शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

काँग्रेसने दक्षिणेचे आणखी एक द्वार उघडले! तेलंगणात बीआरएस पिछाडीवर, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 16:03 IST

तेलंगणामध्ये काँग्रेसने बीआरएसला पिछाडीवर टाकले आहे, यामुळे आता काँग्रेसला दक्षिणेतील कर्नाटकनंतर तेलंगणा या एका राज्यात विजय मिळणार आहे.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल रविवारी जाहीर झाले. या निकालात राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार पराभूत होताना दिसत आहे. तर ज्या राज्यात काँग्रेस एक्झिट पोलमध्ये विजयी होताना दिसत होती, ते खरे ठरताना दिसत आहे. काँग्रेसने तेलंगणात मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची दशकभराची सत्ता उलथून टाकली आहे. काँग्रेस ६६ जागांवर आघाडीवर आहे. तर सत्ताधारी भारत राष्ट्र समिती ३७ जागांवर आघाडीवर आहे. भाजप १० जागांवर आघाडीवर आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेससाठी हा महत्त्वाचा विजय आहे.

Chhattisgarh Telangana Election 2023 Result Live: रेवंथ रेड्डी तेलंगणचे मुख्यमंत्री?

या विजयाने दक्षिणेत काँग्रेससाठी आणखी एक द्वार उघडले आहे. यामुळे आता काँग्रेसला आंध्रप्रदेशमधील विधानसभेच्या निवडणुकीतही आघाडी घेऊ शकते असं बोलले जात आहे. यामुळे दक्षिणेत काँग्रेस मजबूत होईल. कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेशात एक किंवा दोन नंबरला असू शकते.

तेलंगणात काँग्रेस मोठा पक्ष असा बनला

तेलंगणातील काँग्रेसच्या विजयाची जोरदार चर्चा सुरू आहे. काँग्रेसचे लक्ष 'कल्याणकारी मॉडेल आणि विकास मॉडेल'वर राहिले आणि निवडणूक प्रचारात यावर लक्ष केंद्रीत केले. प्रत्येक बेरोजगार तरुणाला दरमहा ४ हजार रुपये, महिलांना २,५०० रुपये, वृद्धांना ४ हजार रुपये पेन्शन आणि शेतकऱ्यांना १५ हजार रुपये देण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. याशिवाय काँग्रेसच्या निवडणूक प्रचारादरम्यान केसीआर यांच्या कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला जात होता. 

 तेलंगणात RRR जादूने काम केले आहे. RRR जादू म्हणजे राहुल गांधी आणि रेवंत रेड्डी. निवडणूक प्रचारादरम्यान राहुल गांधींनी तेलंगणामध्ये जवळपास २६ सभा घेतल्या. प्रियांका गांधी यांनीही जोरदार सभा घेतल्या.  

कोण आहेत रेवंत रेड्डी?

रेवंत रेड्डी यांनी विद्यार्थीदशेपासूनच राजकारणाला सुरुवात केली. उस्मानिया विद्यापीठातून पदवी घेतलेले रेड्डी त्यावेळी अभाविपशी संबंधित होते. नंतर ते चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षात सामील झाले. टीडीपीचे उमेदवार म्हणून त्यांनी २००९ साली आंध्र प्रदेशच्या कोडंगल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. २०१४ मध्ये ते तेलंगणा विधानसभेत टीडीपीचे सभागृह नेते म्हणून निवडले गेले. २०१७ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. केसीआर यांनी निवडणुकीच्या एक वर्ष आधीच विधानसभा विसर्जित केली होती आणि निवडणुका घेतल्या होत्या. विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर, काँग्रेसने त्यांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मलकाजगिरीतून तिकीट दिले यामध्ये त्यांना फक्त १० हजार मते मिळाली. २०२१ मध्ये काँग्रेसने त्यांना प्रदेशाध्यक्ष पद दिले, आता त्यांनी या निवडणुकीत मोठी कामगिरी केली आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकTelanganaतेलंगणाResult Day Assembly Electionनिकाल दिवस विधानसभा निवडणूक