यात आली. कौैटुंबिक टीका-टिप्पणीमुळे विरोधकांना मिळालेली सहानुभूती कमी झाल्यामुळेच टीआरएसला निर्विवाद वर्चस्व राखता आले आहे.भाजपाने मात्र हिंदू-मुस्लिम अशी विभागणी करून मुस्लिमांचे लाड करून घेतले जाणार नाहीत, तसेच १२ टक्के आरक्षण देणे शक्यच नाही, कोणी देण्याचा प्रयत्न केला तर ते आम्ही होऊ देणार नाही, अशा पद्धतीने अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांनी भडकावू भाषणे केली.नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी शेवटच्या टप्प्यात मतदारांना भावनिक आवाहन केले; मात्र तेलंगणात केवळ २ जागांवरच भाजपाला समाधान मानावे लागले आहे. तेलंगणाला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर सोनिया गांधी प्रथमच येथे आल्या होत्या. त्यांच्या सभेचा परिणाम होईल, असे वाटले होते. मात्र, स्थानिक मुद्द्यांवरच निवडणूक झाल्याने काँग्रेसला देखील टीडीपीला सोबत घेऊनही मतदारांनी नाकारले आहे. टीडीपीचा तेलंगणातील वाढता हस्तक्षेप धोकादायक असून, आंध्रातील लोक आमच्यावर राज्य करतील, त्यांना वेळीच रोखा, असे आवाहन केसीआर यांनी सभांमधून केले आहे. त्यामुळे अस्मितेचा मुद्दाही येथे महत्त्वाचा ठरला आहे.एमआयएमने ८ जागा लढविल्या. त्यात त्यांना आता ५ जागांवर आघाडी मिळाली आहे. एमआयएमचे नेते असुदुद्दीन ओवेसी यांनी सुरुवातीलाच टीआरएसला सहकार्य करण्याची भूमिका जाहीर केली होती. त्यामुळे हैैदराबादमधील एमआयएमचे उमेदवार विजयी होतील, असेच अंदाज ‘एक्झिट पोल’मध्ये व्यक्त झाले होते.या कारणांमुळे झाला टीआरएसचा विजयतेलंगणाच्या जनतेवर आंध्रातील लोक राज्य करतील, हा भावनिक मुद्दाचित्र बदलण्यास कारणीभूत ठरला.काँग्रेसने टीडीपीला सोबत घेतल्याने काँग्रेसबद्दलची सहानुभूती कमी होऊन टीआरएसकडे कल वाढला.विकासकामे आणि राबविलेल्या योजनांमुळे लोकमत आपल्या बाजूला वळविण्यात केसीआर यांना यश आले. विरोधकांमधील बेकीमुळेही टीआरएसला मदत झाली.

टॅग्स :Telangana Assembly Election 2018तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018TelanganaतेलंगणाBJPभाजपाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनcongressकाँग्रेस