शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

मधल्या सुट्टीत डब्बा खाताना सहावीतल्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबियांना जबर धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 13:28 IST

हैदराबादमध्ये सहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Shocking News : तेलंगणा हैदराबादमधून एक दुःखद घटना समोर आली आहे. शाळेत मधल्या सुट्टीतदरम्यान डब्यातील पुरी खाल्ल्याने एका ११ वर्षीय मुलाचा दु्र्दैवी मृत्यू झाला आहे. शाळेतली जेवणाची सुट्टी विद्यार्थ्याच्या कुटुंबासाठी शोकांतिकेत बदलली. जेवणाच्या डब्यातून पुरी खाल्ल्यानंतर हा सगळा प्रकार घडला. शिक्षकानी त्या विद्यार्थ्याल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

हैदराबादमध्ये घडलेल्या या घटनेनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. ही घटना पालकांनाही आपल्या मुलांना जेवताना नेमकं काय करायलं हवं हे शिकवण्यास भाग पाडत आह. शाळेत दुपारच्या जेवणादरम्यान पुरी खाल्ल्यानंतर एक विद्यार्थी अचानक बेशुद्ध झाला होता. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनं विद्यार्थ्याच्या कुटुंबाला जबर धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेत जेवण करताना घशात पुरी अडकल्याने या ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. हैदराबादमधील बेगमपेट पोलीस ठाण्याच्या परिसरात ही घटना घडली. मृताचे वडील गौतम जैन यांच्या तक्रारीवरून बेगमपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

जुना बोयगुडा सिकंदराबाद येथील गौतम जैन यांचा मुलगा वीरेन जैन हा परेड ग्राऊंडजवळील शाळेत सहावीत शिकत होता. सोमवारी दुपारी १२.२० वाजता जेवण करत असताना त्याने जेवणाच्या डब्यात ठेवलेल्या तीन पुऱ्या एकाच वेळी तोंडात टाकून खाण्याचा प्रयत्न केला. यामुळे पुरी घशात अडकली. दम लागल्याने वीरेन जैन खाली पडला. तो बेशुद्ध पडल्याने शाळेतील कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली. त्याला तात्काळ मर्दुपल्ली येथील गीता नर्सिंग होममध्ये नेण्यात आले. परंतु मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याने रुग्णालयाने त्याला सुपर स्पेशालिटी रुग्णालयात पाठवण्याचा सल्ला दिला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला सिकंदराबाद येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. विद्यार्थ्याचा आधीच मृत्यू झाल्याची पुष्टी डॉक्टरांनी केली. नंतर घशात अडकलेल्या पुऱ्या बाहेर काढण्यात आल्या.

मुलाच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की, त्यांना शाळेतून फोन आला होता, ज्यामध्ये त्यांच्या मुलाला तीन पुरी खाल्ल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचार करूनही मुलाचे प्राण वाचू शकले नाहीत. रुग्णालयात मुलाचा मृत्यू झाला असून या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, ही घटना  मुलाच्या कुटुंबावर तर मोठा आघात आहेच, पण त्यामुळे शाळांमधील मुलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

टॅग्स :TelanganaतेलंगणाAccidentअपघातPoliceपोलिस