शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

२६/११ चा हल्ला कमकुवत सरकारची आठवण करून देतो, नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 14:17 IST

२६/११ चा हल्ला कमकुवत आणि असमर्थ सरकार देशाचे किती नुकसान करू शकते, याची आठवण करून देतो, असे नरेंद्र मोदी म्हणाले. 

तेलंगणात सध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. राज्यात सर्वच राजकीय पक्ष मोठमोठ्या सभा घेऊन प्रचार करत आहेत. भाजपने सुद्धा तेलंगणात प्रचाराचा जोर लावला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदीही निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. नरेंद्र मोदींनी मेडक जिल्ह्यातील तुपरान येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित केले. यावेळी मुंबईत झालेल्या २६/११ च्या हल्ल्याचा उल्लेख करून काँग्रेसवर निशाणा साधला. हा हल्ला कमकुवत आणि असमर्थ सरकार देशाचे किती नुकसान करू शकते, याची आठवण करून देतो, असे नरेंद्र मोदी म्हणाले. 

२६/११ च्या दिवशी देश एका मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा बळी ठरला, ज्यामध्ये अनेक निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले, असे नरेंद्र मोदी म्हणाले. जनतेला संबोधित करताना त्यांनी मुंबई हल्ल्यात प्राण गमावलेल्या सर्वांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी २६ नोव्हेंबर हा दिवस कधीही विसरता येणार नाही, या दिवशी देशातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला, असे नरेंद्र मोदी म्हणाले. 

२०१४ मध्ये जनतेने देशातून काँग्रेसचे सरकार हटवले आणि भाजपचे मजबूत सरकार स्थापन केले. यामुळेच आता परिस्थिती बदलली आहे. आज देशातून दहशतवाद संपवला जात आहे. दहशतवाद्यांचा शोधून खात्मा केला जात आहे, असेही नरेंद्र मोदींनी सांगितले. विशेष म्हणजे काल नरेंद्र मोदींनी आपल्या मन की बात कार्यक्रमात सुद्धा २६/११च्या हल्ल्याचा उल्लेख केला होता. 

याचबरोबर नरेंद्र मोदींनी तेलंगणामधील आपल्या भाषणात बीआरएस प्रमुख केसीआर यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. केसीआर यांनी राज्यातील जनतेचा विश्वासघात केला आहे, त्यांनी ना तरुणांना रोजगार दिला, ना मुलांसाठी कोणतेही काम केले, असे नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच, तेलंगणातील जनतेला कधीही न भेटणाऱ्या अशा मुख्यमंत्र्याची राज्यात गरज आहे का, असा सवाल सुद्धा नरेंद्र मोदींनी उपस्थित जनतेला केला.

३० नोव्हेंबरला होणार मतदानतेलंगणामध्ये ३० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. ११९ जागांच्या या विधानसभा निवडणुकीसाठी प्रामुख्याने काँग्रेस, बीआरएस, भाजप आणि एआयएमआयएम रिंगणात उतरले आहेत. ३ डिसेंबरला मतमोजणी होणार असून निकाल ३ डिसेंबरलाच जाहीर केला जाणार आहे. अशा स्थितीत राज्यातील सत्ता काबीज करण्यासाठी सर्वच पक्ष जोरदार प्रयत्न करत आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाtelangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३Telanganaतेलंगणाcongressकाँग्रेसK Chandrashekar Raoके चंद्रशेखर राव