शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

मधल्या सुट्टीत डब्बा खाताना सहावीतल्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबियांना जबर धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 13:28 IST

हैदराबादमध्ये सहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Shocking News : तेलंगणा हैदराबादमधून एक दुःखद घटना समोर आली आहे. शाळेत मधल्या सुट्टीतदरम्यान डब्यातील पुरी खाल्ल्याने एका ११ वर्षीय मुलाचा दु्र्दैवी मृत्यू झाला आहे. शाळेतली जेवणाची सुट्टी विद्यार्थ्याच्या कुटुंबासाठी शोकांतिकेत बदलली. जेवणाच्या डब्यातून पुरी खाल्ल्यानंतर हा सगळा प्रकार घडला. शिक्षकानी त्या विद्यार्थ्याल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

हैदराबादमध्ये घडलेल्या या घटनेनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. ही घटना पालकांनाही आपल्या मुलांना जेवताना नेमकं काय करायलं हवं हे शिकवण्यास भाग पाडत आह. शाळेत दुपारच्या जेवणादरम्यान पुरी खाल्ल्यानंतर एक विद्यार्थी अचानक बेशुद्ध झाला होता. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनं विद्यार्थ्याच्या कुटुंबाला जबर धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेत जेवण करताना घशात पुरी अडकल्याने या ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. हैदराबादमधील बेगमपेट पोलीस ठाण्याच्या परिसरात ही घटना घडली. मृताचे वडील गौतम जैन यांच्या तक्रारीवरून बेगमपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

जुना बोयगुडा सिकंदराबाद येथील गौतम जैन यांचा मुलगा वीरेन जैन हा परेड ग्राऊंडजवळील शाळेत सहावीत शिकत होता. सोमवारी दुपारी १२.२० वाजता जेवण करत असताना त्याने जेवणाच्या डब्यात ठेवलेल्या तीन पुऱ्या एकाच वेळी तोंडात टाकून खाण्याचा प्रयत्न केला. यामुळे पुरी घशात अडकली. दम लागल्याने वीरेन जैन खाली पडला. तो बेशुद्ध पडल्याने शाळेतील कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली. त्याला तात्काळ मर्दुपल्ली येथील गीता नर्सिंग होममध्ये नेण्यात आले. परंतु मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याने रुग्णालयाने त्याला सुपर स्पेशालिटी रुग्णालयात पाठवण्याचा सल्ला दिला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला सिकंदराबाद येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. विद्यार्थ्याचा आधीच मृत्यू झाल्याची पुष्टी डॉक्टरांनी केली. नंतर घशात अडकलेल्या पुऱ्या बाहेर काढण्यात आल्या.

मुलाच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की, त्यांना शाळेतून फोन आला होता, ज्यामध्ये त्यांच्या मुलाला तीन पुरी खाल्ल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचार करूनही मुलाचे प्राण वाचू शकले नाहीत. रुग्णालयात मुलाचा मृत्यू झाला असून या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, ही घटना  मुलाच्या कुटुंबावर तर मोठा आघात आहेच, पण त्यामुळे शाळांमधील मुलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

टॅग्स :TelanganaतेलंगणाAccidentअपघातPoliceपोलिस