शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

२६/११ चा हल्ला कमकुवत सरकारची आठवण करून देतो, नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 14:17 IST

२६/११ चा हल्ला कमकुवत आणि असमर्थ सरकार देशाचे किती नुकसान करू शकते, याची आठवण करून देतो, असे नरेंद्र मोदी म्हणाले. 

तेलंगणात सध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. राज्यात सर्वच राजकीय पक्ष मोठमोठ्या सभा घेऊन प्रचार करत आहेत. भाजपने सुद्धा तेलंगणात प्रचाराचा जोर लावला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदीही निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. नरेंद्र मोदींनी मेडक जिल्ह्यातील तुपरान येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित केले. यावेळी मुंबईत झालेल्या २६/११ च्या हल्ल्याचा उल्लेख करून काँग्रेसवर निशाणा साधला. हा हल्ला कमकुवत आणि असमर्थ सरकार देशाचे किती नुकसान करू शकते, याची आठवण करून देतो, असे नरेंद्र मोदी म्हणाले. 

२६/११ च्या दिवशी देश एका मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा बळी ठरला, ज्यामध्ये अनेक निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले, असे नरेंद्र मोदी म्हणाले. जनतेला संबोधित करताना त्यांनी मुंबई हल्ल्यात प्राण गमावलेल्या सर्वांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी २६ नोव्हेंबर हा दिवस कधीही विसरता येणार नाही, या दिवशी देशातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला, असे नरेंद्र मोदी म्हणाले. 

२०१४ मध्ये जनतेने देशातून काँग्रेसचे सरकार हटवले आणि भाजपचे मजबूत सरकार स्थापन केले. यामुळेच आता परिस्थिती बदलली आहे. आज देशातून दहशतवाद संपवला जात आहे. दहशतवाद्यांचा शोधून खात्मा केला जात आहे, असेही नरेंद्र मोदींनी सांगितले. विशेष म्हणजे काल नरेंद्र मोदींनी आपल्या मन की बात कार्यक्रमात सुद्धा २६/११च्या हल्ल्याचा उल्लेख केला होता. 

याचबरोबर नरेंद्र मोदींनी तेलंगणामधील आपल्या भाषणात बीआरएस प्रमुख केसीआर यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. केसीआर यांनी राज्यातील जनतेचा विश्वासघात केला आहे, त्यांनी ना तरुणांना रोजगार दिला, ना मुलांसाठी कोणतेही काम केले, असे नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच, तेलंगणातील जनतेला कधीही न भेटणाऱ्या अशा मुख्यमंत्र्याची राज्यात गरज आहे का, असा सवाल सुद्धा नरेंद्र मोदींनी उपस्थित जनतेला केला.

३० नोव्हेंबरला होणार मतदानतेलंगणामध्ये ३० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. ११९ जागांच्या या विधानसभा निवडणुकीसाठी प्रामुख्याने काँग्रेस, बीआरएस, भाजप आणि एआयएमआयएम रिंगणात उतरले आहेत. ३ डिसेंबरला मतमोजणी होणार असून निकाल ३ डिसेंबरलाच जाहीर केला जाणार आहे. अशा स्थितीत राज्यातील सत्ता काबीज करण्यासाठी सर्वच पक्ष जोरदार प्रयत्न करत आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाtelangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३Telanganaतेलंगणाcongressकाँग्रेसK Chandrashekar Raoके चंद्रशेखर राव