शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

मधल्या सुट्टीत डब्बा खाताना सहावीतल्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबियांना जबर धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 13:28 IST

हैदराबादमध्ये सहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Shocking News : तेलंगणा हैदराबादमधून एक दुःखद घटना समोर आली आहे. शाळेत मधल्या सुट्टीतदरम्यान डब्यातील पुरी खाल्ल्याने एका ११ वर्षीय मुलाचा दु्र्दैवी मृत्यू झाला आहे. शाळेतली जेवणाची सुट्टी विद्यार्थ्याच्या कुटुंबासाठी शोकांतिकेत बदलली. जेवणाच्या डब्यातून पुरी खाल्ल्यानंतर हा सगळा प्रकार घडला. शिक्षकानी त्या विद्यार्थ्याल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

हैदराबादमध्ये घडलेल्या या घटनेनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. ही घटना पालकांनाही आपल्या मुलांना जेवताना नेमकं काय करायलं हवं हे शिकवण्यास भाग पाडत आह. शाळेत दुपारच्या जेवणादरम्यान पुरी खाल्ल्यानंतर एक विद्यार्थी अचानक बेशुद्ध झाला होता. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनं विद्यार्थ्याच्या कुटुंबाला जबर धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेत जेवण करताना घशात पुरी अडकल्याने या ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. हैदराबादमधील बेगमपेट पोलीस ठाण्याच्या परिसरात ही घटना घडली. मृताचे वडील गौतम जैन यांच्या तक्रारीवरून बेगमपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

जुना बोयगुडा सिकंदराबाद येथील गौतम जैन यांचा मुलगा वीरेन जैन हा परेड ग्राऊंडजवळील शाळेत सहावीत शिकत होता. सोमवारी दुपारी १२.२० वाजता जेवण करत असताना त्याने जेवणाच्या डब्यात ठेवलेल्या तीन पुऱ्या एकाच वेळी तोंडात टाकून खाण्याचा प्रयत्न केला. यामुळे पुरी घशात अडकली. दम लागल्याने वीरेन जैन खाली पडला. तो बेशुद्ध पडल्याने शाळेतील कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली. त्याला तात्काळ मर्दुपल्ली येथील गीता नर्सिंग होममध्ये नेण्यात आले. परंतु मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याने रुग्णालयाने त्याला सुपर स्पेशालिटी रुग्णालयात पाठवण्याचा सल्ला दिला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला सिकंदराबाद येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. विद्यार्थ्याचा आधीच मृत्यू झाल्याची पुष्टी डॉक्टरांनी केली. नंतर घशात अडकलेल्या पुऱ्या बाहेर काढण्यात आल्या.

मुलाच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की, त्यांना शाळेतून फोन आला होता, ज्यामध्ये त्यांच्या मुलाला तीन पुरी खाल्ल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचार करूनही मुलाचे प्राण वाचू शकले नाहीत. रुग्णालयात मुलाचा मृत्यू झाला असून या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, ही घटना  मुलाच्या कुटुंबावर तर मोठा आघात आहेच, पण त्यामुळे शाळांमधील मुलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

टॅग्स :TelanganaतेलंगणाAccidentअपघातPoliceपोलिस